शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारवर निशाणा?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
4
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
5
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
6
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
7
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
8
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
9
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
10
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
11
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
12
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
13
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
14
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
15
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
16
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
17
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
18
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
19
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
20
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
Daily Top 2Weekly Top 5

‘ती’ सात गावे सिंचनापासून वंचित

By admin | Updated: June 12, 2014 23:48 IST

भंडारा तालुक्यातील पहेला परिसरातील सात गावांना अद्यापही जलसिंचनाची कोणतीच सुविधा नसल्याने सतत दुष्काळाचा सामना करावा लागतो. त्यात गोलेवाडी, डोंगरगाव, भिकारमिन्सी, पन्नाशी,

सिंचनाअभावी शेती धोक्यात : पावसाच्या पाण्यावरच अवलंबूनपहेला : भंडारा तालुक्यातील पहेला परिसरातील सात गावांना अद्यापही जलसिंचनाची कोणतीच सुविधा नसल्याने सतत दुष्काळाचा सामना करावा लागतो. त्यात गोलेवाडी, डोंगरगाव, भिकारमिन्सी, पन्नाशी, एटेवाई, सोनेगाव आणि पागोरा या गावातील शेतकऱ्यांना दरवर्षी पावसाच्या पाण्यावरच अवलंबून राहावे लागत आहे.दिवसेंदिवस पावसाचे पाणी कमी पडत असल्याने या गावातील शेतकऱ्यांना दरवर्षी दुष्काळाचा सामना करावा लागतो. त्यामुळे येथील शेतीला अस्मानी तद्वतच सुलतानी संकटालाही सामोरे जावे लागते व तेथील शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. रावणवाडी जलाशयाचे पाणी या गावापर्यंत गेल्यास त्यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध होवू शकते. यापूर्वी रावणवाडी जलाशयाचे पाणी इटगाव, वडद, निमगाव, जामगाव मौदी, नवरगाव, चोवा, उसरीपार, श्रीनगर, पहेला, बोरगावखुर्द, रावणवाडी, वाकेश्वर इत्यादी गवाना पुरविण्यात येत होते. परंतु आता टेकेपार उपसा सिंचन योजना सुरू झाल्याने रावणवाडी जलाशयाशी जोडलेले असलेले इटगाव, वडद, निमगाव, जामगाव, मौदी, नवरगाव, चोवा, उसरीपार, श्रीनगर, पहेला ही १० गावे आता टेकेपार उपसा सिंचन येथे जोडलेले असल्याने आता रावणवाडी जलाशयाचे पाणी फक्त बोरगाव खुर्द, रावणवाडी आणि वाकेश्वर या तीनच गावांना मिळत आहे व बरेचशे पाणी तलावात शिल्लक राहते. शिल्लक राहिलेले पाणी जवळच्या सोनेगाव, गोलेवाडी, पन्नाशी, डोंगरगाव, पागोरा, एटेवाई, भिकारमिन्सी इत्यादी गावाना मिळू शकते. त्याकरिता रावणवाडी जलाशयापासून ते सोनेगाव, एटेवाई, गोलेवाडी, डोंगरगाव ते पागोरा पर्यंत नवीन नहर काढल्यास त्या सात गावातील शेतकऱ्यांना पाण्याची सोय होऊ शकते. मात्र या नवीन प्रस्तावाकडे या क्षेत्राचे आमदार, अधिकारी यांनी दुरदृष्टी ठेवून बघितले तर नक्कीच हे काम तेवढे कठीण नाही. परंतु या प्रस्तावाकडे सर्वांचिच उदासिनता दिसून येत असल्याचे चित्र आहे आणि म्हणून या सातही गावातील नागरिक शासनाच्या प्रति आपला रोष व्यक्त करीत आहेत. त्याचप्रमाणे रावणवाडी जलाशयाचे पाणी कमी पडल्यास टेकेपार उपसा सिंचनाचे पाणी भिलेवाडा येथपर्यंत गेले आहे. समोर तोच वाढवून वाघबोडी मार्गे नवीन नहर काढून ते नहर सरळ रावणवाडी जलाशयापर्यंत येऊ शकते व त्या नहराने टेकेपार उपसा सिंचनाचे पाणी सरळ रावणवाडी जलाशयात पाडता येते. एकदाचे का पाणी रावणवाडी जलाशयात पडले तर त्या जलाशयापासून सोनेगाव, एटेवाई, गोलेवाडी या गावापासून नवीन नहर काढून ते पाणी त्या सातही गावातील शेतकऱ्यांना उपलब्ध होईल. (वार्ताहर)