शहरं
Join us  
Trending Stories
1
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
2
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
3
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
4
मुंबई विमानतळाजवळील निर्धारित उंचीपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींवर काय कारवाई केली?
5
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
6
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ५७,५०९ कोटींच्या पुरवणी मागण्या
7
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
8
एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा विश्वास; पक्षनेतेपदी फेरनिवड, आगामी निवडणुकीचे सर्वाधिकार शिंदेंकडेच
9
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले हीच सर्वांत मोठी उपलब्धी, महायुतीची सत्ता आली: चंद्रशेखर बावनकुळे
10
जून महिन्यात मुंबईने दिला १ हजार कोटींचा महसूल; मुंबईत एक महिन्यात झाली ११,५२१ मालमत्तांची नोंदणी
11
शेफाली जरीवाला मृत्यू प्रकरणी पोलिसांकडून १४ जणांचे जबाब
12
कल्याण आरटीओचा अजब कारभार, स्टॅंडऐवजी दरपत्रक साेशल मीडियावर
13
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
14
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
15
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
16
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
17
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
18
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
19
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
20
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव

पुनर्वसित सुसूरडोहवासी भोगतात नरकयातना

By admin | Updated: October 11, 2015 01:58 IST

बंदुकीचा धाक दाखवून बळजबरीने सन २०११-१२ मध्ये बावनथडी प्रकल्पांतर्गत येत असलेल्या सुसुरडोह गाववासीयांचे पुनर्वसन गर्रा बघेडा गावालगत करण्यात आले.

राहुल भुतांगे तुमसरबंदुकीचा धाक दाखवून बळजबरीने सन २०११-१२ मध्ये बावनथडी प्रकल्पांतर्गत येत असलेल्या सुसुरडोह गाववासीयांचे पुनर्वसन गर्रा बघेडा गावालगत करण्यात आले. मात्र पुनर्वसीत गावात कोणतीच मुलभूत सुविधा न देता अल्पशी मदत देवून आदिवासींच्या तोंडाला पाने पुसली गेली. प्रकल्पग्रस्तांना मिळालेल्या आश्वासनाची पुर्तता न झाल्याने अजूनही सुुसुरडोहवासी मरणयातना भोगत असल्याचे चित्र गावात पाहावयास मिळते.बावनथडी प्रकल्पाने गिळंकृत केलेल्या सुसुरडोह गावाची लोकसंख्या ७६५ इतकी आहे. १५२ कुटुंब तिथे वास्तव्य करीत आहेत. सन २०११-२०१२ मध्ये बावनथडी प्रकल्पाची गाळभरणी सुरु असताना सुसुरडोहवासीयांनी स्थलांतरण करण्यास विरोध केला. प्रथम जमिनीचा मोबदला द्या, नंतरच स्थलांतरण करू, अशी भूमिका गाववासीयांनी घेतली होती. त्यावेळी शासनाने कठोर भूमिका घेत सुसुरडोहवासी आदिवासींना बंदुकीचा धाक दाखविला. प्रसंगी लाठीचार्ज करून बळजबरीने तेथील आदवासींचे गर्रा बघेडा गावालगत जंगलभागात स्थलांतरण केले. मात्र तिथे मुलभूत सुविधेचा थांगपत्ता नाही. टिनाचे शेड उभारून त्या ठिकाणी त्यांना राहण्यास सांगितले. अजूनपर्यंत त्या आदिवासींना जमिनीचे पट्टे मिळाले नाही. जमिनीच्या खोलगट भागात टिनाचे शेड उभारल्याने टिनशेडच्या चहुबाजूला पाणी साचलेले आहे. पाण्याचा निचरा होण्याकरिता नालीचे देखील बांधकाम करण्यात आले नाही. त्यामुळे आदिवासींच्या राहत्या घरातून झरे फुटल्याने घरात चिखलसदृष्य वातावरण आहे. त्यामुळे तेथील आदिवासी घर सोडून उघड्यावर संसार थाटत आहेत. पुनर्वसीत गावातले संपूर्ण रस्ते गहाळ झाले आहे. सगळीकडे झुडपी जंगल आहे. वन्यप्राण्यांसह सरपटणाऱ्या प्राण्याचा वावर आहे. आदिवासींच्या जमिनी कोणीही हिरावू नये, असा शासनाचा नियम असताना शासनानेच आदिवासींच्या जमिनी हिरावल्या. परंतु अद्यापही जमिनीचा मोबदला मिळाला नाही. अजूनपर्यंत आदिवासींना कोणतेही रोजगार मिळाले नाही. शेतीवर उपजिविका चालविणाऱ्या आदिवासींची शेतजमीन नसल्याने त्यांनी वनजमिनीवर शेतीची लागवड केली. परंतु तिथेही वनविभाग आडवा होवून आदिवासीयांनी पिकविलेल्या शेतीवर विषारी औषधाची फवारणी करून पिकवलेली शेती नष्ट करीत आहेत. अशा परिस्थितीत संसाराचा गाडा हाकणे कठीण आहेत. काही आदिवासी महिला पुरुष २० कि.मी. अंतरावरील डोंगरी बु. मॉयलमध्ये कामाला जात आहेत. त्यामुळे बालक वर्ग दिवसभर घरीच राहत असून त्यांना जंगली प्राण्यांपासून धोका आहे. सुसुरडोह गावाला महसूली ग्रामपंचायतीचा दर्जा मिळाला. मात्र अजूनपर्यंत तो प्रस्ताव शासन दरबारी धुळखात आहे. येथील विकासकामे बंद आहेत. विविध कामासाठी लागणारे दाखले ग्रामपंचायत मधून मिळत असतात. मात्र या ग्रामपंचायतीमध्ये एक एक, दोन दोन महिने ग्रामसेवकाचा पत्ताच सापडत नाही. त्याचप्रमाणे येथील राशन दुकान २० कि.मी. अंतरावरील रोंघा येथील दुकानाशी जोडला गेल्याने सदर दुकानदार महिन्याला एकच दिवस येवून राशनाचे वाटप करतो. ज्या दिवशी दुकानदार आला त्या दिवशी जर तेथील आदिवासी मजुरीकरिता बाहेर गेले तर त्यांना राशन घ्यायला २० कि.मी. पायपीट करावी लागते. जणू सुसुरडोहवासी मरणयातनाच भोगत असल्याचा अनुभव प्रत्यक्ष पाहणीत आला. जिल्हा परिषदचे महिला व बालकल्याण सभापती शुभांगी राहांगडाले, सुरेश राहांगडाले, सुरेश मलेवार, पंचायत समिती सदस्या सुनिता राहांगडाले यांनी गावाची पाहणी समस्या निकाली काढणार असल्याचे त्यांनी सांगितले.