शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

परतीच्या पावसाने केला शेतकऱ्यांचा घात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2019 06:00 IST

दरम्यान, धान ऊत्पादनात अग्रेसर भंडारा जिल्ह्यात या अवकाळी पावसाने मध्यंतरी तुडतुडा व अन्य कीड रोगाने शेतकरी पुरता हतबल असतांना हातात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांनी कापलेले धानपीक बुडाल्याने अवघे शेतकरी हतबल ठरले आहे. कृषी विभागासह प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणी शेतकरी जनतेने केली आहे.

ठळक मुद्देबळीराजाचा जीव मेटाकुटीला । धानाच्या कडपा झाल्या ओल्याचिंब

लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : हलक्या व भारी धरणाची पेरणी करताना अनेक शेतकरी पुरेशा पावसाअभावी आधीच वैतागले होते मात्र खरीप हंगामात मध्यंतरी पडलेल्या पावसाने अनेक शेतक?्यांना दिलासा दिला असला तरी परतत्या पावसाने धक्का देत शेतक?्यांची दिवाळखोरी करणारा पाऊस पडल्याने लाखांदुर तालुक्यात शेकडो धान ऊत्पादक शेतकऱ्यांच्या कडपा वाहल्याचे वास्तव आहे.अडीच हजार हेक्टरहुन क्षेञात लाखांदुर तालुक्यात धान पिकाची पेरणी केली जाते. हलक्या व भारी धानाची पेरणी होत असतांना शेतकरी ऊत्पादन मुल्य मिळविण्याच्या नादात कित्येक शेतकरी श्रेणीयुक्त धानाची पेरणी देखील करीत असल्याचे दिसुन आले आहे.यंदाच्या हंगामात पाऊस उशिरा पडला असला तरी शेतकऱ्यांनी हवामानाचा बेत घेत पेरणीपुर्ण पिकाची लावणी केली. लावणीपुर्ण पिक ऊगवले देखील माञ ऊगवणी झाल्यानंतरही कापणी झालेल्या धानपिकाच्या कडपा अचानक पडलेल्या पावसाने पाण्यात भिजल्याचे दिसुन येत आहे.दरम्यान, धान ऊत्पादनात अग्रेसर भंडारा जिल्ह्यात या अवकाळी पावसाने मध्यंतरी तुडतुडा व अन्य कीड रोगाने शेतकरी पुरता हतबल असतांना हातात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांनी कापलेले धानपीक बुडाल्याने अवघे शेतकरी हतबल ठरले आहे. कृषी विभागासह प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणी शेतकरी जनतेने केली आहे.दुसरीकडे या पावसामुळे भाजीपाला पिकाचेही नुकसान झाले आहे. आधीच भाजीपाल्यांचे भाव गगणाला भिडले असताना परतीच्या पावसामुळे भाववाढ होणार अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. आधीच ढगाळ वातावरणामुळे धानासह तुर पिकावर कीडीचा प्रादूर्भाव वाढला आहे. भारी धान यायला अजून १५ ते २० दिवसांचा कालावधी शिल्लक असताना या समस्येमुळे शेतकऱ्यांसमोर पेचप्रसंग निर्माण झाला आहे.भंडारा, लाखनीतही पावसाची हजेरीजिल्ह्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावली नसली तरी भंडारा, लाखनी, पवनी व लाखांदूर तालुक्यात हजेरी लावली. जिल्ह्यात मात्र सर्व ठिकाणी ढगाळ वातावरण होते. भंडारा शहरात शनिवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास पावसाला सुरूवात झाली. तब्बल तासभरापर्यंत पाऊस बरसला. दिवाळीचा बाजार तथा अन्य साहित्यांनी बाजारपेठ गजबजली असताना अचानक आलेल्या पावसामुळे अनेकांची तारांबळ उडाली. रविवारी दिवाळी असल्याने शनिवारला मोठ्या प्रमाणात शहरात ठिकठिकाणी झेंडूची फुले विकायला आली होती. आलेल्या पावसामुळे फुल विक्रेत्यांना साहित्य अन्यत्र घेवून जावे लागले. दुसरीकडे ढगाळ वातावरणाचा धानाला चांगलाच फटका बसल्याचे दिसून येत आहे. तूर पिकावर फुल येत असल्याने ढगाळ वातावरणाने फुल गळून पडण्याची भीती व्यक्त होत आहे. तर तुरीवर कीडीचा प्रादूर्भावसुद्धा जाणवत आहे.अड्याळ व परिसरात शनिवारी आलेल्या पावसाने शेकडो शेतकरी चिंताग्रस्त आहेत. कापलेले धान ओलेचिंब झाले आहेत. तर कुणाचे उभे भात पीक झोपले. यामुळे अस्मानी संकटात येथील शेतकरी सापडला आहे.

टॅग्स :Rainपाऊस