शहरं
Join us  
Trending Stories
1
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
2
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
3
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
4
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
5
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
6
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
7
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
8
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
9
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
10
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
11
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
12
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
13
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
14
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
15
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
16
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
17
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
18
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
19
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
20
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...

पावसाच्या हजेरीने दिलासा

By admin | Updated: October 6, 2014 23:06 IST

महिनाभरापासून पाठ फिरविलेल्या पावसामुळे बळीराजा मोठ्या बिकट संकटात सापडला होता. शेतातील धानपिके पाण्याअभावी करपू लागली होती, तर उकाड्यामुळे नागरिकही त्रस्त झाले होते.

अखेर परतीचा मान्सून बरसला : नागरिकांची उकाड्यातून सुटकांभंडारा : महिनाभरापासून पाठ फिरविलेल्या पावसामुळे बळीराजा मोठ्या बिकट संकटात सापडला होता. शेतातील धानपिके पाण्याअभावी करपू लागली होती, तर उकाड्यामुळे नागरिकही त्रस्त झाले होते. सोमवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास अचानकपणे जोरदार पावसाच्या सरी कोसळल्याने सर्वांसाठी आल्हाददायक ठरले आहे. पावसाळ्याच्या दिवसात मोठ्या प्रमाणात पावसाची गरज असताना यावर्षी पावसाची काही दिवसांचा अपवाद वगळता क्वचितप्रसंगी पाऊसाने हजेरी लावली होती. सुरूवातीला शेतकऱ्यांसमोर मोठे अस्मानी संकट ओढवल्यानंतर त्यांनी कसेबसे धानाची रोवणी आटोपली. त्यानंतर काही दिवसासाठी पावसाने जणू रजा घेतल्याची परिस्थिती होती. 'कधी ऊन्ह कधी पाऊस' अशा अस्मानी परिस्थितीत बळीराजाच्या चेहऱ्यावर मोठ्या आर्थिक विवंचनेचा प्रश्न आवासून दिसून येत होता. दुबारनंतर तिबार पेरणीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले. अशाही परिस्थितीत अनेक शेतकऱ्यांची पऱ्हे करपले तर काहींनी असलेल्या साधन सामुग्रीवरून ते जगवून रोवणी आटोपली. मागील महिनाभरापासून पावसाने अक्षरश: दडी मारली होती. धानपिके गर्भावस्थेत असताना धानाला शेवटच्या एका पाण्याची नितांत गरज आहे. मात्र उपलब्ध सिंचन व्यवस्था विद्युत विभागाच्या भारनियमनामुळे कुचकामी झाल्याने शेतकऱ्यांमध्ये संकट उभे ठाकले होते. ज्यांच्याकडे साधन उपलब्ध होते त्यांनी सिंचन करून धानाला जगविले. मात्र कोरडवाहू शेतकऱ्यांची यात फजिती झाली. निसर्गावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांचे पिके पाण्याअभावी करपू लागल्याने त्यांनी देवाकडे पाण्यासाठी साकळे घालणे सुरू केले होते. दरम्यान, हिवाळ्याच्या तोंडावर सध्या उकाडा वाढल्याने जणू उन्हाळाच लागल्याची प्रचिती मागील काही दिवसांपासून येत होती. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक व शेतकरी पाण्यासाठी देवाला साकळे घालून आर्जव करीत असल्याचे दिसून येते होते. आज सकाळपासून निरभ्र वातावरण होते. मात्र दुपारी ३ च्या सुमारास अचानकपणे आभाळ ढगांनी दाटून आले. मेघगर्जनेसह वादळी पावसाला सुरूवात झाली. अर्ध्या तासात २५ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. अचानकपणे कोसळलेल्या या पावसामुळे वातावरणातील उकाडा आल्हाददायक स्थितीत परिवर्तीत झाला. यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांनाही मोठा दिलासा मिळाला. बऱ्यापैकी झालेल्या या पावसाने शेतातील करपू लागली धानपिके काही प्रमाणात का होईना वाचण्याची शक्यता बळावली आहे. (शहर प्रतिनिधी)