शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
2
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
3
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
4
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
5
"भगवा झेंडा पाहून TMC चा लाठीचार्ज, गुंडांना पोलिसांच्या मागे लपवणं..."; ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
6
Viral Video: भगवान विष्णूची कंबोडियातील मूर्ती लष्कराने पाडली, व्हायरल होत असलेला व्हिडीओचे सत्य काय?
7
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
8
भाजपाला धक्का, महादेव जानकरांची काँग्रेससोबत आघाडी, एकत्र निवडणूक लढवणार  
9
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
10
'धुरंधर'च्या यशावर रणवीर सिंह गप्प का? सिनेमातील 'डोंगा'नेच दिली प्रतिक्रिया; म्हणाला...
11
Taurus Yearly Horoscope 2026: वृषभ राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल, प्रतिभा आणि संयमाची कसोटी; 'या' वर्षात कुटुंबाची साथ ठरेल यशाची गुरुकिल्ली!
12
"पराभव समोर दिसताच भाजप पैसा आणि जातीचे राजकारण सुरू करते" आदित्य ठाकरेंची बोचरी टीका!
13
विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
14
नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
15
जपानमध्ये शंभरी पार करणार्‍यांची संख्या लक्षावधी, महिलांचे प्रमाण अधिक; दीर्घायुष्याचे गुपित काय?
16
युतीची घोषणा मात्र जागांचा सस्पेन्स; उद्धवसेना-मनसेत जागावाटपावर 'असा' ठरलाय फॉर्म्युला?
17
सोनं थांबेना, चांदी आवरेना! सोन्याच्या दरात ७०% तर चांदीत १५० टक्क्यांची वाढ; पाहा कुठे पोहोचतील किमती?
18
राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश
19
Christmas Sale 2025: स्मार्टफोन, कपडे आणि घरगुती उपकरणांवर सवलतींचा पाऊस; वर्षाच्या शेवटी कुठे आहेत बंपर ऑफर्स
20
रोहितच्या शतकानं मन भरलं नाही! चाहत्याची थेट मुंबईचा कर्णधार शार्दुल ठाकूरला विनंती! आम्हाला...
Daily Top 2Weekly Top 5

विद्यादानाच्या पवित्र मंदिरात विद्यार्थ्यांना स्वयंरोजगाराचे धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2019 00:15 IST

चार भिंतीच्या आड केवळ पुस्तकी ज्ञान मिळते. परंतु या पुस्तकी ज्ञानात विद्यार्थ्यांना मर्यादित न ठेवता निसर्गाच्या सानिध्यातून जीवन समृद्ध करण्याचा उपक्रम सध्या लाखनी तालुक्यातील निमगावच्या शाळेत सुरू आहे.

ठळक मुद्देस्किल इंडिया : निमगावच्या जिल्हा परिषद शाळेत पत्रावळी, द्रोण तयार करण्याचे प्रशिक्षण

मुखरू बागडे ।लोकमत न्यूज नेटवर्कपालांदूर : चार भिंतीच्या आड केवळ पुस्तकी ज्ञान मिळते. परंतु या पुस्तकी ज्ञानात विद्यार्थ्यांना मर्यादित न ठेवता निसर्गाच्या सानिध्यातून जीवन समृद्ध करण्याचा उपक्रम सध्या लाखनी तालुक्यातील निमगावच्या शाळेत सुरू आहे. स्किल इंडियाला शोभेल असा हा उपक्रम असून विद्यार्थ्यांना पळसाच्या पानापासून पत्रावळी आणि द्रोण तयार करण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे. या पत्रावळी आणि द्रोणांची अल्प दरात विक्री केली जात आहे.निमगाव येथील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक डमदेव कहालकर हे उपक्रमशिल शिक्षक म्हणून जिल्ह्यात प्रसिद्ध आहेत. विविध उपक्रम राबविताना आता त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये जीवनविषयक कौशल्य निर्माण करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. स्किल इंडिया ही शासनाची योजना असली तरी शालेय विद्यार्थ्यांपर्यंत ती पोहचली नाही. मात्र निमगावच्या शाळेतील विद्यार्थी स्किल इंडियाचा अनुभव घेत द्रोण आणि पत्रावळी लिलया तयार करीत आहे.ग्रामीण भागात पूर्वी पत्रावळीला मोठी मागणी होती. मात्र अलीकडे प्लॉस्टिकचा वापर वाढला. पळस आणि मोहा पानापासून तयार होणारी पत्रावळी हद्दपार झाली. परंतु शासनाने आता प्लॉस्टिकवर बंदी आणली. पर्यायाने लग्न समारंभात पानाच्या पत्रवाळीचा उपयोग होवू लागला. मात्र पत्रावळी तयार करणारे गावात कोणी उरलेच नाही. ही उणीव लक्षात घेवून मुख्याध्यापक डमदेव कहालकर, शिक्षक विजय डाभरे, रामकृष्ण कमाने, मीरा कहालकर, भास्कर गरपडे यांनी विद्यार्थ्यांना पत्रावळी तयार करण्याचे प्रशिक्षण निश्चय केला. आता विद्यार्थी पळसाच्या पानापासून पत्रावळी बनवित आहेत. गावाशेजारी माळरानावरून पळसाचे पाने तोडून आणून त्यापासून पत्रावळी तयार होत आहे. विद्यार्थीही उत्साहाने यात सहभागी होत आहेत.अल्प दरात पत्रावळीची विक्रीविद्यार्थ्यांनी तयार केलेल्या या पत्रावळीची अत्यल्प दरात विक्री करण्याचा शिक्षकांचा मनोदय आहे. या उपक्रमातून हाती येणारा पैसा शाळा, परिसर विकासासाठी लावला जाणार आहे. शिक्षकांचा हा उपक्रम सर्वांसाठी कौतुकाचा विषय झाला आहे. निसर्गाशी नाते जोडत अनोख्या संस्कृतीशी सांगड घालणारा हा उपक्रम होय. शाळेत विद्यार्थी सकाळपासून उपस्थित राहून पत्रावळी तयार करतात. पत्रावळी आणि द्रोण कसे तयार करायचे यांचे त्यांना प्रशिक्षण दिल्या जातो. कौशल्य भारत, कुशल भारत योजना जणू निमगावच्या शाळेत शिक्षक राबवित असल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :Educationशिक्षण