शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
4
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
5
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
6
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
7
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
8
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
9
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
10
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
11
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
12
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
13
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
14
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
15
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
16
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
17
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
18
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

६३ प्रकल्पांतील उपयुक्त जलसाठ्यात घट

By युवराज गोमास | Updated: May 28, 2024 11:35 IST

नवतपात पारा ४३ अंशांवर : जिल्ह्यात वेळेत मान्सून न बरसल्यास जलसंकट होणार गंभीर

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : नवतपाला प्रारंभ झाल्यापासून जिल्ह्याच्या तापमानात दोन अंशांची भर पडली आहे. सध्याचे तापमान ४२ अंशांवर असून पारा ४७ अंशांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. परिणामी, जिल्ह्यातील ६३ (मध्यम, लघु व जुने मालगुजारी तलाव) प्रकल्पातील उपयुक्त जलसाठ्यात कमालीची घट झाली आहे. सध्या या प्रकल्पातील उपयुक्त जलसाठा ३४.९३ दलघमी असून टक्केवारी २८.६८४ इतकी आहे. मान्सून वेळेत न बरसल्याने जिल्ह्यात जलसंकट आणखी गडद होण्याची शक्यता आहे.

भंडारा जिल्हा तलावांचा, जिल्हा म्हणून ओळखला जातो. जंगल टेकड्यांच्या पायथ्याशी लहान-मोठे तलाव व बोड्याची संख्या अधिक आहे. जिल्ह्यात राज्य पाटबंधारे विभागाच्या अख्यत्यरित ४ मध्यम प्रकल्प, ३५ लघु प्रकल्प, तर २८ जुने मालगुजारी तलाव आहेत. शेती सिंचनासाठी येथील तलावांचा मोठा उपयोग होतो. तलावांमुळे जिल्ह्यातून धान उत्पादक शेतकरी समृद्ध झाला आहे; परंतु जिल्ह्यातील अनेक तलावांची स्थिती दयनीय आहे. तलावांत अतिक्रमणे वाढली असून वर्षानुवर्षांपासून गाळाचा उपसा झालेला नाही. तलाव उथळ असल्याने सिंचन क्षमता कमालीने रोडावली आहे.

जिल्ह्यातील नदी, नाले कोरडेभंडारा जिल्ह्यात वैनगंगा, बावनथडी, चुलबंद व सूर या प्रमुख नद्या आहेतः परंतु सर्वच नद्या कोरड्या पडल्या आहेत. नाल्यांत तर मार्च महिन्यापासून पाण्याचा ठणठणाट आहे. जून महिन्यात नदी काठावरील गावातील जलसंकट गंभीर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

३१ लघु प्रकल्पात २३ टक्के उपयुक्त जलसाठाजिल्ह्यात पाटबंधारे विभागाध्या अधिकार क्षेत्रात ३१ लघु प्रकल्प आहे. तलावांतील उपयुक्त जलसाठा १२.५५६ दलघमी आहे.सद्यःस्थितीत या उपयुक्त जलसाठ्याची टक्केवारी २३.४५ इतकी आहे.

जुने मालगुजारी तलावांची स्थिती गंभीर■ जिल्ह्यात २८ जुने मालगुजारी तलाव असून यातील पिंपळगाव तलाव वगळता सर्व तलावातील उपयुक्त जलसाठा १ दलघमीपेक्षा कमी आहे. या तलावातील एकंदर उपयुक्त जलसाठा ६.०३६ दलघमी असून टक्केवारी २३.७५८ इतकी आहे. बहुतेक लहान स्वरूपाचे तलाव कोरडे पडले आहेत.

पाणीपुरवठा योजना प्रभावित■ जिल्ह्यातील बहुतेक ग्रामीण पाणीपुरवठा योजनांचे पंपहाऊस तलाव, नदी व नाल्यांच्या काठावर आहेत: परंतु सद्यःस्थितीत जलसंकट वाढल्याने पाणीपुरवठा योजना प्रभावित झाल्या आहेत. अनेक गावांत दिवसातून एकदाच पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे.

तालुक्यातील स्थितीप्रकल्प                                         जलसाठा                               टक्केवारी                                         चांदपूर                                          ११.५५५ दलघमी                         ४०,०१२बघेडा                                            १.०३८ दलघमी                           २२.८७४बेटकर-बोथली                                १.४९० दलघमी                            ४०,६४४सोरणा                                           २.२५२ दलघमी                           ३९.२६८ 

 

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईbhandara-acभंडारा