शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

पावसाअभावी ‘जलाशये’ अजूनही तहानलेलीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2016 00:32 IST

जिल्ह्यात अजूनही धो-धो बरसणाऱ्या पावसाने हजेरी लावलेली नाही.

धो-धो पावसाची गरज : अर्ध्या पावसाळ्यानंतरही मध्यम प्रकल्पात ठणठणाठभंडारा : जिल्ह्यात अजूनही धो-धो बरसणाऱ्या पावसाने हजेरी लावलेली नाही. कधी रिमझिम तर कधी एखादा ठोक अशा प्रमाणात हजेरी लावणाऱ्या पावसामुळे पाणी जमिनीत मुरत असले तरी मध्यम आणि मोठ्या जलाशयांमध्ये अपेक्षित पाणीसाठा झालेला नाही. अर्धा पावसाळा संपला असला तरी या जलाशयांमध्ये ५० टक्केही पाणीसाठा नाही.यातच खरीप हंगामात वरथेंबी पावसावर अवलंबून असलेल्या अनेक शेतकऱ्यांची परिस्थिती बिकट होत आहे. गतवर्षीपेक्षा यंदा पावसाची स्थिती चांगली राहील, असा अंदाज होता. मात्र हा अंदाज फोल ठरत आहे. बांध्यात रोवणीयोग्य पाणी साचत नसल्यामुळे शेतकऱ्यांना धानाची रोवणी कशी करावी असा प्रश्न पडला आहे.सध्या जिल्ह्यातील इटियाडोह धरण २९.८५ टक्के, शिरपूर जलाशय ३०.८४ टक्के, पुजारीटोला धरण ४०.५९ टक्के, कालीसराड ३६.४२ टक्के तचर मध्यप्रदेशातील संजय सरोवर ६४.६५ टक्के भरले असल्याची माहिती पाटबंधारे विभागातून देण्यात आली. सध्या संजय सरोवराचे दोन गेट ०.२१ मीटरपर्यंत उघडून ७०.७९ क्यूमेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. (प्रतिनिधी)मध्यम प्रकल्पातही जेमतेम साठाजिल्ह्यातील काही मध्यम प्रकल्पातही पाण्याचा ठणठणाठ दिसून येत आहे. बोदलकसा जलाशयात जलसाठा ७.४१ दलघमी असून त्याची टक्केवारी ४५.०३ आहे. चोरखमारा जलाशयात जलसाठा ३.४० दलघमी (१६.३६ टक्के) आहे. चुलबंद जलाशयात जलसाठा १.८९ दलघमी (१०.५४ टक्के) आहे. मानागड प्रकल्पात ०.६१ दलघमी (८.६१ टक्के) आहे. रेंगेपार प्रकल्पात ०.९३ दलघमी (२६.२० टक्के) आहे. संग्रामपूर २.३४ दलघमी (६०.५० टक्के) आहे. कटंगी ६.६४ दलघमी (७०.६६ टक्के) आहे. कलपाथरी २.२७ दलघमी (३४.४२ टक्के), उमरझरी १.६७ दलघमी (३०.३० टक्के) व खळबंदा प्रकल्पात २.७३ दलघमी (१७.०९ टक्के) जलसाठा आहे. २४ तासात १.२ मिमी पाऊसमागील २४ तासात जिल्ह्यात सरासरी केवळ १.२ मिमी पाऊस पडला आहे. १ जूनपासून आतापर्यंत सरासरी ५३६.६ मिमी एवढा पाऊस पडला आहे. गेल्या २४ तासात तालुकानिहाय पडलेला पाऊस व कंसात आजपर्यंत झालेला पाऊस असा आहे. गोंदिया तालुका निरंक (४२१ मिमी), तिरोडा निरंक (६१६.२ मिमी), गोरेगाव ०.४ मिमी (४८५ मिमी), आमगाव निरंक (४२५.२ मिमी), सालेकसा निरंक (५५२ मिमी), देवरी २ मिमी (६०८ मिमी), सडक-अर्जुनी ७.२ मिमी (६४३.८ मिमी), अर्जुनी-मोरगाव निरंक (५४२.१ मिमी) अशी पावसाची नोंद आहे.

जोरदार पावसाची प्रतीक्षा कायमजिल्ह्यात यावर्षी सरासरीच्या तुलनेत बऱ्यापैकी पाऊस झाला आहे. जून महिन्यात दगा देणाऱ्या पावसाने जुलै महिन्यात बऱ्यापैकी हजेरी लावली. संपूर्ण महिनाभर नियमितपणे पावसाचे हजेरी लावणे सुरू आहे. मात्र येणारा पाऊस रिमझिम स्वरूपाचा जास्त असतो. अधूनमधून एखादा ठोक येतो पण ते पाणी काही वेळातच जमिनीत मुरून जाते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या धानपिकासाठी रोवणीयोग्य पाणी बांधीत जमा होत नाही. यामुळे पूर्णपणे वरथेंबी पावसाच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांचे गणित बिघडत आहे. रोवणीसाठी आता काही दिवसच शिल्लक आहेत.