शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Best Bus Accident: भांडुपमध्ये भीषण अपघात! रिव्हर्स घेताना 'बेस्ट' बसनं प्रवाशांना चिरडलं; ४ जण ठार, ९ जखमी
2
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
3
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
4
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
5
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
6
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
7
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
8
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
9
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
10
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
11
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
12
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
13
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
14
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
15
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
16
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
17
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
18
न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेपूर्वी विराटने घेतला मोठा निर्णय, आता...
19
BMC Election 2026: मुंबई मनपासाठी काँग्रेसकडून ८७ उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध, ‘या’ चेहऱ्यांना संधी  
20
क्रिकेट खेळताना वाद, लग्नाच्या रिसेप्शनमध्ये चाकू हल्ला; कुणालचा रेल्वे स्टेशन जवळच्या झुडूपात सापडला मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

पावसाच्या रोहिणी नक्षत्राला सुरु वात

By admin | Updated: May 30, 2015 01:02 IST

भारतीय वैदिक कालगणनेनुसार, पंचांग शास्त्राने पावसाळ्याची १२ नक्षत्रे सांगितली आहेत.

भंडारा : भारतीय वैदिक कालगणनेनुसार, पंचांग शास्त्राने पावसाळ्याची १२ नक्षत्रे सांगितली आहेत. त्यापैकी रोहिणी व मघा ही पावसाची महानक्षत्रे आहेत. यातील पहिल्या म्हणजे रोहिणी या महानक्षत्राची सुरु वात पंचांगशास्त्रानुसार २४ जून रोजी सायंकाळी ७ वाजून ५१ मिनिटांनी होत आहे. या नक्षत्राचा कालावधी हा १५ दिवसांचा असून ८ जूनच्या सायंकाळी ५ वाजून ४८ मिनिटापर्यंत हे नक्षत्र राहणार आहे. या नक्षत्राची विभागणी चार चरणात असून प्रत्येक चरण हे साधारणत: पावणेचार दिवसाचे असेल. खरिपाच्या हंगामासाठी मशागतीची सुरु वात खऱ्या अर्थाने याच नक्षत्रापासून सुरु होते. या नक्षत्राच्या पावसाने जमिनीची मशागत करणे सोपे जाते. विशेष म्हणजे रोहिणी नक्षत्राच्या पावसाने जमिनीत वापसा तयार होऊन मृग नक्षत्रातील पेरणीस योग्य असे वातावरण तयार होते. त्यामुळे पेरणी केलेले बियाणे जमिनीत रु जण्यास मदत होते. परिणामी शेतकऱ्यांना पेरणी साधल्याचा असीम आनंद लाभतो. त्यासाठी शेतकऱ्यांच्या जीवनात व शेती व्यवसायात या नक्षत्राच्या पावसाला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे. ग्रामीण शेती संस्कृतीमध्ये पूर्वापारपासून यासाठी एक म्हणही रूढ झाली आहे. ती म्हणजे, ‘पाळणा हाले भावाआधी बहिणीचा, पाऊस येई मृगाआधी रोहिणीचा.’ ही म्हण प्रत्येक कुटुंबाला चपलखपणे लागू पडते. कारण कुटुंबात पहिली मुलगी जन्माला आली तर ती मुलगी संपूर्ण कुटुंबाला पुढे नेते. त्यासाठी ती अहोरात्र झटते. तसेच मृगाआधी रोहिणीचा पाऊस चांगला झाल्यास शेतीची मशागत चांगली होऊन मृग नक्षत्रात पेरणी झालेल्या पिकाचे कमी खर्चात अमाप पीक हाती येते, असा आजवरचा ग्रामीण भागातील वयोवृद्ध शेतकऱ्यांचा अनुभव आहे. पंचांगशास्त्रानुसार यावर्षी रोहिणी नक्षत्राचा पाऊस चांगला होण्याचे संकेत आहेत. सोमवारी ज्येष्ठ शुल्क सप्तमीला सायंकाळी ७ वाजून ५१ मिनिटांनी सूर्य रोहिणी नक्षत्रात प्रवेश करीत आहे. या महानक्षत्राच्या प्रवेशवेळी वृश्चिक लग्न मकर नवांशात उदीत आहे. या नक्षत्राचे वाहन म्हैस हे असून हा प्राणी जलप्रिय आहे. या वेळी या महानक्षत्रात पावसाकरिता आवश्यक असलेला चंद्र, सूर्य, स्त्री, पुरूष हा सर्वात चांगला योग साधून आला आहे. ३० मे रोजी शुक्र कर्क राशीत गुरु च्या सानिध्यात येत आहे. वटपौर्णिमेच्या सुमारास चांगली पर्जन्यवृष्टी होण्याची शक्यता आहे. या नक्षत्राच्या तिसऱ्या व चौथ्या चरणात केरळ भागात मान्सूनपूर्व पाऊस होऊन महाराष्ट्रात मुंबई व कोकण किनारपट्टीवर वृष्टी होऊन तापमान थोडे खाली येण्याचीही शक्यता आहे. या नक्षत्रात वारा-वादळ जास्त होऊन नुकसान होण्याचीही संभावना आहे. हे सर्व पावसाबद्दलचे निष्कर्ष पूर्णपणे नक्षत्रकालीन ग्रहिस्थतीवर आधारित आहेत. बदललेल्या हवामानानुसार प्रत्यक्ष काय घडून येईल, हे आजच सांगणे कठीण आहे. (प्रतिनिधी)