शहरं
Join us  
Trending Stories
1
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
2
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
3
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
4
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
5
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
6
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
7
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
8
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी
9
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
10
सर्वत्र मृतदेह, ओळख पटवणेही अशक्य; गुजरात सरकारकडून डीएनए सॅम्पल देण्याचं आवाहन
11
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
12
Ahmedabad Plane Crash : पत्नी आणि मुलीला भेटण्यासाठी लंडनला जात होते माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी
13
Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
14
Air India Plane Crash: ५ महिन्यापूर्वी लग्न, पहिल्यांदाच पतीला भेटायला लंडनला चालली होती पण काळाने घात केला
15
'आम्हाला आत जाऊ द्या', रुग्णालयाबाहेर मृत आणि जखमींच्या नातेवाईकांचा आक्रोश
16
विमानातील कुणीही बचावलं असण्याची शक्यता नाही; सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती! पोलीस आयुक्त म्हणाले...
17
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
18
Air India Plane Crash: वडिलांचा व्यवसाय सांभाळण्यासाठी केले होते MBA; विमान अपघातात भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
19
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
20
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?

रस्त्यावर धूळ, राखेमुळे श्वसनाचे त्रास; डोळे चोळायचे की वाहन चालवायचे? नागरिकांचा संतप्त सवाल

By युवराज गोमास | Updated: March 14, 2024 19:43 IST

निर्माणाधीन बायपास मार्गामुळे अनेकांना आरोग्याच्या समस्या

युवराज गोमासे, भंडारा: शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील अवजड वाहतुकीचा त्रास कमी व्हावा, अपघात थांबावे तसेच वाहतूक कोंडी दूर व्हावी, या हेतूने शहराच्या दक्षिणेला सहापदरी बायपास मार्गाचे काम धडाक्यात सुरू आहे. महामार्ग बांधकामासाठी औष्णिक विद्युत केंद्रातून निघणाऱ्या राखेचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. परंतु, पर्याप्त पाणी शिंपडले जात नसल्याने भिलेवाडा, कारधा दरम्यान नेहमी अवजड वाहन जाताच धुळीचे लोळ उडून वाहतुकदारांच्या डोळे व नाकातोंडात जात आहे. यामुळे वाहतुकदारांना डोळे व श्वसनाचा त्रास होत आहे.

राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने मुजबी ते पलाडी दरम्यान सुमारे १४.८ किमी लांबीचे भंडारा शहर बायपास मार्गाचे काम मंजूर केले. मंजूर बांधकामासाठी ७३८ कोटी ६७ लाखांचे अंदाजपत्रकीय खर्च अपेक्षीत आहे. बांधकामामध्ये १ उड्डाणपूल, दोन भूमिगत रस्ते, लहान व मोठ्या स्वरूपाचे पूल, १७ किमी लांबीचा सर्वीस रोड, ४ बसथांबे, नाली बांधकाम व अन्य बांधकामाचा समावेश आहे. विकासाचा राजमार्ग म्हणून या सहापदरी बायपास मार्गाचे बांधकामाकडे पाहिले जात आहे. सदर बांधकामाचे कंत्राट स्वामी समर्थ इंजिनिअरिंग लिमिटेड कंपनीस आहे. बायपास मार्गाचे बांधकाम धडाक्यात सुरू आहे. बहुतेक ६० टक्क्यांपर्यंत बांधकाम झाले असून उर्वरीत बांधकाम प्रगतीपथावर असल्याचे दिसून येत आहे.

चारचाकीपेक्षा दुचाकीस्वार त्रस्त

पलाडी ते भिलेवाडा दरम्यान सुरू असलेल्या बांधकामामुळे धुळीचा सर्वाधिक त्रास दुचाकी वाहन चालकांना सहन करावा लागतो आहे. मार्गावरून अवजड वाहने जाताच राख हवेत उडते. वाहन चालकांच्या डोळ्यात व श्वासात राख शिरून गुदमरल्यासारखे वाटायला लागले. पांढरे कपडे अल्पावधीत मळतात. डोळ्यांची जळजळ सुरू होते. रस्त्याकडे पाहणे अवघड होते. भिलेवाडा व कारधा दरम्यान उडणारी राख व धूळ वाहतुकदारांसाठी अडचण निर्माण करणारी ठरत आहे.

पाणी शिंपडण्यासह अन्य उपायांची गरज

पलाडी ते कारधा टोलनाका दरम्यान महामार्गावर राख, माती व मुरुमाचा वापर बांधकामात होत आहे. त्यामुळे या भागात नेहमीच धुळीचे साम्राज्य असते. यामुळे पर्यावरण प्रदूषित होत आहे. महामार्ग परिसरातील नागरिकांनाही श्वसनाचे विकार होण्याची नाकारता येत नाही. यावर मात करण्यासाठी स्वामी समर्थ इंजिनिअरिंग लिमिटेड ह्या कन्स्ट्रक्शन कंपनीने या समस्येवर तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे. सकाळ, दुपार व सायंकाळी पर्याप्त पाणी रस्त्यावर शिंपडणे तितकेच गरजेचे आहे.

टॅग्स :Healthआरोग्यbhandara-acभंडारा