शहरं
Join us  
Trending Stories
1
ISRO आणखी एक विक्रम रचणार! २०३५ पर्यंत भारतीय अंतराळ स्टेशन बनवणार, पाहा कसं दिसतं मॉडेल?
2
कैद्यांना मोकाट सोडणारे ठाणे मुख्यालयातील दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ, पोलिस आयुक्तांचे आदेश
3
भाजपाला कधी मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष?; अचानक घडलेल्या घडामोडींमुळे झाला विलंब, काय आहे कारण?
4
परमबीर सिंग यांच्यावर खंडणीचा आराेप करणाऱ्या बिल्डरवर फसवणूकीचा गुन्हा; अग्रवाल बंधू अटकेत
5
Video: फटाक्यांच्या आवाजानं बैल उधळला, सगळीकडे गोंधळ; गावकऱ्यांची झाली पळापळ, १ जण जखमी
6
भारतावरील 'टॅरिफ'वरून' ट्रम्प यांच्यावर टीका केली, माजी अमेरिकन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराच्या घरावर एफबीआयचा छापा
7
टिकटॉक भारतात परत सुरू होणार? नवीन अपडेट आली, सोशल मीडियावर जोरदार चर्चा
8
Video: इलेक्टिक कारच्या ऑटोमेटिक फिचरनं घेतला मालकाचा जीव?; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ व्हायरल
9
ऑनलाइन फॅन्टसी गेमिंगवर अखेर बंदी; नवीन विधेयकावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची मोहोर
10
अबब! ३५ लाख जप्त, २० लाखांची रोकड जाळली; सरकारी इंजिनिअरचा 'काळा' प्रताप उघड, नेमकं काय घडलं?
11
सोलापूर: माहेराहून पैसे आण, चाबकाने मारले फटके; काजलने आयुष्य संपवले, वैष्णवी हगवणे घटनेची पुनरावृत्ती?
12
'ऑपरेशन सिंदूर'मधील शहीद जवान रामच्या घरी जन्मली 'लक्ष्मी'; ३ महिन्यांनी कुटुंबात पसरला आनंद
13
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
14
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
15
Video: सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला अन् नाशिकमधला राडा समोर आला; कुत्र्याने बिबट्यावरच केला हल्ला
16
लवकरच ममता बॅनर्जींचे सरकार जाणार अन्..; कोलकात्यातून PM मोदींचा हल्लाबोल
17
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या
18
चीनची मोठी तयारी! या देशाविरोधात लढणार,समुद्रात १४ लढाऊ जहाजे उतरवले; लष्कर हाय अलर्टवर
19
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात
20
संपूर्ण देशाची फेव्हरिट बनली ही ₹9 लाखाहून कमी किंमतीची SUV; नेक्सन, पंच, फ्रोंक्सला टाकलं मागे; विक्री घटूनही ठरली नं. 1

रस्त्यावर धूळ, राखेमुळे श्वसनाचे त्रास; डोळे चोळायचे की वाहन चालवायचे? नागरिकांचा संतप्त सवाल

By युवराज गोमास | Updated: March 14, 2024 19:43 IST

निर्माणाधीन बायपास मार्गामुळे अनेकांना आरोग्याच्या समस्या

युवराज गोमासे, भंडारा: शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील अवजड वाहतुकीचा त्रास कमी व्हावा, अपघात थांबावे तसेच वाहतूक कोंडी दूर व्हावी, या हेतूने शहराच्या दक्षिणेला सहापदरी बायपास मार्गाचे काम धडाक्यात सुरू आहे. महामार्ग बांधकामासाठी औष्णिक विद्युत केंद्रातून निघणाऱ्या राखेचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. परंतु, पर्याप्त पाणी शिंपडले जात नसल्याने भिलेवाडा, कारधा दरम्यान नेहमी अवजड वाहन जाताच धुळीचे लोळ उडून वाहतुकदारांच्या डोळे व नाकातोंडात जात आहे. यामुळे वाहतुकदारांना डोळे व श्वसनाचा त्रास होत आहे.

राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने मुजबी ते पलाडी दरम्यान सुमारे १४.८ किमी लांबीचे भंडारा शहर बायपास मार्गाचे काम मंजूर केले. मंजूर बांधकामासाठी ७३८ कोटी ६७ लाखांचे अंदाजपत्रकीय खर्च अपेक्षीत आहे. बांधकामामध्ये १ उड्डाणपूल, दोन भूमिगत रस्ते, लहान व मोठ्या स्वरूपाचे पूल, १७ किमी लांबीचा सर्वीस रोड, ४ बसथांबे, नाली बांधकाम व अन्य बांधकामाचा समावेश आहे. विकासाचा राजमार्ग म्हणून या सहापदरी बायपास मार्गाचे बांधकामाकडे पाहिले जात आहे. सदर बांधकामाचे कंत्राट स्वामी समर्थ इंजिनिअरिंग लिमिटेड कंपनीस आहे. बायपास मार्गाचे बांधकाम धडाक्यात सुरू आहे. बहुतेक ६० टक्क्यांपर्यंत बांधकाम झाले असून उर्वरीत बांधकाम प्रगतीपथावर असल्याचे दिसून येत आहे.

चारचाकीपेक्षा दुचाकीस्वार त्रस्त

पलाडी ते भिलेवाडा दरम्यान सुरू असलेल्या बांधकामामुळे धुळीचा सर्वाधिक त्रास दुचाकी वाहन चालकांना सहन करावा लागतो आहे. मार्गावरून अवजड वाहने जाताच राख हवेत उडते. वाहन चालकांच्या डोळ्यात व श्वासात राख शिरून गुदमरल्यासारखे वाटायला लागले. पांढरे कपडे अल्पावधीत मळतात. डोळ्यांची जळजळ सुरू होते. रस्त्याकडे पाहणे अवघड होते. भिलेवाडा व कारधा दरम्यान उडणारी राख व धूळ वाहतुकदारांसाठी अडचण निर्माण करणारी ठरत आहे.

पाणी शिंपडण्यासह अन्य उपायांची गरज

पलाडी ते कारधा टोलनाका दरम्यान महामार्गावर राख, माती व मुरुमाचा वापर बांधकामात होत आहे. त्यामुळे या भागात नेहमीच धुळीचे साम्राज्य असते. यामुळे पर्यावरण प्रदूषित होत आहे. महामार्ग परिसरातील नागरिकांनाही श्वसनाचे विकार होण्याची नाकारता येत नाही. यावर मात करण्यासाठी स्वामी समर्थ इंजिनिअरिंग लिमिटेड ह्या कन्स्ट्रक्शन कंपनीने या समस्येवर तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे. सकाळ, दुपार व सायंकाळी पर्याप्त पाणी रस्त्यावर शिंपडणे तितकेच गरजेचे आहे.

टॅग्स :Healthआरोग्यbhandara-acभंडारा