शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

किन्ही-गडेगाव तलावाचे पुनरूज्जीवन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2019 06:00 IST

किन्ही गडेगाव येथील तलावाची अवस्था दयनीय झाली होती. त्यात जलसंचय होण्यास अडचण होत होती. सदर तलाव सुमारे ५३ हेक्टर परिसरात आहे. हा प्रकार हिंदूजा फाउंडेशनच्या निदर्शनास आला. त्यांनी या तलावाचे पुनरूज्जीवन करण्याचा निर्णय घेतला. सामाजिक बांधिलकी निधीतून तीन महिन्यापूर्वी तलावाच्या पुनरूज्जीवन कामाला सुरुवात करण्यात आली.

ठळक मुद्देवन्यजीवांसह चार हजार लोकसंख्येला होणार लाभ

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : तलावांचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भंडारा जिल्ह्यातील बहुतांश तलावांची स्थिती दयनीय झाली आहे. अशा तलावांचे सामाजिक बांधिलकीतून पुनरूज्जीवन करण्याचा प्रयत्न केला जात आहे. हिंदूजा फाउंडेशनच्या पुढाकारातून भंडारा तालुक्यातील किन्ही गडेगाव तलावाचे पुनरूज्जीवन करण्यात आले. या तलावात पाण्याचा मोठा साठा झाला असून याचा फायदा वन्यजीवांसह परिसरातील चार हजार लोकसंख्येला होणार आहे.किन्ही गडेगाव येथील तलावाची अवस्था दयनीय झाली होती. त्यात जलसंचय होण्यास अडचण होत होती. सदर तलाव सुमारे ५३ हेक्टर परिसरात आहे. हा प्रकार हिंदूजा फाउंडेशनच्या निदर्शनास आला. त्यांनी या तलावाचे पुनरूज्जीवन करण्याचा निर्णय घेतला. सामाजिक बांधिलकी निधीतून तीन महिन्यापूर्वी तलावाच्या पुनरूज्जीवन कामाला सुरुवात करण्यात आली. ५३ हेक्टर परिसरातील तलावावर ६० लाख रुपये खर्च करून तलाव पुनरूज्जीवीत करण्यात आला.यासोबतच या तलावाच्या काठावर वृक्षारोपण करण्यात येणार आहे. त्यातून पर्यावरणाचे रक्षण होण्यास मदत होईल. सद्यस्थितीत या तलावाच्या संचय क्षमतेत ६५ टक्के वाढ होणार आहे. पावसाळ्यात याचा अनुभवही परिसरातील नागरिकांना आला आहे.पूर्वी उन्हाळा आणि पावसाळा या दोन ऋतूमध्ये हा तलाव आटून जायचा. पाण्याचा गंभीर प्रश्न या भागात निर्माण व्हायचा. आता या तलावाच्या पुनरूज्जीवनामुळे स्थानिक पातळीवर सकारात्मक बदल होतील. होसूर येथे ६० हेक्टरपर्यंत जलक्षमता तसेच ४.५ हेक्टर तलावाच्या पुनरूज्जीवनामुळे आसपासच्या परिसराला स्वच्छ पाणीपुरवठा मिळेल. सिंचन क्षमता वाढेल आणि मासेमारीसाठीही हा तलाव उपयुक्त ठरणार आहे.पुनरूज्जीवन तलाव ताब्यात देण्याचा कार्यक्रम पार पडला. यावेळी भंडाराचे तहसीलदार अक्षय पोयाम, सरव्यवस्थापक एम.एम. लखोटे, मनुष्यबळ उपाध्यक्ष टी.शशीकुमार तसेच हिंदूजा फाउंडेशनचे संचालक नियती सरीन उपस्थित होते. जलजीवन कार्यक्रमांतर्गत सीएसआर प्रकल्पान्वये या प्रकल्पाचे पुनरूज्जीवन करण्यात आले.तलावामुळे वाढीव पाणीपुरवठा होईलसरव्यवस्थापक एम.एम. लखोटे यांनी या कामाची माहिती दिली. तलावाचे पुनरूज्जीवन करताना पर्यावरणासोबतच समाजातील घटकांसाठी पाण्याचे महत्व लक्षात घेता हा प्रकल्प साकारण्यात आला. या तलावाच्या निवडीमध्ये एनव्हायरमेंटालिस्ट फाउंडेशन आॅफ इंडियाने महत्वाची भूमिका वठविली. किन्ही व गडेगाव या दोन्ही ग्रामपंचायतला या तलावामुळे वाढीव पाणीपुरवठा होणार आहे. सोबतच कोका अभयारण्यातील वन्य प्राण्यांनाही उन्हाळात पाण्यासाठी हा तलाव मोठा आधार ठरणार आहे. ही योजना दीर्घकाळ जलक्षमता कायम ठेवत उन्हाळ्यात पाणी टंचाईचा सामना पुरेसा ठरणार असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. किन्ही गडेगाव तलावाचे पुनरूज्जीवन झाले असून पावसामुळे हा तलाव तुडूंब भरला आहे. निसर्गाने मुक्त हस्ते उधळण केलेला हा परिसर पर्यटकांना आकर्षीत करीत आहे.

टॅग्स :DamधरणWaterपाणी