शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Blast: २ वर्षांपासून सुरू होता स्फोटकं जमवण्याचा जीवघेणा खेळ; डॉ शाहीन शाहिदची कबुली
2
प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी खरी होणार? बिहार निवडणुकीच्या एक्झिट पोलने केले शिक्कामोर्तब!
3
रेखा झुनझुनवालांच्या पोर्टफोलिओतील पेनी स्टॉकची पुन्हा भरारी! ६ महिन्यात तोटा भरुन काढत ३४ टक्के वाढ
4
जपानचे १,००,००० येन भारतामध्ये किती रुपये होतात? तुम्हाला फायदा होतो की नुकसान, जाणून घ्या
5
सीमेपासून अवघ्या २० किमी अंतरावर नवं आव्हान?; बांगलादेश सैन्यानं भारताला दिलेला शब्द मोडला
6
Tata घराण्यात मोठा बदल, नोएल टाटांच्या मुलाला मिळाली मोठी जबाबदारी; परदेशातून घेतलंय शिक्षण
7
एके-47 ठेवणाऱ्या डॉ. शाहीनचे थेट महाराष्ट्राशी कनेक्शन; जैशच्या महिला विंगची निघाली मास्टरमाईंड
8
“जनतेची काम करतो म्हणून प्रत्येक समाज घटक ८-८ लाखाच्या फरकाने निवडून देतात”: अजित पवार
9
दिल्लीतील स्फोटामुळे 'कॉकटेल २'चं शूट पुढे ढकललं, आजपासूनच होणार होती सुरुवात
10
एकही रुपया न गुंतवता दरवर्षी कमावू शकता ₹२.८८ लाख; पाहा PPF च सीक्रेट, लोकही विचारतील कसं केलं?
11
धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज; सनी देओलच्या टीमने दिलं स्टेटमेंट, 'त्यांचं तुमच्यावर..."
12
Govinda Hospitalised : ६१ वर्षीय गोविंदाची अचानक तब्येत बिघडली, झाला बेशुद्ध, जुहूच्या रुग्णालयात दाखल
13
ATP Finals 2025: खेळ पाहण्यासाठी आलेल्या दोन चाहत्यांचा मृत्यू, क्रीडाविश्वात शोक!
14
इंजिनीअरिंग, फार्मसी, एमबीएची सीईटी वर्षातून दोनदा, यंदा एप्रिलमध्ये पहिली, तर मेमध्ये दुसरी सीईटी परीक्षा
15
महायुतीच्या त्सुनामीमुळे विरोधकांत भीती, आशिष शेलार यांचा टोला
16
आजचे राशीभविष्य, १२ नोव्हेंबर २०२५: आजचा दिवस आनंदी; पण 'या' राशीला स्त्रीमुळे अडचणीचा धोका
17
पोस्टरमुळे समोर आला डॉक्टरांचा दहशतवादी कट; स्फोटकांचा तपास यशस्वी, पण दिल्लीत कशी झाली चूक?
18
Delhi Blast: दिल्ली बॉम्बस्फोटावर पाकिस्ताननं काय म्हटलं? तुर्कीनं तर हद्द ओलांडली!
19
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, डॉक्टरांनी दिले हेल्थ अपडेट
20
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश

वैनगंगेला आले हिरव्या लॉनचे स्वरूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2019 01:04 IST

भंडारावासीयांची जीवनदायिनी असलेल्या वैनगंगा नदीवर ईकॉर्निया या जलपर्णी वनस्पतीने विळखा घातला असून सद्यस्थितीत वैनगंगेला हिरव्या लॉनचे स्वरूप प्राप्त झाले आहे. या वैनगंगेच्या पाण्यावर ईकॉर्निया जलपर्णी वनस्पती पसरली असून यामुळेही पाणी दूषित होत आहे.

ठळक मुद्देनदी शुद्धीकरणाचा फज्जा। ईकॉर्नियाच्या विळख्याने पाणी झाले दूषित

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : भंडारावासीयांची जीवनदायिनी असलेल्या वैनगंगा नदीवर ईकॉर्निया या जलपर्णी वनस्पतीने विळखा घातला असून सद्यस्थितीत वैनगंगेला हिरव्या लॉनचे स्वरूप प्राप्त झाले आहे. या वैनगंगेच्या पाण्यावर ईकॉर्निया जलपर्णी वनस्पती पसरली असून यामुळेही पाणी दूषित होत आहे.कारधा येथील या नदीला ईकॉर्निया या जलपर्णी वनस्पतीने पूर्णपणे आच्छादून टाकले आहे. दोन वर्षांपूर्वी या वनस्पती निर्मूलनाची मोहीम हाती घेण्यात आली होती. परंतु तिला पूर्णपणे यश आले नाही. पाहतापाहता या वनस्पतीचे क्षेत्र दिवसेंदिवस वाढत आहे. ही वनस्पती विषयुक्त नसली तरी या वनस्पतीमुळे नदीपात्रातील जलचर प्राण्यांना त्याचा फटका बसत आहे. याशिवाय ज्याठिकाणी पाणी संथगतीने वाहते किंवा पाण्याचा प्रवाह थांबलेला आहे, अशा ठिकाणी ही वनस्पती मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. या वनस्पतीमुळे पाण्याचे बाष्पीकरण होण्याचे प्रमाण वाढते. विशेषत: तलावात ही वनस्पती आढळते.गोसेखुर्द धरणामुळे वैनगंगेचे पाणी अडविण्यात आले. त्यात नाग नदीच्या दूषित पाण्यामुळे या नदीचे पाणी दूषित झाले आहे. त्यामुळे नदीकाठावरील गावांना त्याचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे. भविष्यात मानवी आरोग्याला धोका होण्याची शक्यता बळावली आहे.नदीपात्रात या वनस्पतीने शिरकाव केल्यामुळे ही वनस्पती समूळ नष्ट करण्यासाठी जिल्हा प्रशासन, लोकप्रतिनिधी तथा सामान्य नागरिकांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. भंडारा जिल्ह्याची जीवनदायिनी निर्मल व पवित्र वैनगंगा नदी असून या वैनगंगेच्या काठी अनेक धार्मिक स्थळे, शहर व गावे वसलेले आहे. प्राचीन काळापासून त्याचे पवित्र व शुद्ध जल पिऊन लोक तृप्त होत असतात.गोसे धरणातील जलसाठाने ३० ते ३५ किमी भंडारा कारधापर्यंत नदी दुथडी पाण्याने भरली आहे. मात्र नागपूर येथील घरातील सांडपाणी, गटारव्दारे निचरा होणारे अत्यंत दुषित व विविध केमीकल कंपन्यांचे वेस्टेज विषयुक्त पाणी नागनदीतून वाहत जाऊन वैनगंगा नदीच्या प्रवाहात मिसळल्याने वैनगंगा नदीचा पाणी दुषित, दुर्गंर्धीयुक्त, हिरवट व काळसर झाला आहे. शहर व नदीकिनाऱ्यालगत असणाºया अनेक गावातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहेत. पाणी पिण्यायोग्य नसल्याने जनावरे सुद्धा पाणी पिवुन मृत्युच्या दाढेत जात आहेत. तर मासोळयांचे जीवन संपुष्टात आले आहेत. दुषित पाण्यामुळे नागरिकांना कावीळ, डायरीया, हागवण यासारख्या विविध आजारांना सामोरे जावे लागत आहेत. नदीशुध्दीकरणाकडे सर्वांचेच दुर्लक्ष होत आहे.स्लो पॉयझन नागरिकांच्या जीवितास धोकाजिल्ह्यातील अनेक गावातील लोकांना अशुद्ध दुषीत पिण्याचे पाणी पुरविले जात आहेत. परिणामत: या दुषित पाणी व स्लो पॉयझनमुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झालेला आहे. वैनगंगेत येणारे नागनदीचे दुषीत पाणी त्वरीत रोखुन नंतर जलशुद्धीकरण यंत्राने शुद्ध करून वैनगंगा नदीत सोडावे व वैनगंगा या पाण्याने दुषीत झालेली असल्याने या नदीच्याही शुद्धीकरणाकरिता गंभीरतेने शासनस्तरावर योग्य उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी भंडारावासीयांनी केली आहे.

टॅग्स :riverनदी