शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस ५० टक्के आरक्षणाची मर्यादा हटवेल, दलित आणि मागासवर्गीयांचा कोटा वाढवेल: राहुल गांधी
2
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
3
"असं असेल तर MS Dhoni ने खेळूच नये..."; Harbhajan Singh भडकला, CSK vs PBKS सामन्यानंतर व्यक्त केला संताप
4
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
5
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
6
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
7
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
8
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
9
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...
10
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं
11
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला किती मिळणार? देवेंद्र फडणवीसांनी सांगितला आकडा
12
Israel Hamas War : इस्रायली लष्कराचा पॅलेस्टिनी नागरिकांना अल्टिमेटम, मोठ्या हल्ल्याची भीती
13
Closing Bell: सेन्सेक्स किंचित तेजीसह तर, निफ्टी घसरणीसह बंद; टायटनमध्ये मोठी घसरण, IT शेअर्स चमकले
14
IPL 2024 Playoff qualification scenario : १६ सामने, ४ जागा अन् ९ संघ शर्यतीत; वाचा मुंबई इंडियन्सचं गणित कसं जुळेल
15
Income Tax Return : आयटीआर फाईल करण्यासाठी का आवश्यक आहे Form 16? नसेल तर काय करू शकता?
16
Kangana Ranaut : "निवडणूक जिंकली तर..."; बॉलिवूड क्वीन कंगना राणौतची फिल्मी करिअरबाबत मोठी घोषणा
17
Rahul Gandhi : "संविधान बदलण्यासाठी 400 जागांचा नारा पण 150 जागाही मिळणार नाहीत"; राहुल गांधींचं टीकास्त्र
18
आम्हाला धोनी आपल्या संघात हवाय? चाहत्याची मागणी; पंजाबची मालकीण प्रीतीचं भारी उत्तर
19
पराभवाच्या भीतीने नरेंद्र मोदींच्या तोंडी हिंदू-मुस्लीम आणि पाकिस्तानची भाषा, काँग्रेसचं टीकास्र
20
बारामतीत गुंडांकडून प्रचार, रोहित पवार आणि अमोल मिटकरी आमने-सामने, गंभीर आरोप प्रत्यारोप

‘जय’च्या बेपत्ता होण्याचे गूढ कायमच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2019 12:28 AM

महाराष्ट्रातील सर्वात मोठा, भारतातील क्रमांक दोनचा वाघ असलेला आणि आशियाचा आयकॉन ठरलेला जय नामक वाघ बेपत्ता होऊन आता तीन वर्ष झाली. या तीन वर्षात जयचा शोध घेण्यात वनविभागाला अपयश आले असून त्याच्या बेपत्ता होण्याचे गूढ अद्यापही कायम आहे.

ठळक मुद्देतीन वर्षापासून थांगपत्ता नाही : वनविभाग अपयशी, १८ एप्रिल २०१६ ला झाले होते अखेरचे दर्शन

लक्ष्मीकांत तागडे।लोकमत न्यूज नेटवर्कपवनी : महाराष्ट्रातील सर्वात मोठा, भारतातील क्रमांक दोनचा वाघ असलेला आणि आशियाचा आयकॉन ठरलेला जय नामक वाघ बेपत्ता होऊन आता तीन वर्ष झाली. या तीन वर्षात जयचा शोध घेण्यात वनविभागाला अपयश आले असून त्याच्या बेपत्ता होण्याचे गूढ अद्यापही कायम आहे. विशेष म्हणजे १८ एप्रिल २०१६ रोजी पवनी वनक्षेत्रातील डोंगरमहादेव परिसरात जयचे अखेरचे दर्शन पर्यटकांना झाले होते.पवनी-कºहांडला अभयारण्याची शान असलेला जय हा देखणा वाघ होता. तो गोंदिया जिल्ह्यातील नागझिरा अभयारण्यातील सर्वप्रथम पवनी तालुक्याच्या डोंगर महादेव, खापरी परिसरात जून २०१३ मध्ये आला होता. तेव्हा तो केवळ अडीच वर्षाचा होता. जयला येथील विस्तीर्ण घनदाट जंगल कमालीचे आवडले. या जंगलाचा समावेश नंतर पवनी कºहांडला अभयारण्यात करण्यात आला. काही दिवसातच जय हा वाघ अभयारण्याचा प्राण ठरला. पर्यटक मोठ्या संख्येने जयला पाहण्यासाठी येत होते. १० दिवसापर्यंत आॅनलाईन बुकींग पॅक राहात होते. अनेक मोठी मंडळी जयला पाहण्यासाठी हजारो किमीचे अंतर कापून आली होती.जयच्या विविध गुणांमुळे तो भारतातील महत्वपूर्ण वाघ ठरला होता. कोणताही वाघ १०० किमी परिसरात फिरतो. पण जय हा अभयारण्याच्या १८९ किमी व प्रादेशिक वनविभागाच्या १०० किमी असा २५० किमी जंगलात मुक्तपणे फिरत होता. जय हा अभयारण्याच्या पवनी वनक्षेत्रात आठ दिवस तर आठ दिवस भिवापूर - कºहांडला परिसरात राहत होता. गोसीखुर्द धरणाचा जलस्तर वाढल्याने मरु नदी पूर्ण भरली असायची. त्यावेळी जय नदी पोहून जात होता. परंतु जून २०१६ मध्ये जय बेपत्ता झाल्याची माहिती बाहेर येऊ लागली. सुरुवातीला वनविभागाने कानावर हात ठेवले. पण थोड्याच दिवसात जय बेपत्ता झाल्याची अधिकृत घोषणा वनविभागाला करावी लागली.जयचा प्रवेश झाला तो पवनीच्या जंगलातून व नाहिसा झाला तोही पवनीतूनच. गत तीन वर्षापासून जयच्या बेपत्ता होण्याचे गुढ वनविभागाला उकलता आले नाही. याचा परिणाम पर्यटकांवर झाला आहे. आजही जयच्या सुरस कथा परिसरात सांगत जातात. जयची देखणी छबी आजही अनेकांच्या डोळ्यापुढे आहे. मात्र तीन वर्ष झाले तरी त्याच्या बेपत्ता होण्याचे गूढ सोडविण्यात यश आले नाही.अखेरच्या पाऊलखुणा बेटाळा शिवारातअचानक बेपत्ता झालेल्या जयच्या शेवटच्या पाऊलखुणा पवनी जवळील बेटाळा शिवारात आढळून आल्या. जयला लावण्यात आलेल्या कॉलर आयडीची ही अखेरची नोंद ठरली. तो कुठे गेला, त्याचे काय झाले याचा थांगपत्ता लागला नाही. दुसरीकडे वनविभागाने ‘मिशन जय सर्च’ मोहीम राबविली. जीपीएस नुसार १८ एप्रिल २०१६ ला जय चे लोकेशन आढळले. विशेष म्हणजे जय हा आपला नेहमीचा मार्ग सोडून निघाला होता. ज्या शेतात पायाचे ठसे आढळून आले तेथून २०० फुटावर पवनी-नागपूर हा डांबरी रस्ता आहे. याच दिवशी म्हणजे १८ एप्रिल २०१६ ला अभयारण्याच्या पवनी वन्यजीव क्षेत्रातील डोंगरमहादेव परिसरातील शेंडा पिंपरी नावाच्या प्रसिद्ध बोडीत तो पाण्यात डुंबून असल्याचा अनेक पर्यटकांना दिसला होता.पर्यटकांना घालायचा भुरळभारदस्त शरीरयष्टी, चेहऱ्याची सुंदरता, विलक्षण चपळ आदी गुणांमुळे जय हा पर्यटकांना भुरळ घालीत होता. अल्पावधीतच जयने या अभयारण्याच्या व प्रादेशिक वनविभागाच्या जंगलात आपले साम्राज्य निर्माण केले. अनेक मोठ्या वाघांना त्याने पळवून लावले.माणसावर कधी हल्ला केला नाहीबिनधास्तपणे जंगलात संचार करणारा जय वाघ सर्वांचा लाडका झाला होता. नागझिरा जंगलात माणसांना जवळून पाहणारा जय कोणालाही घाबरत नव्हता. त्याने कधीही माणसावर हल्ला केला नाही. असा हा दिलदार मनाचा देखणा वाघ अचानक बेपत्ता झाला.

टॅग्स :Tigerवाघ