शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
3
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
4
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
5
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
6
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
7
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
8
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
9
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
10
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
11
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
12
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
13
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
14
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
15
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
16
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
17
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
18
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
19
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
20
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली

प्रतीक्षा निवडणूक निकालाची उत्कंठा शिगेला

By admin | Updated: May 8, 2014 23:32 IST

मोहाडी : लोकसभा निवडणुकीच्या निकालाला केवळ एक आठवडा शिल्लक आहे. कोण निवडून येणार, कुणाला पराभव पत्करावा लागणार, विदर्भासह राज्यात आणि देशात कोण किती जागा घेणार,

पाच लाखांपर्यंतच्या शर्यती

मोहाडी : लोकसभा निवडणुकीच्या निकालाला केवळ एक आठवडा शिल्लक आहे. कोण निवडून येणार, कुणाला पराभव पत्करावा लागणार, विदर्भासह राज्यात आणि देशात कोण किती जागा घेणार, कोणत्या पक्षाची सत्ता येणार याविषयी सर्वांनाच कमालिची उत्सुकता लागली आहे. या उत्सुकतेतूनच हजारांपासून लाखांपर्यंत तर एक कप चहापासून तर जेवनापर्यंत अनेकांनी शर्यती लावलेल्या आहेत. गाव-खेड्यापासून ते शहरापर्यंत चार-चौघांच्या बैठकीत चर्चा सुरु असते ती निवडणूक निकालाची. सगळ्यांनाच प्रतिक्षा लागली आहे, १६ मे च्या सकाळची. तथापि, मतदान झाल्यापासून भंडार्‍यातून ‘भाई’ येणार की ‘भाऊ’ येणार हीच चर्चा गावागावात होताना दिसत आहे. सगळेच आपापल्यापरीने अंदाज वर्तवित आहेत. बेरीज-वजाबाकी लाखावरुन हजारावर येणार असल्याचे काहींचे म्हणने आहे तर काहींना परिवर्तन होणार असे चर्चेतून दिसून आले आहे.

याशिवाय प्रमुख उमेदवाराची मते कोण किती काटणार याचाही हिशेब आकडेवारीसह सांगत आहेत. चर्चा, हिशेब, अंदाज वर्तविणे सुरु असते आणि त्यातूनच पुढे सरसावतात शर्यती लावण्यासाठी. त्यातच चढविणारे अनेक असल्यामुळे या शर्यतीचा आकडा वाढत जात आहे. शहरात लाखोच्या शर्यती सुरू आहेत तर ग्रामीण भागात कुवतीनुसार शर्यती लावणे सुरु आहे. खेड्यातही आर्थिक सुबत्तेने मजबूत असलेले व्यक्ती लाखांच्या शर्यती घेत आहेत. ज्यांच्याकडे काही नाही असे हजार, पाचशेवर समाधान मानत आहेत. पाच रुपयाची चहासुद्धा शर्यतीचा हिस्सा झाली आहे. शर्यत केवळ मतदारसंघाची मोठ्या प्रमाणात लावली जात आहे, असे नाही. देशात कोणाला किती जागा मिळतील, कोणता पक्ष सत्तेत येईल, कोण पडणार, कोण जिंकणार अशा देश पातळीवरील प्रतिष्ठेच्या निवडणुकीच्या उमेदवाराची चर्चा गावखेड्यात होत आहे. सत्ता परिवर्तन झाले तर येणारा पक्ष सामान्यांचे हित जोपासणार काय याचीही चिंता अनेकांना वाटू लागली आहे. काही ठिकाणी सफारी शिवून देण्याची शर्यती लागलेल्या आहेत. काही ठिकाणी दुचाकीच्या तर काही ठिकाणी म्हणशील त्या हॉटेलमध्ये भोजन करायला नेईन, अशा शर्यतींचाही समावेश आहे. विधानसभेच्या चर्चांना उधाण शर्यती आणि चर्चा यापलिकडे एक चर्चा सुरु आहे ती येणार्‍या विधानसभा निवडणुकीची. टिक-टिक थांबली तर कोणाला उमेदवारी दिली जाईल. अन् फुल कोमेजला तर कसं होणार, याची चिंताही मतदारांना वाटू लागली आहे. याला तिकीट मिळेल, याची उमेदवारी कापली जाणार, या मतदारसंघात सर्वाधिक समाज आहे, त्यालाच तिकीट मिळेल, असे तर्कवितर्क लावणे सुरू आहे. एक आठवडा निवडणुकीच्या निकालाला उरल्यामुळे तेवढ्याच गतीने चर्चा, चहापानाच्या बैठकी अधिकच रंगू लागल्या आहेत. (तालुका प्रतिनिधी)