शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
2
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
3
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
4
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
5
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
6
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
7
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
8
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
9
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
10
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
11
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
12
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
13
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
14
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
15
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
16
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
17
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
18
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
19
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
20
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास

सुरक्षा भिंत उरली नावापुरती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 01:22 IST

गोसेखुर्द धरणांतर्गत वैनगंगा नदीतील बॅक वॉटर शहरात शिरु नये यासाठी जवळपास दिड दशकांपुर्वी शहराच्या सभोवताल उभारण्यात आलेली सुरक्षा भिंत नावापुरती उरली आहे.

ठळक मुद्देकोट्यवधी रुपयांचा चुराडा : दीड दशकांपासून बांधकामाची प्रतीक्षा

इंद्रपाल कटकवार ।आॅनलाईन लोकमतभंडारा : गोसेखुर्द धरणांतर्गत वैनगंगा नदीतील बॅक वॉटर शहरात शिरु नये यासाठी जवळपास दिड दशकांपुर्वी शहराच्या सभोवताल उभारण्यात आलेली सुरक्षा भिंत नावापुरती उरली आहे. भिंतीच्या जवळून गेलेल्या बायपास रस्त्याचेही हाल झाले असून या बांधकामासाठी लागलेले कोट्यवधी रुपये पाण्यात गेले काय? असा सवाल उपस्थित होवू लागला आहे.विदर्भातील महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणून गणला जाणारा गोसेखुर्द (इंदिरा सागर) प्रकल्प पुर्ण झालेला आहे. परंतु पुनर्वसनाची कामे अजूनही सुरुच आहेत. याचाच एक भाग म्हणून भंडारा शहरात वैनगंगा नदीतील बॅक वॉटर शहरात शिरु नये यासाठी वैनगंगा नदीच्या काठावर तद्वतच शहराच्या सिमेवर सुरक्षा भिंत उभारण्याचे काम सुरु करण्यात आले. जवळपास दिड दशकांपुर्वी बांधकामाला सुरुवात करण्यात आली. पिंडकेपार (कोरंभी) ते शहराला वळसा घालून भंडारा-वरठी राज्यमार्गावरील आठवले समाजकार्य महाविद्यालयामागील परिसरातून सुरक्षा भिंतीचे बांधकामाचे काम हाती घेण्यात आले. तत्कालीन बांधकामात जवळपास ९० कोटी रुपये खर्च करण्यात आल्याची बाब तेव्हा ऐकीवात होती. पिंडकेपार हद्दीतून ते आयटीआय पर्यंतच्या भागातील एकूण १० किलो मिटर लांबीची सुरक्षा भिंती माती व काळ्या दगडांच्या सहाय्याने बांधण्यात आले. मात्र त्यानंतर उंचीवरील रस्त्याचे बांधकाम आजही जैसे थे असे आहे.याशिवाय या सुरक्षा भिंतीला लागून असलेला रस्ता जागोजागी फुटलेला असून मोठ्या प्रमाणात गिट्टी उखडल्याने रहदारीला अडचण निर्माण होत आहे. सद्य स्थितीत या मार्गाहून आजही जड वाहतूक सुरु आहे. महामार्गावर वाहतुकीचे टेंशन वाढल्यास याच बायपास मार्गाचा अवलंब करण्यात येतो, हे येथे विशेष.रस्त्यावर झाडे अन् खड्डेच खड्डेदहा किलोमीटर लांबीच्या सुरक्षा भिंतीला लागून असलेल्या रस्त्यावर लहान झाडीझूडपे व झाडे वाढलेली आहेत. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे निर्माण झाले आहेत. पावसाळ्यात या रस्त्यातून जाणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखे आहे. उन्हाळ्याची सुरुवात झाली असून पावसाळ्याला बराच कालावधी शिल्लक आहे. उन्हाळ्यात या सुरक्षा भिंतीचे काम पुन्हा सुरु करुन जड वाहनांना चांगला मार्ग रहदारीसाठी सुरु करता येवू शकतो. जिल्हाधिकाऱ्यांनी याकडे जातीने लक्ष घालून शहराला भविष्यकालीन संभाव्य पुरपरिस्थीतीपासून बचाव तथा विकास कामाकडे जोर देणे गरजेचे झाले आहे. बहुतांश ठिकाणी पुलाचे बांधकामही अजूनपर्यंत झालेले नाही.