शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

योजनेचा लाभ शेवटच्या लाभार्थ्यांपर्यंत पोहचवा

By admin | Updated: October 13, 2016 00:53 IST

नवरात्र हा स्त्री शक्तीचा जागर करण्याचा काळ असून स्त्री शक्तीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.

पटोले यांचे प्रतिपादन : प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा शुभारंभभंडारा : नवरात्र हा स्त्री शक्तीचा जागर करण्याचा काळ असून स्त्री शक्तीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. महिला सक्षमीकरणाला चालना देण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचे प्रारुप तळागाळातील कष्टकरी महिलांसाठी तयार केले. महिला दिवसभर कुटूंबासाठी राबते. स्वयंपाक करतांना निघणाऱ्या धुराचा सर्वाधिक जास्त महिलांना सहन करावा लागतो. त्याच्या दुष्परिणामामुळे महिलांमध्ये कॅन्सरचे प्रमाण सर्वाधिक आहे. या बाबींचा विचार करून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी महिलासाठी उज्वला योजना सुरू केली. या योजनेचा शेवटच्या कुटूंबास लाभ मिळाला पाहिजे, असे आवाहन खासदार नाना पटोले यांनी केले.प्रधानमंत्री उज्वला योजनेंतर्गत नवीन लाभार्थ्यांना गॅस सिलेंडर वाटपाचा शुभारंभ खासदार नाना पटोले यांच्या हस्ते पार पडला. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार चरण वाघमारे, इंडेन गॅस कंपनीचे क्षेत्रीय प्रबंधक पी.सी. काटकर, पुरवठा अधिकारी रमेश बेंडे, उद्योगपती सुनिल मेंढे, माजी सभापती कलाम शेख, भाजपचे महामंत्री भरत खंडाईत, नगरसेवक सुर्यकांत इलमे, विकास मदनकर, डी.एफ कोचे उपस्थित होते.यावेळी खा. पटोले म्हणाले, आता सर्वसामान्यांसाठी अच्छे दिन आले आहेत. या योजनेत केवळ १०० रुपयांचा एक स्टॅम्पपेपर भरून सर्व बीपीएल धारकांनी या योजनेचा लाभ घ्यावा. पहिल्या टप्प्यात ३३ हजार ६१ लाभार्थ्यांनी अर्ज भरले. इण्डेन, हिंदुस्थान पेट्रोलियम व भारत गॅस कंपन्यांनी अडचणीविना लाभार्थ्यांना गॅस सिलेंडर द्यावे. ज्या कंपन्या यात हयगय करतील, त्यांच्याविरूद्ध कारवाई करण्यात येईल. कंपन्यांनी या योजनेचा प्रचार व प्रसार करावा. कंपन्यांकडून हयगय होणार नाही, याकडे जिल्हा पुरवठा अधिकऱ्यांनी लक्ष द्यावे, असेही ते म्हणाले. कंपन्यांनी होर्डिंग्ज व बॅनर व इतर मार्गांनी या योजनेचा प्रचार व प्रसार करावा. ज्या बीपीएल धारकांजवळ गॅस कनेक्शन नाही, त्या प्रत्येकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. कंपन्यांना यानिमित्ताने चांगली संधी मिळाली आहे. म्हणून त्यांनी जास्तीत जास्त ग्राहकांना या योजनेचा लाभ द्यावा. आमदार चरण वाघमारे म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून गरिबातील गरीब लोकांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी ही योजना सुरु करण्यात आली आहे. महिलांचे आरोग्य खराब होऊ नये यासाठी ही योजना राबविण्यात येत आहे. ही योजना गावागावातील सर्व कुटूंबापर्यंत पोहचविण्याचे काम कंपन्याचे आहे. या योजनेतसाठी कुटूंबातील महिला ही कुटूंबप्रमुख आहे. परंतु एखाद्या कुटूंबात कर्ती महिला नसेल तर १८ वर्षावरील कुटूंबातील मुलीलासुध्दा कुटूंब प्रमुख करुन या योजनेचा लाभ घेता येते. नागरिक अनेक योजनेसाठी पात्र आहेत. त्याचा लाभ घेतला पाहिजे, असेही ते म्हणाले.प्रास्ताविकात पी.सी. काटकर यांनी प्रधानमंत्री उज्वला योजनेचे महत्व सांगितले. या योजनेअंतर्गत ५ कोटी एलपीजी गॅस कनेक्शन देण्याचा संकल्प आहे. प्रत्येक कुटूंबाच्या महिला प्रमुखाद्वारे ही योजना राबविली जाते. यात स्वेच्छेने ग्राहक शेगडी घेऊ शकतो, असे त्यांनी सांगितले. यावेळी खासदार नाना पटोले यांच्याहस्ते इण्डेन, हिंदुस्थान पेट्रोलिमय व भारत गॅस कंपन्यांच्या नवीन लाभार्थ्यांना गॅस सिलिंडरचे वाटप करण्यात आले. उर्वरित लाभार्थ्यांना त्यांच्या संबंधित कंपनीत गॅस कनेक्शनचे वितरण करण्यात येईल, असे सांगण्यात आले. यावेळी लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)