शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
2
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
3
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
4
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
5
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
6
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
7
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
8
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
9
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
10
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
11
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
12
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा
13
परवाना परत करण्याचे कारण काय? गैरकृत्य होत असल्याचे अप्रत्यक्षपणे मान्य: अनिल परब
14
कांजूर डम्पिंग ग्राउंड सुरूच राहणार; सुप्रीम कोर्टाचा मुंबई पालिकेला मोठा दिलासा
15
पाकच्या मुलीशी कॉन्स्टेबलचा विवाह राष्ट्रीय सुरक्षेला धोका; सीआरपीएफचे कोर्टात स्पष्टीकरण
16
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
17
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
18
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
19
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
20
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…

रेती तस्करांना चुलबंदचे पात्र मोकळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2018 00:55 IST

बांधकामाकरिता रेती अत्यंत महत्वाची आहे. जिल्ह्यातील रेती घाट लिलावात नसल्याने रेती अत्यंत महत्वाची आहे. जिल्ह्यातील रेती घाट लिलावात नसल्याने रेती तस्कर सुसाट आहेत. दिवसरात्र रेती तस्करीने चुलबंद पात्र धोक्यात आले आहेत.

ठळक मुद्देमहसूल घशात : गौण खनिज अधिकाऱ्यांचे अक्षम्य दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कपालांदूर : बांधकामाकरिता रेती अत्यंत महत्वाची आहे. जिल्ह्यातील रेती घाट लिलावात नसल्याने रेती अत्यंत महत्वाची आहे. जिल्ह्यातील रेती घाट लिलावात नसल्याने रेती तस्कर सुसाट आहेत. दिवसरात्र रेती तस्करीने चुलबंद पात्र धोक्यात आले आहेत. जिल्ह्यातील गौण खनीज अधिकारी व महसूल अधिकारी फिरकत नसल्याने रेती तस्करांना रान मोकळे असल्याने भरधाव वेगाने मद्यपान करून ट्रॅक्टरने रेती चोरी सुरु आहे.शासकीय कार्यालयात अधिकाºयांना कामे संपत नसल्याने कार्यालयाबाहेर पडायला वेळ मिळत नसल्याची चर्चा आहे. नेमक्या अशाच संधीचे सोने करीत वाळू / रेती माफिये बेधुंदपणे रेतीची अवाढव्य भावाने रेती विकत आहेत. रेतीची मागणी अधिक तर पुरवठा कमी होत असल्याने रेतीचे भाव गगनाला भिडले आहेत. गरीबांच्या घरकुलाला राज्यपालांच्या आदेशाने पाच ट्रॅक्टर रेती मोफत मिळण्याचे दिवास्वप्न ठरले आहे. गरीबांकरिता नियमावली तंतोतंत लावली जाते.क्षुल्लक चिरीमिरी करिता तस्करांना पाठीशी घेतले जाते. राजकारणी / लोकप्रतिनिधीसुद्धा वास्तविकतेला समजत नसल्याने गरीबांच्या घरकुलांना न्याय मिळत नाही.पालांदूर परिसरात चुलबंदचे पात्र विस्तीर्ण असल्याने रेती अमाप असून दर्जेदार असल्याने संपूर्ण जिल्ह्यात वाढती मागणी आहे. घाट लिलावात नसल्याने व बांधकाम सुरुच असल्याने रेती अत्यावश्यक झाली आहे. ही गरज पूर्ण करण्याकरिता तस्कर मोबाईल नेटवर्कचा उपयोग करून मोहीम फत्ते करीत आहेत.रस्त्याचे हाल बेहालभरधावपणे रेती वहनाने आमरस्त्याची पूर्णत: वाट लागली आहे. चोरी तात्काळ व्हावी, कुणी रस्त्यात भेटू नये या भीतीने ट्रॅक्टर चालक कमालगतीने वाहने चालवितात. उघड्या ट्रॉलीतून रेती रस्त्यावर उडते. पादचाऱ्यांना डोळ्यात जाण्याची भीतीसुद्धा असते तरीपण बिनधास्त ट्रॅक्टरने रेती वहन सुरुच आहे.जिल्हाधिकारी लक्ष देतील काय?राज्यपाल महोदयांनी गरीबांच्या घरात अपेक्षित असलेली किमान पाच ब्रास रेती पुरविण्याचे आदेश दिले आहेत. मात्र त्यात असलेल्या अटी शर्तीमुळे तहसील कार्यालय रेती देण्यास समर्थ नसल्याचे पुढे आले आहे. यात नेमके कुणाचे कुठे आले हे तपासून गरीबांना न्याय देता येईल काय? मानवीय संवेदनशिलता दाखवून रेती तस्करांपासून गरीबांना वाचविता येईल काय? जिल्हाधिकारी याकडे प्रामाणिकपणे लक्ष पुरवितील काय? निश्चित रकमेत घरकुल पूर्ण होईल काय? या प्रश्नाकडे जिल्हाधिकारी लक्ष देतील काय? आदी प्रश्नांवर चावडीत चर्चा होत आहे.मोठ्या प्रयत्नांनी मऱ्हेगाव जुना नाल्यावर पुल बांधण्यात आले. या पुलामुळे मऱ्हेगाववासीयांना जीवन जगणे सोपे झाले आहे. पण आता हा पुलिया रेतीतस्करांच्या कचाट्यात सापडला असून पुलाच्या अग्रभागी मोठा खड्डा पडल्याने अपघाताची शक्यता बळावली आहे.