शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

५.१८ लाखांच्या दंडाची वसुली

By admin | Updated: July 17, 2015 00:32 IST

तालुक्यातील वैनगंगा नदीच्या विविध घाटावरून अधिकृतरित्या रेती उपसा करण्यासाठी घाटाचे रितसर लिलाव झालेले आहेत.

रेती वाहतूकप्रकरण : पवनीतील कारवाई, दिवसरात्र रेतीचा उपसा करून चोरीत वाढ ंअशोक पारधी पवनीतालुक्यातील वैनगंगा नदीच्या विविध घाटावरून अधिकृतरित्या रेती उपसा करण्यासाठी घाटाचे रितसर लिलाव झालेले आहेत. तरीदेखील संपुष्टात आलेले नाही. झटपट श्रीमंत होण्यासाठी नामांकित लोकांनी रेतीघाटाकडे लक्ष केंद्रीत केलेला आहे. नियमाप्रमाणे रेतीचा उपसा करणे, वाहतूक करणे यामुळे झटपट श्रीमंती पदरी पडत नाही. त्यामुळे चौर्यकर्म हा उपाय रेतीमाफियांनी शोधून काढला. संबंधित अधिकाऱ्यांचा आशिर्वाद असेल तर सहजरित्या चोरी करता येते असा 'फार्मुला' वापरून दिवसरात्र रेतीचा उपसा करून चोरी होवू लागली आहे.वृत्तपत्रात बातम्या लागल्या की एखादी कार्यवाही करायची व पुन्हा स्वस्थ बसायचे, असे धोरण जिल्ह्यापासून तालुकास्तरावरील अधिकाऱ्यांनी ठरवून ठेवलेले आहे. त्यानुसार कार्यवाही सुरू असते. १३ जुलै रोजी निलज फाट्यावर अडविण्यात आलेले ओव्हरलोड ट्रक हा कार्यवाहीचा एक भाग आहे. तहसील कार्यालयाकडून अडविण्यात आलेल्या ३३ ट्रक मालकांकडून ६ लाख २० हजार ८०० रूपये दंड वसूल करण्यासाठी प्रशासनाने पावले उचलली. त्यापैकी ५ लाख १८ हजार २०० दंडाची रक्कम तहसिलदार नरेंद्र राचेलवार यांनी १५ जुलैपर्यंत वसूल केली. शासनाचे तिजोरीत रक्कम जमा झाली. आतापर्यंत दंडाची रक्कम वसूल करून रेती जप्त करून ट्रक सोडले जात होते. परंतु पहिल्यांदाच ३३ ट्रकसह रेती जप्त करण्यात आलेली आहे. सर्व ट्रक पवनीचे बस आगारात उभे करण्यात आले. प्रति ट्रक ३०० रूपये जागेचा पार्किंग भाडा ट्रक मालकाकडून दरदिवसाला वसूल केल्या जात आहे.१३ जून २०१५ चे महसूल व वनविभागाच्या अध्यादेशाचा आधार घेवून ट्रक मालकावर ट्रक जप्तीची कार्यवाही करण्यात येत असल्याचे तहसिलदार राचेलवार यांनी सांगितले. परंतु दि. १३ जुलै ते १६ जुलै या दरम्यान ट्रक मालकांचे ट्रक कामाशिवाय उभे ठेवण्यात आलेले आहेत. दरम्यान नहरात बुडून एका ट्रक चालकाचा मृत्यू झाला. वाहतुकीचा रोजगार करणाऱ्या ट्रक मालकवर शासनाकडून दंडात्मक कारवाई केली जात आहे. परंतू रेतीघाटावरून क्षमतेपेक्षा जास्त रेती भरून दिल्या जात आहे. त्या झटपट श्रीमंत होण्यासाठी एवढा आटापिटा करणाऱ्या घाट लिलावात घेणाऱ्या व्यावसायीकांवर कार्यवाही करण्यास प्रशासन मागेपुढे पाहत आहे.रेतीची चोरी असो की क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक याचे मुळ उगमस्थान रेतीघाट असल्याने त्यावर कार्यवाही व्हावी, अशी नागरिकांची मागणी आहे. जप्त केलेले ट्रक सुरक्षित राहावे यासाठी तहसिलदार नरेंद्र राचेलवार व त्यांचे कर्मचारी, पोलीस निरीक्षक मधुकर गिते व पोलीस कर्मचारी पुर्णवेळ कार्यरत होते.