शहरं
Join us  
Trending Stories
1
"अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम फेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
2
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
3
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
4
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
5
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
6
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
7
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
8
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
9
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
10
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
11
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
12
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
13
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
14
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
15
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
16
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
17
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
18
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
19
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
20
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय

‘ती’ सात गावे सिंचनापासून वंचित

By admin | Updated: June 12, 2014 23:48 IST

भंडारा तालुक्यातील पहेला परिसरातील सात गावांना अद्यापही जलसिंचनाची कोणतीच सुविधा नसल्याने सतत दुष्काळाचा सामना करावा लागतो. त्यात गोलेवाडी, डोंगरगाव, भिकारमिन्सी, पन्नाशी,

सिंचनाअभावी शेती धोक्यात : पावसाच्या पाण्यावरच अवलंबूनपहेला : भंडारा तालुक्यातील पहेला परिसरातील सात गावांना अद्यापही जलसिंचनाची कोणतीच सुविधा नसल्याने सतत दुष्काळाचा सामना करावा लागतो. त्यात गोलेवाडी, डोंगरगाव, भिकारमिन्सी, पन्नाशी, एटेवाई, सोनेगाव आणि पागोरा या गावातील शेतकऱ्यांना दरवर्षी पावसाच्या पाण्यावरच अवलंबून राहावे लागत आहे.दिवसेंदिवस पावसाचे पाणी कमी पडत असल्याने या गावातील शेतकऱ्यांना दरवर्षी दुष्काळाचा सामना करावा लागतो. त्यामुळे येथील शेतीला अस्मानी तद्वतच सुलतानी संकटालाही सामोरे जावे लागते व तेथील शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. रावणवाडी जलाशयाचे पाणी या गावापर्यंत गेल्यास त्यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध होवू शकते. यापूर्वी रावणवाडी जलाशयाचे पाणी इटगाव, वडद, निमगाव, जामगाव मौदी, नवरगाव, चोवा, उसरीपार, श्रीनगर, पहेला, बोरगावखुर्द, रावणवाडी, वाकेश्वर इत्यादी गवाना पुरविण्यात येत होते. परंतु आता टेकेपार उपसा सिंचन योजना सुरू झाल्याने रावणवाडी जलाशयाशी जोडलेले असलेले इटगाव, वडद, निमगाव, जामगाव, मौदी, नवरगाव, चोवा, उसरीपार, श्रीनगर, पहेला ही १० गावे आता टेकेपार उपसा सिंचन येथे जोडलेले असल्याने आता रावणवाडी जलाशयाचे पाणी फक्त बोरगाव खुर्द, रावणवाडी आणि वाकेश्वर या तीनच गावांना मिळत आहे व बरेचशे पाणी तलावात शिल्लक राहते. शिल्लक राहिलेले पाणी जवळच्या सोनेगाव, गोलेवाडी, पन्नाशी, डोंगरगाव, पागोरा, एटेवाई, भिकारमिन्सी इत्यादी गावाना मिळू शकते. त्याकरिता रावणवाडी जलाशयापासून ते सोनेगाव, एटेवाई, गोलेवाडी, डोंगरगाव ते पागोरा पर्यंत नवीन नहर काढल्यास त्या सात गावातील शेतकऱ्यांना पाण्याची सोय होऊ शकते. मात्र या नवीन प्रस्तावाकडे या क्षेत्राचे आमदार, अधिकारी यांनी दुरदृष्टी ठेवून बघितले तर नक्कीच हे काम तेवढे कठीण नाही. परंतु या प्रस्तावाकडे सर्वांचिच उदासिनता दिसून येत असल्याचे चित्र आहे आणि म्हणून या सातही गावातील नागरिक शासनाच्या प्रति आपला रोष व्यक्त करीत आहेत. त्याचप्रमाणे रावणवाडी जलाशयाचे पाणी कमी पडल्यास टेकेपार उपसा सिंचनाचे पाणी भिलेवाडा येथपर्यंत गेले आहे. समोर तोच वाढवून वाघबोडी मार्गे नवीन नहर काढून ते नहर सरळ रावणवाडी जलाशयापर्यंत येऊ शकते व त्या नहराने टेकेपार उपसा सिंचनाचे पाणी सरळ रावणवाडी जलाशयात पाडता येते. एकदाचे का पाणी रावणवाडी जलाशयात पडले तर त्या जलाशयापासून सोनेगाव, एटेवाई, गोलेवाडी या गावापासून नवीन नहर काढून ते पाणी त्या सातही गावातील शेतकऱ्यांना उपलब्ध होईल. (वार्ताहर)