शहरं
Join us  
Trending Stories
1
इसकी टोपी उसके सर और उसकी...; कोकाटे आणि दत्तात्रय भरणे यांच्यातील मंत्रि‍पदाची आदलाबदली!
2
प्रांजल खेवलकरच्या लॅपटॉपमध्ये अनेक महिलांचे पार्टी अन् त्यानंतरचे आक्षेपार्ह व्हिडिओ!
3
IND vs ENG 5th Test Day 1 Stumps: नायर-वॉशिंग्टन जोडी जमली अन् टीम इंडियावरील मोठं संकट टळलं!
4
विधानसभेच्या निकालांमध्ये तफावत नाही; ईव्हीएम तपासणीनंतर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
5
माल चाहिए क्या? xxx वाला? विचारल्यानंतर खेवलकर म्हणाले होते, 'ठेवून घ्या'! चॅटिंग आलं समोर
6
Karun Nair Fifty : 'त्रिशतकवीर' करुण नायरच्या भात्यातून ३१४६ दिवसांनी आली 'फिफ्टी'!
7
Nashik Crime: भयंकर! पत्नीला गुंगीचे औषध पाजून नग्नावस्थेत बनवले व्हिडिओ, दोन वर्ष डान्स बारमध्ये नाचायला लावले
8
उत्तर प्रदेशमधील मंत्र्यांनी आपल्याच सेक्रेटरीला पाठवलं तुरुंगात, कारण वाचून तुम्ही म्हणाल...
9
सरकारी नोकरी शोधणाऱ्यांसाठी उत्तम संधी, लवकरच ओआयसीएलमध्ये मोठी भरती!
10
IND vs ENG: टीम इंडियासोबत पाचव्या कसोटीत 'चिटींग'? पंच कुमार धर्मसेना यांच्यावर नेटकऱ्यांचा आरोप
11
"भगवा नाही, सनातनी किंवा हिंदुत्ववादी दहशतवाद म्हणा"; अमित शाहांचा उल्लेख करत पृथ्वीराज चव्हाणांचे गंभीर विधान
12
सात वर्षांत ४२ वेळा तिने दिला नकार, अखेर ४३व्यावेळी त्यानं केलं असं काही, नकारच देऊ शकली नाही ती
13
Shubman Gill Run Out : साईला कॉल देत गिलनं उगाच केली घाई! इंग्लंडला फुकटात मिळाली विकेट (VIDEO)
14
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजपची रणनीती! माजी खासदार-आमदारांवर सोपवली मोठी जबाबदारी
15
IND vs ENG : 'ती' साथ देणार अशा परिस्थितीत त्यानं विश्रांती घेतली; सोशल मीडियावर बुमराह झाला ट्रोल
16
आमदाराच्या कारची दुचाकीला धडक, रेल्वे पुलावरून खाली कोसळून तरुणाचा मृत्यू, मृत तरुण भाजपा नेत्याचा भाऊ  
17
बांगलादेशी मॉडेलला भारतात अटक! पोलिसांनी राहत्या घरावर टाकली धाड अन् आत जे सापडलं...
18
Anilkumar Pawar ED Raid: अनिलकुमार पवार यांना त्यांच्या आईने गिफ्ट केलेला नाशिकमधील प्लॉट जप्त
19
कृषीखातं पुन्हा धनंजय मुंडेंकडे? सह्याद्री अतिथीगृहावर भेटीगाठींना वेग!
20
निवडणूक जिंकणं कठीण की पत्नीचं मन? राघव चड्डांनी दिलं असं उत्तर, परिणीतीही झाली अवाक्

अन्‌ परतीच्या पावसाने केला शेतकऱ्यांचा घात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2020 05:00 IST

एकंदरीत ही आकडेवारी जिल्हा कृषी विभागाची असली तरी जिल्ह्यात अतिवृष्टी व पूर यामुळे ३७८ गावांमधील शेत शिवारात धान पिकासह अन्य पिकांचे पिकांना बाधा पोहोचली. यात भंडारा तालुक्यातील ९९, मोहाडी ३५, तुमसर ३६, साकोली ८७, लाखनी १७ तर लाखांदूर तालुक्यातील ३४ गावांचा समावेश आहे. भात, भाजीपाला, सोयाबीन, कापूस, तूर या परतीच्या पावसाने प्रभावित झाली आहेत.

ठळक मुद्देसदोष नियोजनाचा फटका : जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये ७२ टक्के पाणीसाठा

इंद्रपाल कटकवारलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात गत आठवड्यात घरापासून बरसलेल्या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला आहे. परतीच्या पावसाने जवळपास ५० हजार हेक्टरमधील धान पिकांसह अन्य पिकांची नासाडी झाल्याचे शेतकरी सांगत आहे. तर अतिवृष्टी व पूर यामुळे जिल्ह्यातील २७ हजार हेक्टरमधील धानपीक जमीनदोस्त झाले आहे.एकंदरीत ही आकडेवारी जिल्हा कृषी विभागाची असली तरी जिल्ह्यात अतिवृष्टी व पूर यामुळे ३७८ गावांमधील शेत शिवारात धान पिकासह अन्य पिकांचे पिकांना बाधा पोहोचली. यात भंडारा तालुक्यातील ९९, मोहाडी ३५, तुमसर ३६, साकोली ८७, लाखनी १७ तर लाखांदूर तालुक्यातील ३४ गावांचा समावेश आहे. भात, भाजीपाला, सोयाबीन, कापूस, तूर या परतीच्या पावसाने प्रभावित झाली आहेत.भंडारा तालुक्यातील पाच हजार ४६० हेक्टर, मोहाडी तालुक्यातील ४४६२, तुमसर तालुक्यातील तीन हजार ८८७, पवनी ८१३८, साकोली तालुक्यातील २०० तर लाखनी तालुक्यातील ७८, लाखांदूर तालुक्यातील ४५८७, हेक्टर क्षेत्र परतीच्या पावसाने बाधित झाले आहे. विशेष म्हणजे ३३ टक्के पेक्षा कमी नुकसान झालेले क्षेत्र ७०५२ हेक्टर इतके असून ते ३३ टक्के च्यावर २१ हजार ७९५ हेक्टर मधील पिकांना बाधा पोहोचली आहे एकंदरीत जिल्हाभरातील ३८ हजार ९२१ शेतकऱ्यांच्या शेतातील पीके बाधित झाली होती.काय करावे, सुचेनापरतीच्या पावसाने आमच्या तोंडचा घास हिरावला आहे. अजूनपर्यंत कृषी विभागाने पंचनामे केले नाहीत. महसूल प्रशासनाचे अधीकारी व कर्मचारी अजुनही पाहणीसाठी आले नाहीत. परिसरातील शेतकऱ्यांनी हलके धान कापणीला प्रारंभ केला होता. कडपांमध्ये पाणी गेले. काही ठिकाणी धान मातीमोल झाले आहेत. हातचे पीक गेल्याने काय करावे, हे सुचत नाही.-उमराव मस्के, खुटसावरीमदतीची अपेक्षाधान पीक डौलात उभे असताना परतीच्या पावसाने सुमार नुकसान केले आहे. धान मातीत मिसळले आहे. अतिवृष्टी व पुराने कसेबसे सावरले असताना परतीच्या पावसाने आमचे कंबरडे मोडले आहे. पंचनामे झाले नसल्याने मदत मिळणार की नाही असा सवाल आहे. कृषी विभागाने याबाबत पुढाकार घेण्याची गरज आहे, तरच शेतकरऱ्यांना मदतमिळू शकेल.-प्रभू साखरे, दवडीपार.नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेताची पाहणीजिल्ह्यातील २६ हजार ८१२ हेक्टर क्षेत्रातील पीके अतिवृष्टी व महापूरामुळे बाधीत झालीत आहेत. नियमानुसार सातही तालुक्यात सर्वेक्षण करण्यात आले. यात ही आकडेवारी समोर आली. निकषानुसार शेतकऱ्यांना मदत केली जाणार आहे. परतीच्या पावसाने नुकसानीची माहिती घेण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी सहकार्य करणे गरजेचे आहे.-मिलिंद लाड,उपिवभागीय कृषी अधीकारी, भंडारा

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती