शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

मृत्यूला परतवून ‘ती’ जगली २० वर्षे

By admin | Updated: May 9, 2017 00:22 IST

मृत्यू हा एवढा शब्द कानी पडला तरी प्रत्येकांचा थरकाप उडतो. मृत्यू म्हणजे नेमके काय या प्रश्नाचे उत्तर शोधता शोधता कित्येक जन्म खर्ची पडतात.

अखेर श्वास संपला : नातू-पणतूंचा गोतावळा अनुभवलाराजू बांते । लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : मृत्यू हा एवढा शब्द कानी पडला तरी प्रत्येकांचा थरकाप उडतो. मृत्यू म्हणजे नेमके काय या प्रश्नाचे उत्तर शोधता शोधता कित्येक जन्म खर्ची पडतात. परंतु एका वृद्धेने २० वर्षांपूर्वी मृत्यूला आलिंगन दिले. त्यातून ती परतही आली अन् तब्बल वीस वर्ष मृत्यूवर विजय मिळवून तिने आज सोमवारला अखेरचा श्वास घेतला. भागरथा ईश्वरकर, असे त्या वृद्धेचे नाव आहे.मोहाडी तालुक्यातील रोहणा येथील किसन ईश्वरकर यांनी भागरथा यांच्याशी लग्न केले. पहिल्या पत्नीला तीन अपत्ये झाली. त्यानंतर भागरथाबाईचा मृत्यू झाला. पहिल्या पत्नीच्या मृत्यूनंतर त्यांनी दुसरे लग्न केले. पहिल्या पत्नीवर प्रेम असल्यामुळे त्यांनी दुसऱ्या पत्नीचेही नाव भागरथाच ठेवले. दोघांच्याही आयुष्यवाटा एकाच दिशेने सुखी समाधानाने निघत होत्या. किसन ईश्वरकर यांना दुसऱ्या पत्नीपासून तीन मुले व चार मुली झाल्या. २५ वर्षापुर्वी किसन ईश्वरकर यांचे निधन झाले. त्यानंतर मुला-मुलींच्या मायेच्या सावलीने जगणारी भागरथा पांजरा (बोथली) येथील यशोदा नामक मुलीकडे भेटीला गेली. तिथेच भागरथाबाईची प्रकृती बिघडली. त्यानंतर तिला वरठी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगून आता तिचे जगणे शक्य नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले. काही वेळानंतर डॉक्टरांनी भागिरथाला मृत घोषीत केले. मृत्यू झाला म्हणून भागरथाला रोहणा येथे स्वगावी नेण्यात आले. सगळ्या नातेवाईकांना मृत्यूची बातमी देण्यात आली. अंत्यविधीचा निरोपही देण्यात आला. सगळी मंडळी रोहणा येथे पोहोचली. अग्निसंस्काराचा सोपस्कार सुरु होता. अन् आश्चर्य बघा भागरथाने दीर्घ श्वास घेतला आणि एकच धावपळ उडाली. बाई जीवंत आहे, असा कल्लोळ सुरु झाला. खरच भागरथा उठून बसली, हा सगळा प्रकार बघून तिलाही नवलच वाटले. भागरथाबाईने ‘याची देही याची डोळा’ मृत्यूचा सोहळा अनुभवला. तो प्रसंग दु:खाचा होता. अंत्यसंस्कारासाठी आलेल्या आप्तेष्ठांनी दुखाची घटना सुखाच्या सोहळ्यात त्यावेळी अनुभवली होती. त्यानंतर २० वर्ष भागरथाबाई अगदी ठणठणीत जगली. काल परवा तिला ताप आला. पण, ती चालत बोलत होती. रविवाला सायंकाळी ४ वाजता तिने चालताबोलता अखेरचा श्वास घेतला. सोमवारला सकाळी रोहणा येथील सूर नदीवर तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ‘जन्मातही नव्हते कधी मी, तोंड माझे लपविले. मेल्यावरी संपूर्ण त्यांनी, वस्त्रात मजला झाकले.’