साकोली : भंडारा जिल्ह्यातील संजय गांधी, श्रावणबाळ, निराधार योजनेची अनेक प्रकरणे प्रलंबित आहेत. अनेक निराधार, गरजू, वंचित, बालक, महिला व वृद्ध या योजनेपासून दूर असून खरा लाभार्थी या योजनेच्या माध्यमातून जगण्यांचा प्रयत्न करीत असतो. त्यामूळे या योजनेवर अवलंबून असलेल्या अनेक व्यक्तींवर उपासमारीची पाळी आली आहे. त्यामुळे ही योजना अधिकाऱ्यांनी काटेकोरपणे राबवावी तसेच या प्रकरणांचा निपटारा तातडीने करण्यात यावा, अशी मागणी रामरतन चांदेवार यांनी केली आहे.संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत विधवा, अपंग, अंध, अनाथ, घटस्फोटीत, आत्महत्या केलेल्या शेतकरी विधवा, मुले यांना मासीक ४०० रूपये राज्य व केंद्रसरकार कडून मिळत असते. ६५ वर्षे पुर्ण केलेल्या दारिद्र्य रेषेखालील व गरीब वृद्धांना सुद्धा ६०० रूपये अनुदान मिळते. यामुळे आज त्यांना सन्मानाने जीवन जगता येत आहे. ही शासनाची योजना स्तृत्य असली तरी अनेक गावचे तलाठी, तालुक्यांचे अधिकारी गोर-गरीबापर्यंत ही योजना पोहचवण्याचे स्वारस्व दाखवित नाही. विविध योजनेत लाभ देतानी संजय गांधी व श्रावण बाळ योजना असो खरे लाभार्थी दूर असून दलाल व अधिकाऱ्यांच्या संगणमताने श्रीमंत लोकांचा भरना अधिक दिसत आहे. यामुळे अनेक लाभार्थ्यांवर उपासमारीची वेळ आली असून शासनाची ही योजना कुचकामी ठरत आहे. निराधार योजनेच्या लाभार्थ्यांची निवडही शासनाच्या निकषानुसार होते. (तालुका प्रतिनिधी)
निराधार योजनांच्या प्रलंबित प्रकरणाचा निपटारा करा
By admin | Updated: June 12, 2014 23:48 IST