शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

‘जय’च्या बेपत्ता होण्याचे गूढ कायमच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2019 00:29 IST

महाराष्ट्रातील सर्वात मोठा, भारतातील क्रमांक दोनचा वाघ असलेला आणि आशियाचा आयकॉन ठरलेला जय नामक वाघ बेपत्ता होऊन आता तीन वर्ष झाली. या तीन वर्षात जयचा शोध घेण्यात वनविभागाला अपयश आले असून त्याच्या बेपत्ता होण्याचे गूढ अद्यापही कायम आहे.

ठळक मुद्देतीन वर्षापासून थांगपत्ता नाही : वनविभाग अपयशी, १८ एप्रिल २०१६ ला झाले होते अखेरचे दर्शन

लक्ष्मीकांत तागडे।लोकमत न्यूज नेटवर्कपवनी : महाराष्ट्रातील सर्वात मोठा, भारतातील क्रमांक दोनचा वाघ असलेला आणि आशियाचा आयकॉन ठरलेला जय नामक वाघ बेपत्ता होऊन आता तीन वर्ष झाली. या तीन वर्षात जयचा शोध घेण्यात वनविभागाला अपयश आले असून त्याच्या बेपत्ता होण्याचे गूढ अद्यापही कायम आहे. विशेष म्हणजे १८ एप्रिल २०१६ रोजी पवनी वनक्षेत्रातील डोंगरमहादेव परिसरात जयचे अखेरचे दर्शन पर्यटकांना झाले होते.पवनी-कºहांडला अभयारण्याची शान असलेला जय हा देखणा वाघ होता. तो गोंदिया जिल्ह्यातील नागझिरा अभयारण्यातील सर्वप्रथम पवनी तालुक्याच्या डोंगर महादेव, खापरी परिसरात जून २०१३ मध्ये आला होता. तेव्हा तो केवळ अडीच वर्षाचा होता. जयला येथील विस्तीर्ण घनदाट जंगल कमालीचे आवडले. या जंगलाचा समावेश नंतर पवनी कºहांडला अभयारण्यात करण्यात आला. काही दिवसातच जय हा वाघ अभयारण्याचा प्राण ठरला. पर्यटक मोठ्या संख्येने जयला पाहण्यासाठी येत होते. १० दिवसापर्यंत आॅनलाईन बुकींग पॅक राहात होते. अनेक मोठी मंडळी जयला पाहण्यासाठी हजारो किमीचे अंतर कापून आली होती.जयच्या विविध गुणांमुळे तो भारतातील महत्वपूर्ण वाघ ठरला होता. कोणताही वाघ १०० किमी परिसरात फिरतो. पण जय हा अभयारण्याच्या १८९ किमी व प्रादेशिक वनविभागाच्या १०० किमी असा २५० किमी जंगलात मुक्तपणे फिरत होता. जय हा अभयारण्याच्या पवनी वनक्षेत्रात आठ दिवस तर आठ दिवस भिवापूर - कºहांडला परिसरात राहत होता. गोसीखुर्द धरणाचा जलस्तर वाढल्याने मरु नदी पूर्ण भरली असायची. त्यावेळी जय नदी पोहून जात होता. परंतु जून २०१६ मध्ये जय बेपत्ता झाल्याची माहिती बाहेर येऊ लागली. सुरुवातीला वनविभागाने कानावर हात ठेवले. पण थोड्याच दिवसात जय बेपत्ता झाल्याची अधिकृत घोषणा वनविभागाला करावी लागली.जयचा प्रवेश झाला तो पवनीच्या जंगलातून व नाहिसा झाला तोही पवनीतूनच. गत तीन वर्षापासून जयच्या बेपत्ता होण्याचे गुढ वनविभागाला उकलता आले नाही. याचा परिणाम पर्यटकांवर झाला आहे. आजही जयच्या सुरस कथा परिसरात सांगत जातात. जयची देखणी छबी आजही अनेकांच्या डोळ्यापुढे आहे. मात्र तीन वर्ष झाले तरी त्याच्या बेपत्ता होण्याचे गूढ सोडविण्यात यश आले नाही.अखेरच्या पाऊलखुणा बेटाळा शिवारातअचानक बेपत्ता झालेल्या जयच्या शेवटच्या पाऊलखुणा पवनी जवळील बेटाळा शिवारात आढळून आल्या. जयला लावण्यात आलेल्या कॉलर आयडीची ही अखेरची नोंद ठरली. तो कुठे गेला, त्याचे काय झाले याचा थांगपत्ता लागला नाही. दुसरीकडे वनविभागाने ‘मिशन जय सर्च’ मोहीम राबविली. जीपीएस नुसार १८ एप्रिल २०१६ ला जय चे लोकेशन आढळले. विशेष म्हणजे जय हा आपला नेहमीचा मार्ग सोडून निघाला होता. ज्या शेतात पायाचे ठसे आढळून आले तेथून २०० फुटावर पवनी-नागपूर हा डांबरी रस्ता आहे. याच दिवशी म्हणजे १८ एप्रिल २०१६ ला अभयारण्याच्या पवनी वन्यजीव क्षेत्रातील डोंगरमहादेव परिसरातील शेंडा पिंपरी नावाच्या प्रसिद्ध बोडीत तो पाण्यात डुंबून असल्याचा अनेक पर्यटकांना दिसला होता.पर्यटकांना घालायचा भुरळभारदस्त शरीरयष्टी, चेहऱ्याची सुंदरता, विलक्षण चपळ आदी गुणांमुळे जय हा पर्यटकांना भुरळ घालीत होता. अल्पावधीतच जयने या अभयारण्याच्या व प्रादेशिक वनविभागाच्या जंगलात आपले साम्राज्य निर्माण केले. अनेक मोठ्या वाघांना त्याने पळवून लावले.माणसावर कधी हल्ला केला नाहीबिनधास्तपणे जंगलात संचार करणारा जय वाघ सर्वांचा लाडका झाला होता. नागझिरा जंगलात माणसांना जवळून पाहणारा जय कोणालाही घाबरत नव्हता. त्याने कधीही माणसावर हल्ला केला नाही. असा हा दिलदार मनाचा देखणा वाघ अचानक बेपत्ता झाला.

टॅग्स :Tigerवाघ