शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
4
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
5
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
6
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
7
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
8
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
9
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
10
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
11
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
12
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
13
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
14
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
15
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
16
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
17
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
18
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
19
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
20
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
Daily Top 2Weekly Top 5

पाणी वाटपाची जबाबदारी तीन अभियंत्यांवर

By admin | Updated: August 14, 2015 00:03 IST

सिहोरा परिसरात कोरड्या दुष्काळाचे भयाण चित्र निर्माण झाल्याने शेतीत धान पिकांची रोवणी करण्याकरिता पाणी वाटप करण्यासाठी बैठकांचे सत्र सुरु झाले आहे.

कारवाई प्रभावित होणार : बैठकांचे सत्र सुरू, शेतकऱ्यांवर पुन्हा संकट ओढावणाररंजित चिंचखेडे चुल्हाडसिहोरा परिसरात कोरड्या दुष्काळाचे भयाण चित्र निर्माण झाल्याने शेतीत धान पिकांची रोवणी करण्याकरिता पाणी वाटप करण्यासाठी बैठकांचे सत्र सुरु झाले आहे. यातच १२ हजार हेक्टर आर शेतीला पाणी वाटप करण्याची जबाबदारी ३ अमिनावर आल्याने त्यांचीही धाकधुकी वाढली आहे.३८७ हेक्टर आर जागेत विस्तारलेल्या चांदपूर जलाशयाचे पाणी वाटप करण्याची जबाबदारी पाटबंधारे विभागाच्या यंत्रणेची आहे. या विभागाला रिक्त पदांनी पोखरून काढले आहे. १२ हजार हेक्टर आर शेती ओलीताखाली आणण्यासाठी उजवा आणि डावा कालवा अशी विभागणी स्वतंत्ररित्या करण्यात आली आहे. उजवा कालवा अंतर्गत शाखा अभियंता, शाखा कारकून तथा ३ अमिन यांच्या जागा रिक्त आहे. यामुळे ६ हजार हेक्टर आर शेतीला पाणी वाटपाची जबाबदारी कार्यरत २ अमिनाच्या खांद्यावर आली आहे. याशिवाय डावा कालवा अंतर्गत संपूर्ण प्रशासन सैरवैर झाला आहे. शाखा अभियंता, शाखा कारकून तथा ३ अमिनाच्या जागा रिक्त असल्याने कार्यरत १ अमिनाचा खांदा ६ हजार हेक्टर आर शेतीची धुरा सांभाळणार आहे. पाणी वाटपात शेतकरी अमिन यांनाच जबाबदार धरत असल्याने धाकधुकी वाढली आहे. गेल्या तीन वर्षापासून कालवा, नहर आणि पादचाऱ्यांचे विकास कामे झाली नाही. केर कचरा, झुडपी आणि गवतांनी तुंबली असल्याने जागोजागी पाणी अडणार आहे. पाणी पट्टी करातून १७ ते २० लाख रुपये वार्षिक देणाऱ्या या परिसरात नहरांची वाईट अवस्था शासकीय यंत्रणेने केली आहे. या शिवाय नहरांचे सिमेंट अस्तरीकरण वाहून गेले आहे. यामुळे पाणी वाटप प्रभावित होणार आहे. दरम्यान उजवा आणि डावा कालव्याचा प्रभार २५ व ३५ कि.मी. अंतरावर वास्तव करणाऱ्या शाखा अभियंता यांना देण्यात आलेला आहे. आधीच त्यांचेकडे अवाढव्य कामे असल्याने परिसरात त्यांची उपस्थिती नगण्य आहे. यामुळे २ अमिन सर्वेसर्वा झाली असून पाणी वाटपात वरिष्ठ अधिकारी फेरफटका मारताना टाळत असल्याने शेतकऱ्यांच्या रोषाला बळी पडावे लागत आहे.चांदपूर जलाशयात ३६ फुट पैकी १४ फुट पाण्याची पातळी असल्याने, धान पिकांची रोवणी करण्यासाठी पाणी वाटप करण्याची शेतकरी ओरड करीत आहेत. या शिवाय बावनथडी नदी पात्रात सातत्याने पाण्याची पातळी वाढत असल्याने शेतकऱ्यांचे आशा वाढलेल्या आहेत. सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पात सध्या ५ पंपगृह पाण्याचा उपसा करीत असल्याने पुन्हा २ पंपगृह सुरु करण्यात येणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. दरम्यान चांदपूर जलाशयाचे पाणी वाटप करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांचे नागपूर आणि भंडारा कार्यालयात महत्वपूर्ण बैठक सुरु झालेल्या आहेत. याशिवाय जिल्हाधिकारी यांचे आदेशाची महत्वपूर्ण भूमिका राहणार आहे. कधी येणार पाहुणा?पाटबंधारे विभागात दोन्ही शाखा अभियंत्यांचे पदे प्रभारी आहेत. हजारो हेक्टर शेती ओलीताखाली असल्याने कंबरडे मोडणारे आहे. यामुळे या विभागात लाखांदूरच्या विभागातून एका शाखा अभियंत्यांचे स्थानांतरण झाले असताना हा पाहुणा पाणी वाटपात टेंशन घेण्याच्या स्थितीत नाही. यामुळे रूजू होण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे. रिकाम्या खुर्च्या या शाखा अभियंत्यांची अद्यापही प्रतिक्षा करीत आहे. यामुळे कधी येणार हा पाहुणा, अशी चर्चा सिहोऱ्याच्या पाटबंधारे विभागात आहे.