शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

दुसऱ्या दिवशी सात नामांकन दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2021 05:00 IST

निवडणुकीसाठी कोणत्याही पक्षाने अद्याप अधिकृत उमेदवारांची घोषणा केली नाही. त्यामुळे सर्वच जण उमेदवारीच्या घोषणेची प्रतीक्षा करीत आहेत. अंतिम दिनांक सोमवार ६ डिसेंबर असल्याने येत्या दोन दिवसात उमेदवारांची घोषणा होईल आणि त्यानंतर नामांकन दाखल करण्यासाठी गर्दी होणार आहे. अर्ज दाखल करण्यासाठी राजकीय पक्षांची वेट अँड वाॅचची भूमिका आहे. उमेदवारांना अर्ज ऑनलाईन भरायचे आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या नामांकनासाठी गुरुवारी दुसऱ्या दिवशी सात नामांकन दाखल झाले. त्यात जिल्हा परिषदेसाठी चार तर पंचायत समितीसाठी तीन नामांकनाचा समावेश आहे. विशेष म्हणजे पहिल्या दिवशी एकही नामांकन दाखल झाले नव्हते. नामांकनाच्या शेवटच्या दिवशी अर्ज भरणाऱ्यांची गर्दी होण्याची शक्यता आहे.भंडारा जिल्हा परिषदेच्या ५२ आणि पंचायत समितीच्या १०४ जागांसाठी २१ डिसेंबर रोजी मतदान होत आहे. १ डिसेंबर पासून नामांकनाला प्रारंभ झाला असून नामांकन दाखल करण्याचा अंतिम दिनांक ६ डिसेंबर आहे. दुसऱ्या दिवशी भंडारा तालुक्यातून जिल्हा परिषदेसाठी खमारी आणि धारगाव गटातून प्रत्येकी एक असे दोन अर्ज दाखल झाले तर मोहाडी तालुक्यातील जिल्हा परिषदेसाठी पाचगाव आणि करडी तर पंचायत समितीसाठी खमारी बुज., पाचगाव आणि मोहगाव (देवी) येथे प्रत्येकी एक असे पाच अर्ज दाखल झाले आहेत. तुमसर, साकोली, लाखनी, पवनी आणि लाखांदूरमध्ये दुसऱ्या दिवशी एकही नामांकन दाखल झाले नाही.निवडणुकीसाठी कोणत्याही पक्षाने अद्याप अधिकृत उमेदवारांची घोषणा केली नाही. त्यामुळे सर्वच जण उमेदवारीच्या घोषणेची प्रतीक्षा करीत आहेत. अंतिम दिनांक सोमवार ६ डिसेंबर असल्याने येत्या दोन दिवसात उमेदवारांची घोषणा होईल आणि त्यानंतर नामांकन दाखल करण्यासाठी गर्दी होणार आहे.अर्ज दाखल करण्यासाठी राजकीय पक्षांची वेट अँड वाॅचची भूमिका आहे. उमेदवारांना अर्ज ऑनलाईन भरायचे आहे. त्यातच उमेदवार अद्याप जाहीर झाले नाही. काही पक्षांचे मुलाखतीचे सत्र सुरु आहे. त्यामुळे अखेरच्या दोन दिवसात उमेदवारांची घोषणा होऊन नामांकन दाखल होण्याची शक्यता आहे. तुर्तास तरी सर्वांची वेट अँड वाॅचची भूमिका आहे. सर्वांच्या नजरा आता कुणाला उमेदवारी मिळते याकडे लागले आहे.नगरपंचायतीत दुसऱ्या दिवशीही नामांकन नाही- जिल्ह्यातील मोहाडी, लाखनी आणि लाखांदूर या तीन नगरपंचायतीची निवडणूक होत आहे. नामांकनाला १ डिसेंबरपासून प्रारंभ झाला. परंतु दुसऱ्या दिवशीही एकही नामांकन जिल्ह्यात दाखल झाले नाही. नामांकन दाखल करण्याची अंतिम तिथी ७ डिसेंबर असल्याने शेवटच्या दोन दिवसात येथेही गर्दी होणार आहे.

बंडखोरी टाळण्यासाठी शेवटच्या टप्प्यात घोषणा- जागा एक आणि दावेदार अनेक अशी स्थिती जिल्हापरिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत आहे. त्यामुळे तिकीट न मिळालेले बंडखोरी करण्याची शक्यता आहे. ही बंडखोरी टाळण्यासाठी शेवटच्या टप्प्यात उमेदवाराची घोषणा केली जाणार आहे.

 

टॅग्स :ZP Electionजिल्हा परिषद