शहरं
Join us  
Trending Stories
1
जपानमधील एका एक्सप्रेसवेवर ५० हून अधिक वाहनांची टक्कर, एकाचा मृत्यू; २६ जण जखमी
2
"सीमा उघडा, आम्हाला वाचवा..."; बांगलादेशात अडकलेल्या हिंदूंची भारताकडे विनवणी
3
भयंकर! पंतप्रधान आवास योजनेचा मिळाला नाही लाभ; पेट्रोल टाकून थेट ग्रामपंचायतीला लावली आग
4
Nitish Kumar : Video - मुख्यमंत्री नितीश कुमारांच्या ताफ्यातील कारची DSP ना धडक; थोडक्यात वाचला जीव
5
दररोज करा छोटी बचत, मिळतील १७ लाख रुपये; पोस्ट ऑफिसची 'ही' स्कीम करेल मालामाल, पटापट पाहा डिटेल्स
6
PNB Fraud: पंजाब नॅशनल बँकेत पुन्हा झाला ₹२,४३४ कोटींचा घोटाळा; RBI ला दिली माहिती, कोणावर आहे आरोप?
7
वृश्चिक राशीसाठी नवीन वर्ष 2026: आव्हानांमधून प्रगतीची 'आशा'; परिश्रमात सातत्य ठेवल्यास होणार नाही निराशा 
8
मित्रपक्षाच्या ३ माजी नगरसेवकांवरही भाजपाचा गळ, ९०हून अधिक सक्षम उमेदवार असल्याचा दावा
9
औटघटकेची ठरली तिसऱ्या आघाडीची चर्चा! निलंबित नेत्यांची होणार घरवापसी, नागपुरात घेतली वरिष्ठांची भेट
10
काँग्रेसची ४८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर; २९ नवे चेहरे रिंगणात, पहिल्या यादीत कोणाची नावे?
11
तूळ राशीसाठी नवीन वर्ष 2026 नियोजन आणि स्वप्नपूर्तीचे वर्ष; 'या' एका चुकीमुळे होऊ शकते मोठे नुकसान!
12
पिंपरीत आम्ही १२५ जागा जिंकू, अजित पवारांना फक्त तीनच जागा मिळणार', भाजपा आमदाराचा दावा
13
फोननंतर विजयकुमारांचा बंडाचा झेंडा; गोरे, तडवळकर मुंबईकडे, उमेदवारीवरून रणकंदन
14
महाराष्ट्रभर पारा आणखी घसरणार! नवीन वर्षाचे स्वागत थंडीच्या कडाक्यानेच, तयार रहा...
15
आता कॅब बुक करताना मिळणार महिला ड्रायव्हर निवडण्याचा पर्याय, महिलांच्या सुरक्षेसाठा सरकारचा मोठं पाऊल
16
Salman Khan Birthday: मध्यरात्री पनवेलच्या फार्महाऊसवर सलमानने केलं वाढदिवसाचं जोरदार सेलिब्रेशन, व्हिडीओ व्हायरल
17
बांगलादेशमध्ये प्रसिद्ध गायक जेम्सच्या संगीत कार्यक्रमावर जमावाने केला हल्ला, अनेक जण जखमी
18
अमेरिका नाही, या मुस्लिम देशाने २०२५ मध्ये सर्वाधिक भारतीयांना बाहेर काढले; रशियाचाही समावेश
19
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २७ डिसेंबर २०२५: अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल, प्राप्तीत वाढ होईल
20
संपादकीय: कुऱ्हाड - झाडांवर, निष्ठेवरही! महाजनांची मुजोरी आता कार्यकर्त्यांवरही...
Daily Top 2Weekly Top 5

पुनर्वसित सुसूरडोहवासी भोगतात नरकयातना

By admin | Updated: October 11, 2015 01:58 IST

बंदुकीचा धाक दाखवून बळजबरीने सन २०११-१२ मध्ये बावनथडी प्रकल्पांतर्गत येत असलेल्या सुसुरडोह गाववासीयांचे पुनर्वसन गर्रा बघेडा गावालगत करण्यात आले.

राहुल भुतांगे तुमसरबंदुकीचा धाक दाखवून बळजबरीने सन २०११-१२ मध्ये बावनथडी प्रकल्पांतर्गत येत असलेल्या सुसुरडोह गाववासीयांचे पुनर्वसन गर्रा बघेडा गावालगत करण्यात आले. मात्र पुनर्वसीत गावात कोणतीच मुलभूत सुविधा न देता अल्पशी मदत देवून आदिवासींच्या तोंडाला पाने पुसली गेली. प्रकल्पग्रस्तांना मिळालेल्या आश्वासनाची पुर्तता न झाल्याने अजूनही सुुसुरडोहवासी मरणयातना भोगत असल्याचे चित्र गावात पाहावयास मिळते.बावनथडी प्रकल्पाने गिळंकृत केलेल्या सुसुरडोह गावाची लोकसंख्या ७६५ इतकी आहे. १५२ कुटुंब तिथे वास्तव्य करीत आहेत. सन २०११-२०१२ मध्ये बावनथडी प्रकल्पाची गाळभरणी सुरु असताना सुसुरडोहवासीयांनी स्थलांतरण करण्यास विरोध केला. प्रथम जमिनीचा मोबदला द्या, नंतरच स्थलांतरण करू, अशी भूमिका गाववासीयांनी घेतली होती. त्यावेळी शासनाने कठोर भूमिका घेत सुसुरडोहवासी आदिवासींना बंदुकीचा धाक दाखविला. प्रसंगी लाठीचार्ज करून बळजबरीने तेथील आदवासींचे गर्रा बघेडा गावालगत जंगलभागात स्थलांतरण केले. मात्र तिथे मुलभूत सुविधेचा थांगपत्ता नाही. टिनाचे शेड उभारून त्या ठिकाणी त्यांना राहण्यास सांगितले. अजूनपर्यंत त्या आदिवासींना जमिनीचे पट्टे मिळाले नाही. जमिनीच्या खोलगट भागात टिनाचे शेड उभारल्याने टिनशेडच्या चहुबाजूला पाणी साचलेले आहे. पाण्याचा निचरा होण्याकरिता नालीचे देखील बांधकाम करण्यात आले नाही. त्यामुळे आदिवासींच्या राहत्या घरातून झरे फुटल्याने घरात चिखलसदृष्य वातावरण आहे. त्यामुळे तेथील आदिवासी घर सोडून उघड्यावर संसार थाटत आहेत. पुनर्वसीत गावातले संपूर्ण रस्ते गहाळ झाले आहे. सगळीकडे झुडपी जंगल आहे. वन्यप्राण्यांसह सरपटणाऱ्या प्राण्याचा वावर आहे. आदिवासींच्या जमिनी कोणीही हिरावू नये, असा शासनाचा नियम असताना शासनानेच आदिवासींच्या जमिनी हिरावल्या. परंतु अद्यापही जमिनीचा मोबदला मिळाला नाही. अजूनपर्यंत आदिवासींना कोणतेही रोजगार मिळाले नाही. शेतीवर उपजिविका चालविणाऱ्या आदिवासींची शेतजमीन नसल्याने त्यांनी वनजमिनीवर शेतीची लागवड केली. परंतु तिथेही वनविभाग आडवा होवून आदिवासीयांनी पिकविलेल्या शेतीवर विषारी औषधाची फवारणी करून पिकवलेली शेती नष्ट करीत आहेत. अशा परिस्थितीत संसाराचा गाडा हाकणे कठीण आहेत. काही आदिवासी महिला पुरुष २० कि.मी. अंतरावरील डोंगरी बु. मॉयलमध्ये कामाला जात आहेत. त्यामुळे बालक वर्ग दिवसभर घरीच राहत असून त्यांना जंगली प्राण्यांपासून धोका आहे. सुसुरडोह गावाला महसूली ग्रामपंचायतीचा दर्जा मिळाला. मात्र अजूनपर्यंत तो प्रस्ताव शासन दरबारी धुळखात आहे. येथील विकासकामे बंद आहेत. विविध कामासाठी लागणारे दाखले ग्रामपंचायत मधून मिळत असतात. मात्र या ग्रामपंचायतीमध्ये एक एक, दोन दोन महिने ग्रामसेवकाचा पत्ताच सापडत नाही. त्याचप्रमाणे येथील राशन दुकान २० कि.मी. अंतरावरील रोंघा येथील दुकानाशी जोडला गेल्याने सदर दुकानदार महिन्याला एकच दिवस येवून राशनाचे वाटप करतो. ज्या दिवशी दुकानदार आला त्या दिवशी जर तेथील आदिवासी मजुरीकरिता बाहेर गेले तर त्यांना राशन घ्यायला २० कि.मी. पायपीट करावी लागते. जणू सुसुरडोहवासी मरणयातनाच भोगत असल्याचा अनुभव प्रत्यक्ष पाहणीत आला. जिल्हा परिषदचे महिला व बालकल्याण सभापती शुभांगी राहांगडाले, सुरेश राहांगडाले, सुरेश मलेवार, पंचायत समिती सदस्या सुनिता राहांगडाले यांनी गावाची पाहणी समस्या निकाली काढणार असल्याचे त्यांनी सांगितले.