शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारताकडे केवळ २ पर्याय आहेत..."; शाहांच्या विधानानंतर पाकिस्तानचा थयथयाट, थेट युद्धाची धमकी
2
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
3
Shiv Sena UBT: मराठवाड्यात उद्धव ठाकरेंना मोठा झटका, मोठ्या नेत्याने सोडली साथ!
4
महागाईचा काळ... बँक FD चे कमी व्याजदर! 'या' ५ सरकारी योजना तुमचं नशीब बदलतील, वाचा संपूर्ण माहिती
5
रॅलीमध्ये कारखाली चिरडून एकाचा मृत्यू; जगन मोहन रेड्डींविरोधात गुन्हा दाखल
6
परीक्षेत कमी गुण मिळाले, जाब विचारताच उलट बोलली, वडिलांकडून मुलीला बेदम मारहाण, तडफडून मृत्यू, सांगलीतील धक्कादायक घटना 
7
Video: चालत्या ट्रेनमध्ये मारहाण अन् चोरीचा प्रयत्न; अभिनेत्रीसोबत घडली धक्कादायक घटना
8
इराण जे सांगतोय ते भारत आणि चीन होऊच देणार नाहीत, दोघंही मोठे व्यापारी; अमेरिकेचं गणित समजून घ्या?
9
इराणवर हल्ला करण्यासाठी अमेरिकेने भारतीय हवाई क्षेत्राचा वापर केला? सरकारने स्पष्टीकरण दिले
10
Post Office ची सुपरहिट स्कीम; महिन्याला ₹३००० ची गुंतवणूक, ₹२.१४ लाखांचा रिटर्न निश्चित
11
"ते बोलण्यात व्यस्त, आम्ही कामात मग्न" उद्धव ठाकरेंना टोमणा, शहरात लावले पोस्टर!
12
Stock Market Today: इराण-इस्रायल युद्धाची भीती; ५३४ अंकांनी घसरुन शेअर बाजाराची सुरुवाती, IT-रियल्टीमध्ये मोठी विक्री
13
फिल्म सिटीमध्ये भीषण आग, 'अनुपमा' मालिकेचा सेट जळून खाक
14
केंद्र सरकार सीमा व्यवस्थापन प्राधिकरण स्थापन करणार; महाराष्ट्रातील खासदाराने केली होती मागणी
15
इस्त्रायल-इराण युद्धाचा भारताला फटका बसणार! फक्त १६ दिवस पुरेल एवढाच LPG गॅसचा साठा
16
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
17
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
18
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
19
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
20
धारावीत उभारणार मल्टी ट्रान्सपोर्ट हब; एमएमआरडीए लवकरच तयार करणार आराखडा

पावसाच्या थेंबांचा सन्मान करा

By admin | Updated: May 19, 2016 00:31 IST

पावसाने पाणी नदी, नाल्यांद्वारे वाहून न जाता त्याची साठवणूक, जपणूक करावी व पावसाच्या प्रत्येक थेंबाचा सन्मान करावा, ...

ग्रीन हेरिटेज संस्था : शासकीय यंत्रणेस कामाला लावण्याची गरज भंडारा : पावसाने पाणी नदी, नाल्यांद्वारे वाहून न जाता त्याची साठवणूक, जपणूक करावी व पावसाच्या प्रत्येक थेंबाचा सन्मान करावा, असे आवाहन ग्रीनहेरिटेज पर्यावरण संस्थेने केले आहे.यंदा देशात १०६ टक्के पाऊस पडेल, असा हवामान विभागाचा दीर्घकालीन अंदाज जाहीर झालेला आहे. विदर्भ, मराठवाड्यात चांगल्या पावसाचे संकेत आहे. शेतकऱ्यांसाठी हा शुभ संकेत आहे. साऊथ एशियन क्लायमेट आऊटलुक फोरमने मान्सूचा सविस्तर अभ्यास करून संपूर्ण दक्षिण आशियासाठी जून ते सप्टेंबर या कालावधीत मनमुदाद पाऊस पडणार असा अंदाज व्यक्त केला आहे.सॅस्कॉफ-८ ही संस्था आंतराष्ट्रीय दर्जाची अत्याधुनिक हवामान अंदाजाची यंत्रसामुग्री वापरते व तीचे अंदाज नेहमीच तंतोतंत खरे उतरतात. या संस्थेने केलेल्या अंदाजानुसार कोकणात ७० टक्के जास्त व मराठवाड्यात सरासरी पेक्षा ४० टक्के जास्त पाऊस पडणार आहे. अतिवृष्टीचे संकट ही निर्माण होऊ शकते. म्हणूनच शेतकऱ्यांनी सावध असावे. यावर्षीच मान्सून वेळेवर धडकण्याचा अंदाज आहे म्हणून प्रत्येक शेतकऱ्याने पावसाचे थेंब अन थेंब आपल्या शेतात कसा मुरवता येईल यासाठी या क्षणापासून प्रयत्न करावयास हवेत. गावात पाणी नाही म्हणून शेत उघड्यावर टाकून शहराकडे धाव घेणे आता परवडण्यासारखे नाही. येणारे वर्ष म्हणजे खरीप रब्बीचा हंगाम दुष्काळ नसून सुख समृद्धीचा आहे.मान्सूनचा अंदाज शेतकऱ्यांना आनंद देणारा नक्कीच आहे परंतु शासनाने देखील जास्त सकारात्मकता स्विकारून शासकीय यंत्रणेस कामाला लावण्याची गरज आहे. मनरेगा अंतर्गत नदी, नाले रूंदीकरण व जलयुक्त शिवाराची कामे तातडीने पूर्ण करून पावसाचा एक थेंब सुद्धा वाया जाणार नाही याची काळजी शासनाने घ्यावी. अतिवृष्टीच्या अंदाजाची तयार कागदावर न करता बांधावर करण्यात यावी, अशी मागणी ग्रीनहेरिटेज पर्यावरण व सामाजिक संस्थेतर्फे करण्यात आली आहे. (शहर प्रतिनिधी)