शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

एसपींचा कॉल अन् तांदळाची तस्करी उघड; ४९ क्विंटल तांदूळ जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2022 13:19 IST

अड्याळ पोलिसांची धाडसी कारवाई

चिचाळ (भंडारा) : रेशनच्या तांदळाची काळ्या बाजारात वाहतूक केली जात असल्याची गोपनीय माहिती अड्याळ पोलिसांना मिळाली. त्यानुसार केलेल्या कारवाईत तांदळाची वाहतूक करणारा ट्रॅक्टर पकडण्यात आला. त्यात ९८ कट्ट्यांमधून ४९ क्विंटल तांदूळ आढळले. ही कारवाई पोलिसांनी शनिवारी सायंकाळी आठ वाजण्याच्या दरम्यान केली.

एसपींच्या कॉलनंतर अड्याळ पोलिसांनी केलेल्या या धाडसी कारवाईने एकच खळबळ उडाली आहे. अधीक्षकांनी अवैध धंद्याबाबत माहिती देण्याचे उघड केल्यानंतर प्रतिसादही मिळत आहे. ट्रॅक्टर ताब्यात घेऊन मूल्यांकनासाठी अन्न व औषध विभाग पवनीला पाठविण्यात आले आहे. मयूर बागडे (रा. पालोरा) असे धान्य घेऊन जाणाऱ्या व्यापाऱ्याचे नाव आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लॉकडाउनमध्ये जनतेला विनामूल्य मिळणारा मोफत धान्य मोठ्या प्रमाणात व्यापाऱ्यांना विक्री होत असल्याच्या प्रकार पाहायला मिळाला. पालोरा येथील व्यापारी मयूर बागडे हा ट्रॅक्टर क्रमांक नसलेल्या ट्रॅक्टरने पालोरा ते भेंडाळा-आसगाव मार्गाने रेशनचे धान्य नेत असल्याची माहिती अड्याळ पोलीस स्टेशनला पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांनी दिली. या अनुषंगाने अड्याळ पोलिसांनी तत्काळ छापा टाकून, ट्रॅक्टर ताब्यात घेऊन अड्याळ पोलीस ठाण्यात जमा केला. ट्रॅक्टरमधून ४९ क्विंटल तांदळाचे कट्टे असा अंदाजे ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तांदळाच्या मूल्यांकनासाठी अन्न व औषधी पुरवठा विभाग पवनी येथे पाठविण्यात आले. तपास पोलीस अधीक्षक लोहित मतांनी यांच्या मार्गदर्शनात अड्याळचे ठाणेदार सुधीर बोरकुटे, पोलीस उपनिरीक्षक हरिचंद्र इंगोले करीत आहेत.

रेशन धान्य कुणाचे ?

शासनाकडून गोरगरिबांना अंत्योदय, बीपीएल, अन्नपूर्णा व एपीएल आधी कार्डधारकांना धान्य दिले जाते; तर लॉकडाऊन महामारीमध्ये शासनाकडून विनामूल्य रेशन दिले जात आहे. मात्र बरेच रेशन दुकानदार रेशन कार्डधारक व्यापाऱ्यांनाच गहू, तांदळाची विक्री करीत असल्याचे चित्र रेशन दुकानात पाहायला मिळत आहे. शासनाने रेशन दुकानावर धाड टाकून विक्री करणाऱ्या लाभार्थ्यांना रंगेहात पकडून त्या कार्डधारकांचे कार्ड रद्द करावे, अशी मागणी होत आहे.

पोलीस अधीक्षकांच्या मोबाईल नंबरने पोलिसांची दमछाक

जिल्ह्यात नव्याने रुजू झालेले पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांनी जिल्हाभर बैठका घेऊन अवैध धंद्यांना वेसण घातली आहे. अवैध धंदे, सट्टा, जुगार व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत. पोलीस अधीक्षक मतानी यांनी आपले दूरध्वनी, मोबाईल क्रमांक जनतेला दिल्याने आता अवैध धंद्यांसह काळाबाजार करणाऱ्या व्यावसायिकांना डोकेदुखी होत असून, पोलिसांची चांगलीच दमछाक होत आहे.

१८ ठिकाणी नाकाबंदी

जिल्ह्यात ऑलआऊट ऑपरेशन अंतर्गत १८ ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली होती. यात ५०२ वाहनांची तपासणी करण्यात आली असून मोटारवाहन कायद्यांतर्गत ४६ प्रकरणे दाखल करण्यात आली आहेत. ८० एटीएम केंद्रांना भेट देण्यात आली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSmugglingतस्करीbhandara-acभंडारा