शहरं
Join us  
Trending Stories
1
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
2
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
3
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
4
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
5
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
6
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
7
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
8
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
9
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला
10
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
11
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...
12
डोनाल्ड ट्रम्प म्हणतात 'मी युद्ध थांबवलं'; इस्राइलनं गाझामध्ये ६० हजार सैनिकांना पाठवलं! काय आहे नवा प्लॅन?
13
6 एअरबॅग्ज, 35 Km मायलेज अन् ADAS सह लवकरच येतेय ही ढासू कॉम्पॅक्ट SUV; आणखी कोण कोणत्या कार होतायेत लॉन्च? बघा लिस्ट
14
३ वर्षांच्या एफडीत २ लाखांची गुंतवणूक केल्यास कोणत्या बँकेत मिळेल सर्वाधिक रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
15
१० दिवस लक्ष्मी नारायण योग: ८ राशींचे मंगल-कल्याण, दुपटीने चौफेर लाभ; हाती पैसा, चांगले होईल!
16
Realme: ७०००mAh बॅटरीसह रिअलमीचे दोन धमाकेदार फोन भारतात लॉन्च!
17
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
18
TCS ३०,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार? आयटी कर्मचारी संघटनेच्या दाव्याने खळबळ
19
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
20
आपण सगळेच Bisexual! हे काय बोलली स्वरा भास्कर? म्हणते- "मला डिंपल यादव आवडतात..."

बळीराजाच्या पाल्यांकडून परीक्षा शुल्काची ‘वसुली’!

By admin | Updated: May 19, 2016 00:23 IST

राज्यातील खरीप व रब्बी हंगामातील पैसेवारीत ५० पैशांपेक्षा कमी आलेल्या गावांमध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहीर करण्यात आलेली आहे.

शासनाची शुल्क माफी हवेत : महाविद्यालय म्हणते, अध्यादेशाच्या अंमलबजावणीनंतर बघूप्रशांत देसाई  भंडाराराज्यातील खरीप व रब्बी हंगामातील पैसेवारीत ५० पैशांपेक्षा कमी आलेल्या गावांमध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहीर करण्यात आलेली आहे. अशा गावांमधील बळीराजाच्या पाल्यांना शालेय, महाविद्यालयीन परीक्षा शुल्कात माफी देण्याचा आध्यादेश राज्य शासनाने काढला असला तरी, भंडारा जिल्ह्यात मात्र या आदेशाची अवहेलना होताना दिसून येत आहे.खरीप व रब्बी हंगामातील पैसेवारी ५० टक्केपेक्षा कमी असलेल्या गावांमध्ये शेतकऱ्यांसमोर आर्थिक अडचण निर्माण झालेली आहे. त्यांच्यावर कर्जाचे डोंगर उभे झालेले आहे. यामुळे राज्य मंत्रीमंडळाने अशा गावातील शेतकऱ्यांच्या पाल्यांना शैक्षणिक सवलतीसह ग्रामस्थांना अन्य सवलती मिळाव्या यासाठी राज्य शासनाने अध्यादेश काढला. यात ५० टक्केपेक्षा कमी पैसेवारी असलेल्या गावात जमीन महसूलात सुट देण्यात यावी, कृषी पंपाच्या चालू वीज देयकात ३३.५ टक्के सुट देण्यात यावी, शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कात माफी देण्यात यावी, आवश्यक तिथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टँकर्सचा वापर करावा, दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहीर झालेल्या गावातील शेतकऱ्यांच्या शेतीची वीज जोडणी खंडीत न करणे असे महत्वाचे आदेश निर्गमित करण्यात आलेले आहे.शासनाच्या या निर्णयानुसार, भंडारा जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी २३ मार्च २०१६ ला परिशिष्ट - ‘ब’ जिल्ह्यातील ५० पैसे वा त्यापेक्षा कमी अंतिम पैसेवारी असलेल्या गावांत दुष्काळसदृष्य परिस्थिती जाहीर केली आहे. यात भंडारा जिल्ह्यातील ३७१ गावांचा समावेश आहे. यात भंडारा तालुक्यातील चार गावे, तुमसर तालुक्यातील १२ गावे, मोहाडी ७०, साकोली ९४ गावे, लाखांदूर ८९ गावे, लाखनी तालुक्यातील १०२ गावांचा समावेश आहे. भंडारा जिल्ह्यातील या गावांमध्ये दुष्काळीपरिस्थिती असल्याचे जिल्हाधिकारी धीरकुमार यांनी स्पष्ट करून गावांची यादी प्रसिध्दी केली असतानाही विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळालेला नाही. त्यामुळे त्यांच्यावर आर्थिक भुर्दंड बसणार आहे.महाविद्यालयांनी केली परीक्षा शुल्क वसूलउन्हाळी परीक्षांसाठी विद्यार्थ्यांनी शाळा, महाविद्यालयातून फार्म भरलेत. मात्र, आदेशाची अद्याप अंमलबजावणी झाली नसल्याने विद्यार्थ्यांकडून महाविद्यालयांनी परीक्षा शुल्क वसूल केले आहे. याबाबत विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन प्रशासनाला परीक्षा शुल्क माफी असल्याचे शासनाचे पत्र असल्याचे सांगितले. मात्र, महाविद्यालयाने अध्यादेशाची अंमलबजावणी झाली नसल्याचे कारण पुढे करून परीक्षा शुल्क वसूली केली आहे. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतही लूटव्यावसायीक प्रशिक्षक घेवून आत्मनिर्भर होण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या प्रशिक्षणार्थ्यांनाही परीक्षा शुल्कातून सुट मिळालेली नाही. विविध विषयांच्या अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क वसूल करण्यात येत आहे. यात नियमित विद्यार्थ्यांकडून ५५० रूपये तर अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांकडून ६५० रूपये परीक्षा शुल्क घेतल्या जात आहे. याबाबत काही विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून अन्याय दूर करण्याची मागणी केली आहे.