शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

सुरक्षा भिंत उरली नावापुरती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 01:22 IST

गोसेखुर्द धरणांतर्गत वैनगंगा नदीतील बॅक वॉटर शहरात शिरु नये यासाठी जवळपास दिड दशकांपुर्वी शहराच्या सभोवताल उभारण्यात आलेली सुरक्षा भिंत नावापुरती उरली आहे.

ठळक मुद्देकोट्यवधी रुपयांचा चुराडा : दीड दशकांपासून बांधकामाची प्रतीक्षा

इंद्रपाल कटकवार ।आॅनलाईन लोकमतभंडारा : गोसेखुर्द धरणांतर्गत वैनगंगा नदीतील बॅक वॉटर शहरात शिरु नये यासाठी जवळपास दिड दशकांपुर्वी शहराच्या सभोवताल उभारण्यात आलेली सुरक्षा भिंत नावापुरती उरली आहे. भिंतीच्या जवळून गेलेल्या बायपास रस्त्याचेही हाल झाले असून या बांधकामासाठी लागलेले कोट्यवधी रुपये पाण्यात गेले काय? असा सवाल उपस्थित होवू लागला आहे.विदर्भातील महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणून गणला जाणारा गोसेखुर्द (इंदिरा सागर) प्रकल्प पुर्ण झालेला आहे. परंतु पुनर्वसनाची कामे अजूनही सुरुच आहेत. याचाच एक भाग म्हणून भंडारा शहरात वैनगंगा नदीतील बॅक वॉटर शहरात शिरु नये यासाठी वैनगंगा नदीच्या काठावर तद्वतच शहराच्या सिमेवर सुरक्षा भिंत उभारण्याचे काम सुरु करण्यात आले. जवळपास दिड दशकांपुर्वी बांधकामाला सुरुवात करण्यात आली. पिंडकेपार (कोरंभी) ते शहराला वळसा घालून भंडारा-वरठी राज्यमार्गावरील आठवले समाजकार्य महाविद्यालयामागील परिसरातून सुरक्षा भिंतीचे बांधकामाचे काम हाती घेण्यात आले. तत्कालीन बांधकामात जवळपास ९० कोटी रुपये खर्च करण्यात आल्याची बाब तेव्हा ऐकीवात होती. पिंडकेपार हद्दीतून ते आयटीआय पर्यंतच्या भागातील एकूण १० किलो मिटर लांबीची सुरक्षा भिंती माती व काळ्या दगडांच्या सहाय्याने बांधण्यात आले. मात्र त्यानंतर उंचीवरील रस्त्याचे बांधकाम आजही जैसे थे असे आहे.याशिवाय या सुरक्षा भिंतीला लागून असलेला रस्ता जागोजागी फुटलेला असून मोठ्या प्रमाणात गिट्टी उखडल्याने रहदारीला अडचण निर्माण होत आहे. सद्य स्थितीत या मार्गाहून आजही जड वाहतूक सुरु आहे. महामार्गावर वाहतुकीचे टेंशन वाढल्यास याच बायपास मार्गाचा अवलंब करण्यात येतो, हे येथे विशेष.रस्त्यावर झाडे अन् खड्डेच खड्डेदहा किलोमीटर लांबीच्या सुरक्षा भिंतीला लागून असलेल्या रस्त्यावर लहान झाडीझूडपे व झाडे वाढलेली आहेत. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे निर्माण झाले आहेत. पावसाळ्यात या रस्त्यातून जाणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखे आहे. उन्हाळ्याची सुरुवात झाली असून पावसाळ्याला बराच कालावधी शिल्लक आहे. उन्हाळ्यात या सुरक्षा भिंतीचे काम पुन्हा सुरु करुन जड वाहनांना चांगला मार्ग रहदारीसाठी सुरु करता येवू शकतो. जिल्हाधिकाऱ्यांनी याकडे जातीने लक्ष घालून शहराला भविष्यकालीन संभाव्य पुरपरिस्थीतीपासून बचाव तथा विकास कामाकडे जोर देणे गरजेचे झाले आहे. बहुतांश ठिकाणी पुलाचे बांधकामही अजूनपर्यंत झालेले नाही.