शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

दुय्यम निबंधक कार्यालयावर गंभीर आरोप – शेतकऱ्यांच्या जमिनीची बनावट विक्री?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2025 15:03 IST

सामाईक जमिनीचे विक्रीपत्र प्रकरण : कारवाईची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्ककोंढा (कोसरा) : सामाईक शेतजमिनीचे विक्रीपत्र करताना सर्व शेतकरी विक्रीपत्राच्या वेळी हजर असणे आवश्यक आहे. असे असताना तीनपैकी एका शेतकऱ्याने विक्रीपत्र करून देण्याचा प्रकार पवनी येथील दुय्यम निबंधक कार्यालयात झाला. यामध्ये आर्थिक व्यवहार झाला असून दुय्यम निबंधक व इतर यामध्ये दोषी आहेत. त्यांच्यावर कारवाईची मागणी आहे. 

पवनी तालुक्यातील भुयार येथील खाते क्रमांक १०३०६ गट नंबर ५७४ वर ४.४१ हे. आर. शेतजमीन नवनाथ तुळशीराम अलोने, देवीदास बळीराम अलोने, रामदास बळीराम अलोने यांची नावे ७/१२ वर आहे. या जमिनीचे खरेदी विक्री दुय्यम निबंधक कार्यालय पवनी येथे २७ मार्च २०२५ करण्यात आले. त्यामध्ये विक्री पत्रात ४.४१ हे.आर. पैकी १.४७ हे. आर. शेतजमीन रामदास बळीराम अलोने यांनी विद्या रामू सोनवणे, विशाल पंढरी सिंदूरकर यांना १५ लाख रुपये यामध्ये विक्रीपत्र करून दिले. विक्रीपत्र करताना नवनाथ तुळशीराम अलोणे व देवीदास बळीराम अलोणे यांची कोणत्याही प्रकारची सहमती दस्तावेजामध्ये घेतली नाही. 

नवनाथ अलोणे व देवीदास अलोणे यांच्या लक्षात आल्यानंतर तलाठी भुयार यांना पत्र देऊन जमिनीचा फेरफार रोखण्याची मागणी केली. परंतु त्यांनीही फेरफार रोखले नाही. आपल्याला न्याय मिळणार नाही आपली परवानगी न करता या जमिनीचे विक्रीपत्र दुय्यम निबंध कार्यालयातर्फे करण्यात आले. असे प्रकार दुय्यम निबंधक पवनी कार्यालयातर्फे अनेकदा झालेले आहे.

यापूर्वी कोंढा येथील एका विक्रीपत्रात सामाईक क्षेत्र असलेल्या शेतजमिनीची विक्रीपत्र केले असल्याचे समजते. यामध्ये गैरव्यवहार केला असल्याचे समजते. शेतजमिनीचे झालेले विक्रीपत्र रद्द करण्यात यावे, अशी मागणी नवनाथ तुळशीराम अलोणे व देवीदास बळीराम अलोणे यांनी वरिष्ठांकडे केलेल्या लेखी तक्रारीत नमूद आहे.

येथे आर्थिक देवाण-घेवाण केल्याशिवाय कोणत्याही प्रकारचे विक्रीपत्र, बोजापत्र, हक्कसोड दस्ताऐवज नोंदणी केले जात नाही. दुय्यम निबंधक व येथील दलालांना मोठी रक्कम दिल्यानंतर अनेक प्रकारचे दोषपूर्ण खरेदी-विक्री केले जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

"दुय्यम निबंधक कार्यालय पवनी तर्फे खोटे दस्तऐवज केले जात नाही. माझ्याकडे दस्ताऐवज घेऊन कार्यालयात यावे. नंतर त्याची सविस्तर माहिती देईन."- प्रविण तोवर, दुय्यम निबंधक श्रेणी १, पवनी

टॅग्स :bhandara-acभंडारा