शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

सुरक्षा भिंत उरली नावापुरती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 01:22 IST

गोसेखुर्द धरणांतर्गत वैनगंगा नदीतील बॅक वॉटर शहरात शिरु नये यासाठी जवळपास दिड दशकांपुर्वी शहराच्या सभोवताल उभारण्यात आलेली सुरक्षा भिंत नावापुरती उरली आहे.

ठळक मुद्देकोट्यवधी रुपयांचा चुराडा : दीड दशकांपासून बांधकामाची प्रतीक्षा

इंद्रपाल कटकवार ।आॅनलाईन लोकमतभंडारा : गोसेखुर्द धरणांतर्गत वैनगंगा नदीतील बॅक वॉटर शहरात शिरु नये यासाठी जवळपास दिड दशकांपुर्वी शहराच्या सभोवताल उभारण्यात आलेली सुरक्षा भिंत नावापुरती उरली आहे. भिंतीच्या जवळून गेलेल्या बायपास रस्त्याचेही हाल झाले असून या बांधकामासाठी लागलेले कोट्यवधी रुपये पाण्यात गेले काय? असा सवाल उपस्थित होवू लागला आहे.विदर्भातील महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणून गणला जाणारा गोसेखुर्द (इंदिरा सागर) प्रकल्प पुर्ण झालेला आहे. परंतु पुनर्वसनाची कामे अजूनही सुरुच आहेत. याचाच एक भाग म्हणून भंडारा शहरात वैनगंगा नदीतील बॅक वॉटर शहरात शिरु नये यासाठी वैनगंगा नदीच्या काठावर तद्वतच शहराच्या सिमेवर सुरक्षा भिंत उभारण्याचे काम सुरु करण्यात आले. जवळपास दिड दशकांपुर्वी बांधकामाला सुरुवात करण्यात आली. पिंडकेपार (कोरंभी) ते शहराला वळसा घालून भंडारा-वरठी राज्यमार्गावरील आठवले समाजकार्य महाविद्यालयामागील परिसरातून सुरक्षा भिंतीचे बांधकामाचे काम हाती घेण्यात आले. तत्कालीन बांधकामात जवळपास ९० कोटी रुपये खर्च करण्यात आल्याची बाब तेव्हा ऐकीवात होती. पिंडकेपार हद्दीतून ते आयटीआय पर्यंतच्या भागातील एकूण १० किलो मिटर लांबीची सुरक्षा भिंती माती व काळ्या दगडांच्या सहाय्याने बांधण्यात आले. मात्र त्यानंतर उंचीवरील रस्त्याचे बांधकाम आजही जैसे थे असे आहे.याशिवाय या सुरक्षा भिंतीला लागून असलेला रस्ता जागोजागी फुटलेला असून मोठ्या प्रमाणात गिट्टी उखडल्याने रहदारीला अडचण निर्माण होत आहे. सद्य स्थितीत या मार्गाहून आजही जड वाहतूक सुरु आहे. महामार्गावर वाहतुकीचे टेंशन वाढल्यास याच बायपास मार्गाचा अवलंब करण्यात येतो, हे येथे विशेष.रस्त्यावर झाडे अन् खड्डेच खड्डेदहा किलोमीटर लांबीच्या सुरक्षा भिंतीला लागून असलेल्या रस्त्यावर लहान झाडीझूडपे व झाडे वाढलेली आहेत. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे निर्माण झाले आहेत. पावसाळ्यात या रस्त्यातून जाणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखे आहे. उन्हाळ्याची सुरुवात झाली असून पावसाळ्याला बराच कालावधी शिल्लक आहे. उन्हाळ्यात या सुरक्षा भिंतीचे काम पुन्हा सुरु करुन जड वाहनांना चांगला मार्ग रहदारीसाठी सुरु करता येवू शकतो. जिल्हाधिकाऱ्यांनी याकडे जातीने लक्ष घालून शहराला भविष्यकालीन संभाव्य पुरपरिस्थीतीपासून बचाव तथा विकास कामाकडे जोर देणे गरजेचे झाले आहे. बहुतांश ठिकाणी पुलाचे बांधकामही अजूनपर्यंत झालेले नाही.