शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

रेती वाहतुकीने रस्ते जीवघेणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2016 01:30 IST

जिल्ह्यात रेतीचा अवैध व्यवसाय जोमात सुरू असताना परवा रात्री एका ट्रक चालकाचा दुदैवी मृत्यू झाला.

जिल्ह्यात ४० रेतीघाट सुरू : रेतीचा अवैध गोरखधंदाभंडारा : जिल्ह्यात रेतीचा अवैध व्यवसाय जोमात सुरू असताना परवा रात्री एका ट्रक चालकाचा दुदैवी मृत्यू झाला. एरव्ही रेतीच्या अवैध वाहतुकीमुळे सामान्यांचा जीव जात असताना कालच्या प्रकरणाने पुन्हा एकदा या मुद्याला रंग चढला आहे. गेलेल्या जीव परत येऊ शकत नाही. मात्र या रेतीच्या अवैध व्यवसायामुळे जिल्ह्यातील रस्त्यांची होणारी दयनिय अवस्था व त्यामुळे घडणारे अपघात सामान्यांची परीक्षाच घेत आहे. भंडारा जिल्ह्यात वैनगंगा नदीसह तिच्या उपनद्यांचे विस्तारीत पात्र आहे. याच नदीपात्रातून दरवर्षी कोट्यवधी रूपयांचा रेतीचा उपसा केला जातो. नियमात नसला तरी २४ तास चालणारा हा ‘बिझनेस’ कधीकाळी अंगावरही येतो. यात महसूल प्रशासन व पोलीस विभागांचे संगनमत असते. कुणी चिरिमिरी देऊन सुटतात तर कुणी पळून जाण्यात यशस्वी ठरतात. मात्र रेतीचा अवैध गोरखधंदा बंद झालेला नाही.जिल्ह्यात सद्यस्थितीत ४६ रेतीघाट उपसा करण्याच्या स्थितीत आहे. यापैकी २०१५-१६ मध्ये झालेल्या लिलावादरम्यान आतापर्यंत सहा रेतीघाटांचे दिलेल्या मंजुरीप्रमाणे रेतीचा उपसा पूर्ण झालेला आहे. १५ रेतीघाटांचा उपसा अजुनही सुरू आहे. तर अन्य २५ रेतीघाट नियमितपणे कार्यरत आहे. वैनगंगा नदीपात्रात पाणी असेल तिथून वाळूचे खणन बंद आहे. जिथे पाणी वाहते व संथगती आहे अथवा पात्र कोरडे आहे, अशा ठिकाणाहून रेतीची वाहतुक सुरू आहे. ज्या नदीपात्रातून नियमाप्रमाणे रेतीचा उपसा केला जातो तिथे वजनकाटा नसल्याने कधी ओव्हरलोडेड ट्रक किंवा ट्रॅक्टर नदीपात्रातून बाहेर निघतो. त्यावर प्रशासन जलदगतीने कारवाई करते. परंतु ओव्हरलोडेड वाहतुकीमुळे रस्त्यांची दुरवस्था होत आहे. सातही तालुक्यातील ज्या नदीपात्रातून रेतीची वाहतूक सुरू आहे त्या घाटाजवळील रस्त्यांची अक्षरश: वाट लागली आहे. रस्त्यावर जीवघेणे खड्डे निर्माण झाले असून अपघातालाही आमंत्रण मिळत आहे. सर्वात जास्त वाईट स्थिती म्हणजे, ज्या घाटातून रेतीचा उपसा करून वाहन गावातून जात असल्यास तेथील रस्ते दयनीय झाले आहे. रेतीच्या अवैध वाहतुकीचा फटका अनेकांच्या जीवावर बेतला आहे. दुसरीकडे जे रस्ते जिल्हा मार्ग, राज्य मार्ग अथवा राष्ट्रीय महामार्ग अंतर्गत येतात त्या रस्त्यांच्या डागडुजीवरही शासनाचा कोट्यवधी रूपयांचा निधी खर्च केला जातो. यात संबंधिताना पुन्हा वारेमाप पैसा मिळतो. मागील वर्षभरात अवैध वाहतुकीमुळे लहान मोठे अपघात घडले आहे. (प्रतिनिधी)ट्रक, टिप्परची वर्दळ थंडावलीविरली (बु.) : ट्रक चालक दिलीप रोहणकर यांच्या अपघात प्रकरणाच्या चौकशीसाठी जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी हे लाखांदुरला येणार असल्यामुळे धास्तावलेल्या रेतीघाट कंत्राटदारांनी गुरूवारला रेतीघाट बंद ठेवले होते. परिणामी विरली-पवनी मार्गावर अविरत चालणारी रेतीच्या टिप्परची वर्दळ थंडावली. मंगळवारला रात्री लाखांदूरचे नायब तहसीलदार प्रथमेश मोहोड हे ओव्हरलोड रेती भरलेल्या टिप्परचा पाठलाग करीत असताना घाबरलेल्या चालकाने धावत्या ट्रकमधून उडी घेतली. यावेळी ट्रकच्या मागच्या चाकात दबून रोहणकर यांचा जागीच मृत्यू झाला होता. हा अपघात की घातपात याविषयी चर्चा आहेत. या अपघाताच्या चौकशीसाठी जिल्हाधिकारी येणार असल्यामुळे रेतीघाट कंत्राटदारांनी लाखांदूर तालुक्यातील ईटान, नांदेड, मोहरणा हे रेतीघाट बंद ठेवले. त्यामुळे अहोरात्र चालणारी रेतीच्या टिप्परची वर्दळ आज थांबलेली दिसून आली. (वार्ताहर)