शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
2
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
3
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
4
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
5
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
6
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
7
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
8
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
9
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
10
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
11
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
12
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
13
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
14
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
15
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
16
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
17
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
18
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
19
UP: बेकायदेशीर औषधाविरुद्ध योगी सरकारची कडक कारवाई; ४ दिवसांत १६ गुन्हे दाखल, २५ दुकानांवर बंदी!
20
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!

विद्यादानाच्या पवित्र मंदिरात विद्यार्थ्यांना स्वयंरोजगाराचे धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2019 00:15 IST

चार भिंतीच्या आड केवळ पुस्तकी ज्ञान मिळते. परंतु या पुस्तकी ज्ञानात विद्यार्थ्यांना मर्यादित न ठेवता निसर्गाच्या सानिध्यातून जीवन समृद्ध करण्याचा उपक्रम सध्या लाखनी तालुक्यातील निमगावच्या शाळेत सुरू आहे.

ठळक मुद्देस्किल इंडिया : निमगावच्या जिल्हा परिषद शाळेत पत्रावळी, द्रोण तयार करण्याचे प्रशिक्षण

मुखरू बागडे ।लोकमत न्यूज नेटवर्कपालांदूर : चार भिंतीच्या आड केवळ पुस्तकी ज्ञान मिळते. परंतु या पुस्तकी ज्ञानात विद्यार्थ्यांना मर्यादित न ठेवता निसर्गाच्या सानिध्यातून जीवन समृद्ध करण्याचा उपक्रम सध्या लाखनी तालुक्यातील निमगावच्या शाळेत सुरू आहे. स्किल इंडियाला शोभेल असा हा उपक्रम असून विद्यार्थ्यांना पळसाच्या पानापासून पत्रावळी आणि द्रोण तयार करण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे. या पत्रावळी आणि द्रोणांची अल्प दरात विक्री केली जात आहे.निमगाव येथील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक डमदेव कहालकर हे उपक्रमशिल शिक्षक म्हणून जिल्ह्यात प्रसिद्ध आहेत. विविध उपक्रम राबविताना आता त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये जीवनविषयक कौशल्य निर्माण करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. स्किल इंडिया ही शासनाची योजना असली तरी शालेय विद्यार्थ्यांपर्यंत ती पोहचली नाही. मात्र निमगावच्या शाळेतील विद्यार्थी स्किल इंडियाचा अनुभव घेत द्रोण आणि पत्रावळी लिलया तयार करीत आहे.ग्रामीण भागात पूर्वी पत्रावळीला मोठी मागणी होती. मात्र अलीकडे प्लॉस्टिकचा वापर वाढला. पळस आणि मोहा पानापासून तयार होणारी पत्रावळी हद्दपार झाली. परंतु शासनाने आता प्लॉस्टिकवर बंदी आणली. पर्यायाने लग्न समारंभात पानाच्या पत्रवाळीचा उपयोग होवू लागला. मात्र पत्रावळी तयार करणारे गावात कोणी उरलेच नाही. ही उणीव लक्षात घेवून मुख्याध्यापक डमदेव कहालकर, शिक्षक विजय डाभरे, रामकृष्ण कमाने, मीरा कहालकर, भास्कर गरपडे यांनी विद्यार्थ्यांना पत्रावळी तयार करण्याचे प्रशिक्षण निश्चय केला. आता विद्यार्थी पळसाच्या पानापासून पत्रावळी बनवित आहेत. गावाशेजारी माळरानावरून पळसाचे पाने तोडून आणून त्यापासून पत्रावळी तयार होत आहे. विद्यार्थीही उत्साहाने यात सहभागी होत आहेत.अल्प दरात पत्रावळीची विक्रीविद्यार्थ्यांनी तयार केलेल्या या पत्रावळीची अत्यल्प दरात विक्री करण्याचा शिक्षकांचा मनोदय आहे. या उपक्रमातून हाती येणारा पैसा शाळा, परिसर विकासासाठी लावला जाणार आहे. शिक्षकांचा हा उपक्रम सर्वांसाठी कौतुकाचा विषय झाला आहे. निसर्गाशी नाते जोडत अनोख्या संस्कृतीशी सांगड घालणारा हा उपक्रम होय. शाळेत विद्यार्थी सकाळपासून उपस्थित राहून पत्रावळी तयार करतात. पत्रावळी आणि द्रोण कसे तयार करायचे यांचे त्यांना प्रशिक्षण दिल्या जातो. कौशल्य भारत, कुशल भारत योजना जणू निमगावच्या शाळेत शिक्षक राबवित असल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :Educationशिक्षण