शहरं
Join us  
Trending Stories
1
कारमध्ये बसून आमदार मोजत होता रोकड; ACB च्या पथकानं रंगेहाथ पकडले, काय आहे प्रकरण?
2
Maharashtra HSC Result 2025: कोकण पुन्हा नंबर 'वन'! बारावीचा निकाल जाहीर; मुलींचीच बाजी, जाणून घ्या निकाल
3
आम्हाला वाचवा...भारताच्या मित्रराष्ट्रांसमोर पाकने पसरले हात; अमेरिका-रशियाने दिले 'हे' उत्तर
4
Instagram Crime News: इन्स्टाग्रामवर मैत्री, तरुणीवर अनेक वेळा बलात्कार अन् बनवले व्हिडीओ; लाखो रुपये उकळले
5
विश्वास बसला नसता...! युक्रेनने समुद्री ड्रोनद्वारे रशियाचे सुखोई फायटरजेट पाडले; अमेरिकेसह सर्व देशांच्या सैन्यांना धक्का
6
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवाद्यांचा आणखी एक कट उघड; गुप्तचर विभागाची माहिती, अलर्ट जारी
7
"लग्नानंतर ४ वर्षांनी घटस्फोट झाला आणि...", Divorce बद्दल पहिल्यांदाच बोलला स्वप्नील जोशी
8
पहलगाम नरसंहाराला देशाचे गृहमंत्री अमित शाह जबाबदार; संजय राऊतांचा हल्लाबोल
9
Video - रेस्टॉरंटमध्ये टेबल न मिळाल्याने संतापले मंत्री; रातोरात बोलावली फूड सेफ्टी टीम अन्...
10
धक्कादायक! पुण्यात नऊ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार; तरुणाविरोधात गुन्हा दाखल
11
Crime News: पंखा दाखवा म्हणाले अन् दुकानदारावर गोळी झाडून निघून गेले; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
12
निवेदिता सराफ यांच्याकडून घडलेली 'ती' चूक, अशोक सराफ यांनी पत्नीला चांगलंच सुनावलं
13
"मी पाकिस्तानात राहणाऱ्या मामे बहिणीशी लग्न केलं कारण..."; जवानाने उघड केलं मोठं रहस्य
14
घरातल्या कमोडमध्ये झाला मोठा धमाका, वेस्टर्न टॉयलेटचा स्फोट होऊन तरुण गंभीर जखमी!
15
"हिला पण गोळी मारायला हवी"; मुस्लिमांच्या विरोधात जाऊ नका म्हणणाऱ्या सैनिकाच्या पत्नीला केलं ट्रोल
16
भारत-पाकिस्तान तणावावर आज संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक; बंद खोलीत चर्चेची मागणी
17
"पाकिस्तानवाल्यांनो मी तुमच्या सोबत, जय पाकिस्तान!" राखी सावंतचा व्हिडीओ पाहून संतापले नेटकरी
18
मोठी बातमी! पहलगाम नंतर पूंछ होते निशाण्यावर, दहशतवाद्यांचा मोठा कट फसला; ५ आयईडी जप्त
19
उदय कोटक यांचा रियल इस्टेट क्षेत्रात धमाका, केली देशातील सर्वात महागडी ४०० कोटींची प्रॉपर्टी डील
20
VIDEO: दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या तरुणाने पोलिसांपासून वाचण्यासाठी नदीत उडी मारली; इम्तियाजचा मृतदेह सापडल्याने खळबळ

पावसाच्या हजेरीने दिलासा

By admin | Updated: October 6, 2014 23:06 IST

महिनाभरापासून पाठ फिरविलेल्या पावसामुळे बळीराजा मोठ्या बिकट संकटात सापडला होता. शेतातील धानपिके पाण्याअभावी करपू लागली होती, तर उकाड्यामुळे नागरिकही त्रस्त झाले होते.

अखेर परतीचा मान्सून बरसला : नागरिकांची उकाड्यातून सुटकांभंडारा : महिनाभरापासून पाठ फिरविलेल्या पावसामुळे बळीराजा मोठ्या बिकट संकटात सापडला होता. शेतातील धानपिके पाण्याअभावी करपू लागली होती, तर उकाड्यामुळे नागरिकही त्रस्त झाले होते. सोमवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास अचानकपणे जोरदार पावसाच्या सरी कोसळल्याने सर्वांसाठी आल्हाददायक ठरले आहे. पावसाळ्याच्या दिवसात मोठ्या प्रमाणात पावसाची गरज असताना यावर्षी पावसाची काही दिवसांचा अपवाद वगळता क्वचितप्रसंगी पाऊसाने हजेरी लावली होती. सुरूवातीला शेतकऱ्यांसमोर मोठे अस्मानी संकट ओढवल्यानंतर त्यांनी कसेबसे धानाची रोवणी आटोपली. त्यानंतर काही दिवसासाठी पावसाने जणू रजा घेतल्याची परिस्थिती होती. 'कधी ऊन्ह कधी पाऊस' अशा अस्मानी परिस्थितीत बळीराजाच्या चेहऱ्यावर मोठ्या आर्थिक विवंचनेचा प्रश्न आवासून दिसून येत होता. दुबारनंतर तिबार पेरणीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले. अशाही परिस्थितीत अनेक शेतकऱ्यांची पऱ्हे करपले तर काहींनी असलेल्या साधन सामुग्रीवरून ते जगवून रोवणी आटोपली. मागील महिनाभरापासून पावसाने अक्षरश: दडी मारली होती. धानपिके गर्भावस्थेत असताना धानाला शेवटच्या एका पाण्याची नितांत गरज आहे. मात्र उपलब्ध सिंचन व्यवस्था विद्युत विभागाच्या भारनियमनामुळे कुचकामी झाल्याने शेतकऱ्यांमध्ये संकट उभे ठाकले होते. ज्यांच्याकडे साधन उपलब्ध होते त्यांनी सिंचन करून धानाला जगविले. मात्र कोरडवाहू शेतकऱ्यांची यात फजिती झाली. निसर्गावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांचे पिके पाण्याअभावी करपू लागल्याने त्यांनी देवाकडे पाण्यासाठी साकळे घालणे सुरू केले होते. दरम्यान, हिवाळ्याच्या तोंडावर सध्या उकाडा वाढल्याने जणू उन्हाळाच लागल्याची प्रचिती मागील काही दिवसांपासून येत होती. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक व शेतकरी पाण्यासाठी देवाला साकळे घालून आर्जव करीत असल्याचे दिसून येते होते. आज सकाळपासून निरभ्र वातावरण होते. मात्र दुपारी ३ च्या सुमारास अचानकपणे आभाळ ढगांनी दाटून आले. मेघगर्जनेसह वादळी पावसाला सुरूवात झाली. अर्ध्या तासात २५ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. अचानकपणे कोसळलेल्या या पावसामुळे वातावरणातील उकाडा आल्हाददायक स्थितीत परिवर्तीत झाला. यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांनाही मोठा दिलासा मिळाला. बऱ्यापैकी झालेल्या या पावसाने शेतातील करपू लागली धानपिके काही प्रमाणात का होईना वाचण्याची शक्यता बळावली आहे. (शहर प्रतिनिधी)