शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

विद्यार्थ्यांना दिलेल्या सायकली घेतल्या परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2016 00:40 IST

कांद्री येथील २४ मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मोहाडी पंचायत समिती मार्फत सायकली वितरीत करण्यात आल्या होत्या.

पालकांत संताप : मोहाडी पंचायत समितीचा प्रतापमोहाडी : कांद्री येथील २४ मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मोहाडी पंचायत समिती मार्फत सायकली वितरीत करण्यात आल्या होत्या. मात्र अचानक १६ सप्टेंबरला पंचायत समिती मोहाडी येथील काही अधिकारी, कर्मचारी यांनी कांद्रीला येवून दिलेल्या सायकली परत करण्यासाठी विद्यार्थ्यांवर दबाव आणला व काही विद्यार्थ्यांच्या सायकली जबरीने आपल्या ताब्यात घेतल्या असा आरोप संतप्त पालकांनी येभे घेण्यात आलेल्या पत्रपरिषदेत व्यक्त केला.समाजकल्याण विभाग, जिल्हा परिषद भंडारा अंतर्गत मागासवर्गीय विद्यार्थ्यांना सायकली देण्यात येतात. यासाठी विद्यार्थ्यांना ग्रामसभेतून निवड झाल्याचे प्रमाणपत्र, मुख्याध्यापकाचे शाळेपासून घरापर्यंतचे अंतर दोन कि.मी. पेक्षा जास्त असल्याचे प्रमाणपत्र, दारिद्र्य रेषेखाली असल्याचे प्रमाणपत्र, जातीचा दाखला, तसेच खंड विकास अधिकारी यांचे प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रासह पंचायत समितीमध्ये अर्ज करावा लागतो. कांद्री येथील अनेक विद्यार्थ्यांनी असे अर्ज पंचायत समिती मोहाडी येथे दाखल केले होते. संपूर्ण विद्यार्थ्यांच्या अर्जाची छाननी करून त्यापैकी २४ विद्यार्थ्यांचे अर्ज समाजकल्याण विभागाने मंजूर केले. त्यामुळे पंचायत समिती मोहाडी येथून या २४ विद्यार्थ्यांना सायकली वितरीत करण्यात आल्या. मात्र काही दिवसानंतर या विद्यार्थ्यांना दिलेल्या सायकली परत करण्यासाठी मोहाडी पंचायत समितीकडून पत्र देण्यात आले. ज्या विद्यार्थ्यांना सायकली प्राप्त झाल्या त्यांच्या आनंदात या पत्राने विरजण घातले. आपल्या सायकली परत घेतल्या जातील या भितीने काही विद्यार्थ्यांनी शाळेतच जाणे बंद केले तर काही विद्यार्थी सायकली ऐवजी पायीच शाळेत जावू लागले. मात्र एकाही विद्यार्थ्याने सायकल परत केली नाही. १६ सप्टेंबरला पंचायत समिती मोहाडी येथील काही अधिकारी व कर्मचारी कांद्री येथे आले व त्यांनी विद्यार्थ्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. एवढेच नाही तर काही विद्यार्थ्यांच्या घरी शिक्षकांना पाठवून विद्यार्थ्यांच्या घरुन त्या सायकली उचलून आणण्यात आल्या. या प्रकरामुळे मात्र विद्यार्थ्यांच्या मनावर मोठा परिणाम झाला असून काही विद्यार्थ्यांना ताप सुद्धा आला असल्याचे पालकांनी सांगितले. दिलेल्या सायकली आम्ही कोणत्याही परिस्थितीत परत करणार नाही, आमच्या अर्जात त्रुटी होत्या तर मग अर्ज झोपेत तपासून मंजूर करण्यात आले काय? सायकली वाटप केल्यानंतर पुन्हा चौकशी कशी काय करण्यात आली. असा सवाल संतप्त पालकांनी केला आहे. पत्रपरिषदेला माजी आमदार अनिल बावनकर, राजेंद्र वंजारी, शशीकांत नागफासे, सुरचंद नागपुरे व पालक उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)देण्यात आलेल्या सायकली बद्दल तक्रार प्राप्त झाल्याने समाज कल्याण विभागातर्फे चौकशी करण्यात येऊन त्या सायकली परत घेण्यात येत आहेत. जे खरोखर लाभार्थी असतील त्यांना त्या सायकली वितरीत केल्या जातील.- गजानन लांजेवार, गटविकास अधिकारी, पं.स. मोहाडी.