शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

मानव धर्मात येणाऱ्यांना भगवंताची प्राप्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2018 22:09 IST

महानत्यागी बाबा जुमदेवजी यांनी प्रत्येक व्यक्तीला दु:ख, चिंता, व्यसनापासून मुक्ती मिळण्यासाठी मानव धर्माची स्थापना केली. मानवधर्मात येणाऱ्या प्रत्येक परमात्मा एक सेवकास भगवंत प्राप्तीचा मार्ग मिळतो व त्यापासून दु:ख, गरीबी, वाईट व्यसन व अंधश्रद्धा पासून नेहमीची मुक्तता होते.

ठळक मुद्देलता बुरडे : मोहाडीत सेवक संमेलन, हजारो सेवकांची उपस्थिती

आॅनलाईन लोकमतमोहाडी : महानत्यागी बाबा जुमदेवजी यांनी प्रत्येक व्यक्तीला दु:ख, चिंता, व्यसनापासून मुक्ती मिळण्यासाठी मानव धर्माची स्थापना केली. मानवधर्मात येणाऱ्या प्रत्येक परमात्मा एक सेवकास भगवंत प्राप्तीचा मार्ग मिळतो व त्यापासून दु:ख, गरीबी, वाईट व्यसन व अंधश्रद्धा पासून नेहमीची मुक्तता होते. यशाचा मार्ग सापडतो. त्यामुळेच आज लाखो लोकांनी मानव धर्माचा स्वीकार केला आहे, असे प्रतिपादन आध्यात्मिक प्रमुख व मानव धर्म प्रचार व प्रसारीका लता बुरडे यांनी केले.मोहाडी येथे आयोजित परमात्मा एक सेवक सम्मेलनाप्रसंगी त्या बोलत होत्या. संमेलनाचे उद्घाटन लता बुरडे यांच्या हस्ते यशवंतराव ढबाले यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. यावेळी माजी खासदार नाना पटोले, काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर, प्रमोद तितीरमारे, आशिष पातरे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय जोगदंड, ठाणेदार सुधाकर चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष कल्याणी भुरे, रिलायन्स जनरल मॅनेजर हरीश रायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.याप्रसंगी बोलताना नाना पटोले यांनी, परमात्मा एक सेवक मंडळ व्यसनमुक्ती व ग्रामस्वच्छता यासारखे लोकोपयोगी कार्य करीत आहे. परंतु याऊलट शासन दारूच्या दुकाने उघडण्यासाठी न्यायालयाच्या आदेशातून पळवाट काढून दारूची दुकाने उघडून युवकांचे जीवन उधवस्त करीत आहे. जे काम शासनाने करायला हवे, ते काम परमात्मा एक मंडळातर्फे केल्या जात असल्याचे प्रतिपादन केले.विशेष उल्लेखनीय कार्य करणारे नानाजी दमाहे सुखराम रोटके, मुलचंद जुमळे, सुखराम शिवणकर, हरलाल शरणांगते, केशवराव गभने, बाबुराव थोटे, शंकर तरारे, लक्ष्मीकांत तलांडे, वच्छला नागोसे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. स्वागत गित शिवांगी बुरडे हिने प्रस्तुत केले. तत्पूर्वी शोभायात्रेत अनेक प्रकारच्या वाहनांना सजविण्यात आले होते. सर्वाेत्कृष्ट झाकी प्रस्तुत करणाºयाला प्रथम ११ हजार १११, द्वितीय ९ हजार एक, तृतीय ७ हजार एक, चतुर्थ ५ हजार एक, पाचवा ३ हजार ५०१, सहावा दोन हजार ५०१ रूपयांचा पुरस्कार प्रदान करण्यात आले. तर काही झाँकींना स्मृतीचिन्ह देवून गौरविण्यात आले.प्रास्ताविक मोरेश्वर सार्वे यांनी केले. तर संचालन उमेश भोंगाडे, इंद्रपाल मते यांनी केले. कार्यक्रमाला जवळपास ४० हजार सेवकांची उपस्थित होती. गर्दीच्या नियंत्रणासाठी ठाणेदार सुधाकर चव्हाण, उपनिरीक्षक ओमप्रकाश गेडाम, पोहवा जगन्नाथ गिरीपुंजे व मंडळाच्या स्वयंसेवकांनी उत्तम कामगिरी बजावली.कार्यक्रमाला नरेश सव्वालाखे, मोरेश्वर सार्वे, कंठीराम पडारे, राजु पिल्लारे, नत्थु कोहाड, एकनाथ जिभकाटे, राजु माटे, गुरूदास शेंडे, रविकुमार मरसकोल्हे, सरस्वता माटे, व्यवस्थापक भगवान पिल्लारे, श्रीकृष्ण झंझाड, लक्ष्मण माहुले, कैलास ढबाले यांच्यासह सेवकांनी सहकार्य केले.