शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

गोसेच्या पाण्याचा निमगावला वेढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 00:49 IST

भंडारा जिल्ह्यातील महत्त्वाकांक्षी गोसेखुर्द प्रकल्पाअंतर्गत असलेल्या भंडारा तालुक्यातील निमगाव या गावाला चारही बाजूंनी पाण्याने वेढले आहे. त्यामुळे धोक्याची शक्यता नाकारता येत नाही. सन २००९ पासून शासनाकडे मागणी करूनही निमगावचे पुनर्वसन करण्यात आले नाही.

ठळक मुद्देपुनर्वसनाकडे शासनाचे दुर्लक्ष : जलकुंभ व स्मशानशेड पाण्यात, दूषित पाण्याचा फटका

तत्वराज रामटेके।लोकमत न्यूज नेटवर्कपहेला : भंडारा जिल्ह्यातील महत्त्वाकांक्षी गोसेखुर्द प्रकल्पाअंतर्गत असलेल्या भंडारा तालुक्यातील निमगाव या गावाला चारही बाजूंनी पाण्याने वेढले आहे. त्यामुळे धोक्याची शक्यता नाकारता येत नाही. सन २००९ पासून शासनाकडे मागणी करूनही निमगावचे पुनर्वसन करण्यात आले नाही. त्यामुळे येथील नागरिकांमध्ये शासनाप्रती संतापाची लाट उसळली आहे. एकंदरीत गोसेखुर्द प्रकल्प हा शेतकऱ्यांसाठी वरदान ठरला असताना मात्र निमगाव या गावाला शापच ठरत आहे.दिवसेंदिवस गोसेखुर्द धरणाचा जलस्तर वाढत असल्याने निमगावला पाण्याने चारही बाजूने घेरले आहे. गोसेखुर्द धरणाच्या पाण्याची पातळी आता २४३ मीटर एवढी झालेली असून जर पाण्याची पातळी अजून वाढविली तर, अनेक शेतकऱ्यांचे धानपीक नष्ट होण्याची शक्यता नाकारता येत नाही.९०० लोकसंख्या असलेल्या निमगाव येथील १७५ शेतकऱ्यांची २२७.१७ हेक्टर शेती प्रकल्पासाठी अधिग्रहीत करण्यात आली. यामुळे शेतकरी भूमिहीन झाले. सध्या केवळ ५८ शेतकºयांकडे शेती आहे. शासनाच्या धोरणानुसार ७० टक्के क्षेत्र बुडीत क्षेत्रात येत असल्याने त्या गावाचे पुनर्वसन करण्यात येते. एकंदरीत निमगावची शेती ५३ टक्क्याच्या वर बाधीत आहे. कारण जी शेती उरलेली आहे, ती बाहेरगावच्या शेतकºयांची आहे. त्यामुळे निमगावची टक्केवारी कमी आलेली आहे.गोसेखुर्दचा जलस्तर वाढल्याने निमगाव येथील स्मशानशेड पाण्याखाली आले आहे. जर गावात एखादी मय्यत झाली तर अंत्यविधी करण्याकरिता निमगावला जागा उरलेली नाही. शासनाने स्मशानभूमीसाठी नव्याने जागा देण्यात यावी. तसेच निमगाव पिण्याचे पाण्याची एकमेव नळयोजना असलेल्या पाण्याची विहिर संपूर्णपणे पाण्याखाली आल्याने धरणाचे दूषित पाणी त्या विहिरीत जात आहे. ते दूषित पाणी निमगाव येथील नागरिकांना दररोज प्यावे लागते. त्यामुळे निमगाव येथील नागरिकांच्या आरोग्याला धोका आहे.निमगाव ते इटगाव हा रस्ता धरणाच्या पाण्याने पूर्णत: बंद झाला आहे आणि निमगाव येथील जी जमीन शिल्लक आहे ती याच मार्गाने आहे. या मार्गावर पाणी साचल्याने शेतकºयांना आपल्या शेतात जाता येत नाही. त्यामुळे शेती कशी करावी, या विवंचनेत शेतकरी पडले आहेत.निमगाव येथील ५३ टक्के शेतजमीन बाधीत असल्याने या गावात रोजगार हमीची कामे उपलब्ध होत नाही. त्यामुळे भूमिहीन मजूरांना कुटुंबाचे पालन पोषण कसे करावे, मुलांचे शिक्षण, त्यांचे विवाह व औषधोपचार कसे करावे तसेच शेती नसल्याने रोजगारासाठी बँकेकडून कर्ज मिळत नाही. विवाहयोग्य मुलांना मुली मिळत नाही. निमगाव येथील ग्रामपंचायतींनी २००९ मध्ये शासनाला प्रस्ताव पाठवून पुनर्वसनाची मागणी केली होती. तेव्हा तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी भंडारा तालुक्यातील निमगावचे विशेष बाब म्हणून पुनर्वसन करण्यासाठी मंजुरी दिली. मात्र शासनाकडून मंजूरी न मिळाल्याने पुनर्वसन अद्यापही रखडलेले आहे.लोकसभा पोटनिवडणुकीवर घातला होता बहिष्कारपुनर्वसनासंदर्भात निर्णय होत नसल्याने चार महिन्यापूर्वी झालेल्या भंडारा- गोंदिया लोकसभेच्या पोटनिवडणुकीत निमगाववासीयांनी बहिष्कार टाकला होता. तरीही शासनाने याकडे लक्ष दिले नाही .पाण्यात गाव वाहून गेल्यावर शासन पुनर्वसन करणार काय? असा प्रश्न निमगाववासीयांनी उपस्थित केला आहे. यापुढे येणाऱ्या निवडणुकीपर्यंत यावर तोडगा निघाला नाही तर, समोर येणाऱ्या संपूर्ण निवडणुकीवर सुद्धा बहिष्कार टाकू, असा निर्धार निमगाववासीयांनी व्यक्त केला आहे.

टॅग्स :Gosekhurd Projectगोसेखुर्द प्रकल्प