शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
5
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
6
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
7
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
8
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
9
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
10
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
11
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
12
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
13
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
14
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
15
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
16
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
17
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
18
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
19
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
20
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  

अन्‌ परतीच्या पावसाने केला शेतकऱ्यांचा घात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2020 05:00 IST

एकंदरीत ही आकडेवारी जिल्हा कृषी विभागाची असली तरी जिल्ह्यात अतिवृष्टी व पूर यामुळे ३७८ गावांमधील शेत शिवारात धान पिकासह अन्य पिकांचे पिकांना बाधा पोहोचली. यात भंडारा तालुक्यातील ९९, मोहाडी ३५, तुमसर ३६, साकोली ८७, लाखनी १७ तर लाखांदूर तालुक्यातील ३४ गावांचा समावेश आहे. भात, भाजीपाला, सोयाबीन, कापूस, तूर या परतीच्या पावसाने प्रभावित झाली आहेत.

ठळक मुद्देसदोष नियोजनाचा फटका : जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये ७२ टक्के पाणीसाठा

इंद्रपाल कटकवारलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात गत आठवड्यात घरापासून बरसलेल्या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला आहे. परतीच्या पावसाने जवळपास ५० हजार हेक्टरमधील धान पिकांसह अन्य पिकांची नासाडी झाल्याचे शेतकरी सांगत आहे. तर अतिवृष्टी व पूर यामुळे जिल्ह्यातील २७ हजार हेक्टरमधील धानपीक जमीनदोस्त झाले आहे.एकंदरीत ही आकडेवारी जिल्हा कृषी विभागाची असली तरी जिल्ह्यात अतिवृष्टी व पूर यामुळे ३७८ गावांमधील शेत शिवारात धान पिकासह अन्य पिकांचे पिकांना बाधा पोहोचली. यात भंडारा तालुक्यातील ९९, मोहाडी ३५, तुमसर ३६, साकोली ८७, लाखनी १७ तर लाखांदूर तालुक्यातील ३४ गावांचा समावेश आहे. भात, भाजीपाला, सोयाबीन, कापूस, तूर या परतीच्या पावसाने प्रभावित झाली आहेत.भंडारा तालुक्यातील पाच हजार ४६० हेक्टर, मोहाडी तालुक्यातील ४४६२, तुमसर तालुक्यातील तीन हजार ८८७, पवनी ८१३८, साकोली तालुक्यातील २०० तर लाखनी तालुक्यातील ७८, लाखांदूर तालुक्यातील ४५८७, हेक्टर क्षेत्र परतीच्या पावसाने बाधित झाले आहे. विशेष म्हणजे ३३ टक्के पेक्षा कमी नुकसान झालेले क्षेत्र ७०५२ हेक्टर इतके असून ते ३३ टक्के च्यावर २१ हजार ७९५ हेक्टर मधील पिकांना बाधा पोहोचली आहे एकंदरीत जिल्हाभरातील ३८ हजार ९२१ शेतकऱ्यांच्या शेतातील पीके बाधित झाली होती.काय करावे, सुचेनापरतीच्या पावसाने आमच्या तोंडचा घास हिरावला आहे. अजूनपर्यंत कृषी विभागाने पंचनामे केले नाहीत. महसूल प्रशासनाचे अधीकारी व कर्मचारी अजुनही पाहणीसाठी आले नाहीत. परिसरातील शेतकऱ्यांनी हलके धान कापणीला प्रारंभ केला होता. कडपांमध्ये पाणी गेले. काही ठिकाणी धान मातीमोल झाले आहेत. हातचे पीक गेल्याने काय करावे, हे सुचत नाही.-उमराव मस्के, खुटसावरीमदतीची अपेक्षाधान पीक डौलात उभे असताना परतीच्या पावसाने सुमार नुकसान केले आहे. धान मातीत मिसळले आहे. अतिवृष्टी व पुराने कसेबसे सावरले असताना परतीच्या पावसाने आमचे कंबरडे मोडले आहे. पंचनामे झाले नसल्याने मदत मिळणार की नाही असा सवाल आहे. कृषी विभागाने याबाबत पुढाकार घेण्याची गरज आहे, तरच शेतकरऱ्यांना मदतमिळू शकेल.-प्रभू साखरे, दवडीपार.नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेताची पाहणीजिल्ह्यातील २६ हजार ८१२ हेक्टर क्षेत्रातील पीके अतिवृष्टी व महापूरामुळे बाधीत झालीत आहेत. नियमानुसार सातही तालुक्यात सर्वेक्षण करण्यात आले. यात ही आकडेवारी समोर आली. निकषानुसार शेतकऱ्यांना मदत केली जाणार आहे. परतीच्या पावसाने नुकसानीची माहिती घेण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी सहकार्य करणे गरजेचे आहे.-मिलिंद लाड,उपिवभागीय कृषी अधीकारी, भंडारा

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती