शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

रस्त्यावर धूळ, राखेमुळे श्वसनाचे त्रास; डोळे चोळायचे की वाहन चालवायचे? नागरिकांचा संतप्त सवाल

By युवराज गोमास | Updated: March 14, 2024 19:43 IST

निर्माणाधीन बायपास मार्गामुळे अनेकांना आरोग्याच्या समस्या

युवराज गोमासे, भंडारा: शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील अवजड वाहतुकीचा त्रास कमी व्हावा, अपघात थांबावे तसेच वाहतूक कोंडी दूर व्हावी, या हेतूने शहराच्या दक्षिणेला सहापदरी बायपास मार्गाचे काम धडाक्यात सुरू आहे. महामार्ग बांधकामासाठी औष्णिक विद्युत केंद्रातून निघणाऱ्या राखेचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. परंतु, पर्याप्त पाणी शिंपडले जात नसल्याने भिलेवाडा, कारधा दरम्यान नेहमी अवजड वाहन जाताच धुळीचे लोळ उडून वाहतुकदारांच्या डोळे व नाकातोंडात जात आहे. यामुळे वाहतुकदारांना डोळे व श्वसनाचा त्रास होत आहे.

राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने मुजबी ते पलाडी दरम्यान सुमारे १४.८ किमी लांबीचे भंडारा शहर बायपास मार्गाचे काम मंजूर केले. मंजूर बांधकामासाठी ७३८ कोटी ६७ लाखांचे अंदाजपत्रकीय खर्च अपेक्षीत आहे. बांधकामामध्ये १ उड्डाणपूल, दोन भूमिगत रस्ते, लहान व मोठ्या स्वरूपाचे पूल, १७ किमी लांबीचा सर्वीस रोड, ४ बसथांबे, नाली बांधकाम व अन्य बांधकामाचा समावेश आहे. विकासाचा राजमार्ग म्हणून या सहापदरी बायपास मार्गाचे बांधकामाकडे पाहिले जात आहे. सदर बांधकामाचे कंत्राट स्वामी समर्थ इंजिनिअरिंग लिमिटेड कंपनीस आहे. बायपास मार्गाचे बांधकाम धडाक्यात सुरू आहे. बहुतेक ६० टक्क्यांपर्यंत बांधकाम झाले असून उर्वरीत बांधकाम प्रगतीपथावर असल्याचे दिसून येत आहे.

चारचाकीपेक्षा दुचाकीस्वार त्रस्त

पलाडी ते भिलेवाडा दरम्यान सुरू असलेल्या बांधकामामुळे धुळीचा सर्वाधिक त्रास दुचाकी वाहन चालकांना सहन करावा लागतो आहे. मार्गावरून अवजड वाहने जाताच राख हवेत उडते. वाहन चालकांच्या डोळ्यात व श्वासात राख शिरून गुदमरल्यासारखे वाटायला लागले. पांढरे कपडे अल्पावधीत मळतात. डोळ्यांची जळजळ सुरू होते. रस्त्याकडे पाहणे अवघड होते. भिलेवाडा व कारधा दरम्यान उडणारी राख व धूळ वाहतुकदारांसाठी अडचण निर्माण करणारी ठरत आहे.

पाणी शिंपडण्यासह अन्य उपायांची गरज

पलाडी ते कारधा टोलनाका दरम्यान महामार्गावर राख, माती व मुरुमाचा वापर बांधकामात होत आहे. त्यामुळे या भागात नेहमीच धुळीचे साम्राज्य असते. यामुळे पर्यावरण प्रदूषित होत आहे. महामार्ग परिसरातील नागरिकांनाही श्वसनाचे विकार होण्याची नाकारता येत नाही. यावर मात करण्यासाठी स्वामी समर्थ इंजिनिअरिंग लिमिटेड ह्या कन्स्ट्रक्शन कंपनीने या समस्येवर तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे. सकाळ, दुपार व सायंकाळी पर्याप्त पाणी रस्त्यावर शिंपडणे तितकेच गरजेचे आहे.

टॅग्स :Healthआरोग्यbhandara-acभंडारा