शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
2
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
3
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
4
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
5
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
6
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
7
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
8
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
9
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
10
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
11
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
12
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
13
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
14
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
15
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
16
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
17
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
18
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा
19
संतापजनक! लहान मुलांना कागदाच्या तुकड्यांवर दिलं मध्यान्ह भोजन, Video पाहून बसेल धक्का
20
'सोन्याची आहे की चंद्रावरून आणलीत?'; प्राडाच्या सेफ्टी पिनचा सोशल मीडियावर धुमाकूळ! किंमत किती?

परतीच्या पावसाने केला शेतकऱ्यांचा घात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2019 06:00 IST

दरम्यान, धान ऊत्पादनात अग्रेसर भंडारा जिल्ह्यात या अवकाळी पावसाने मध्यंतरी तुडतुडा व अन्य कीड रोगाने शेतकरी पुरता हतबल असतांना हातात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांनी कापलेले धानपीक बुडाल्याने अवघे शेतकरी हतबल ठरले आहे. कृषी विभागासह प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणी शेतकरी जनतेने केली आहे.

ठळक मुद्देबळीराजाचा जीव मेटाकुटीला । धानाच्या कडपा झाल्या ओल्याचिंब

लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : हलक्या व भारी धरणाची पेरणी करताना अनेक शेतकरी पुरेशा पावसाअभावी आधीच वैतागले होते मात्र खरीप हंगामात मध्यंतरी पडलेल्या पावसाने अनेक शेतक?्यांना दिलासा दिला असला तरी परतत्या पावसाने धक्का देत शेतक?्यांची दिवाळखोरी करणारा पाऊस पडल्याने लाखांदुर तालुक्यात शेकडो धान ऊत्पादक शेतकऱ्यांच्या कडपा वाहल्याचे वास्तव आहे.अडीच हजार हेक्टरहुन क्षेञात लाखांदुर तालुक्यात धान पिकाची पेरणी केली जाते. हलक्या व भारी धानाची पेरणी होत असतांना शेतकरी ऊत्पादन मुल्य मिळविण्याच्या नादात कित्येक शेतकरी श्रेणीयुक्त धानाची पेरणी देखील करीत असल्याचे दिसुन आले आहे.यंदाच्या हंगामात पाऊस उशिरा पडला असला तरी शेतकऱ्यांनी हवामानाचा बेत घेत पेरणीपुर्ण पिकाची लावणी केली. लावणीपुर्ण पिक ऊगवले देखील माञ ऊगवणी झाल्यानंतरही कापणी झालेल्या धानपिकाच्या कडपा अचानक पडलेल्या पावसाने पाण्यात भिजल्याचे दिसुन येत आहे.दरम्यान, धान ऊत्पादनात अग्रेसर भंडारा जिल्ह्यात या अवकाळी पावसाने मध्यंतरी तुडतुडा व अन्य कीड रोगाने शेतकरी पुरता हतबल असतांना हातात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांनी कापलेले धानपीक बुडाल्याने अवघे शेतकरी हतबल ठरले आहे. कृषी विभागासह प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणी शेतकरी जनतेने केली आहे.दुसरीकडे या पावसामुळे भाजीपाला पिकाचेही नुकसान झाले आहे. आधीच भाजीपाल्यांचे भाव गगणाला भिडले असताना परतीच्या पावसामुळे भाववाढ होणार अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. आधीच ढगाळ वातावरणामुळे धानासह तुर पिकावर कीडीचा प्रादूर्भाव वाढला आहे. भारी धान यायला अजून १५ ते २० दिवसांचा कालावधी शिल्लक असताना या समस्येमुळे शेतकऱ्यांसमोर पेचप्रसंग निर्माण झाला आहे.भंडारा, लाखनीतही पावसाची हजेरीजिल्ह्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावली नसली तरी भंडारा, लाखनी, पवनी व लाखांदूर तालुक्यात हजेरी लावली. जिल्ह्यात मात्र सर्व ठिकाणी ढगाळ वातावरण होते. भंडारा शहरात शनिवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास पावसाला सुरूवात झाली. तब्बल तासभरापर्यंत पाऊस बरसला. दिवाळीचा बाजार तथा अन्य साहित्यांनी बाजारपेठ गजबजली असताना अचानक आलेल्या पावसामुळे अनेकांची तारांबळ उडाली. रविवारी दिवाळी असल्याने शनिवारला मोठ्या प्रमाणात शहरात ठिकठिकाणी झेंडूची फुले विकायला आली होती. आलेल्या पावसामुळे फुल विक्रेत्यांना साहित्य अन्यत्र घेवून जावे लागले. दुसरीकडे ढगाळ वातावरणाचा धानाला चांगलाच फटका बसल्याचे दिसून येत आहे. तूर पिकावर फुल येत असल्याने ढगाळ वातावरणाने फुल गळून पडण्याची भीती व्यक्त होत आहे. तर तुरीवर कीडीचा प्रादूर्भावसुद्धा जाणवत आहे.अड्याळ व परिसरात शनिवारी आलेल्या पावसाने शेकडो शेतकरी चिंताग्रस्त आहेत. कापलेले धान ओलेचिंब झाले आहेत. तर कुणाचे उभे भात पीक झोपले. यामुळे अस्मानी संकटात येथील शेतकरी सापडला आहे.

टॅग्स :Rainपाऊस