शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

जिल्ह्यात पाऊस सरासरीएवढा, पण धान राेवणी रखडलेलीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 05:00 IST

भंडारा जिल्हा प्रमुख धान उत्पादक जिल्हा आहे. धान पिकासाठी इतर पिकांपेक्षा पाऊस अधिक हवा असताे. नर्सरीत पऱ्हे टाकल्यानंतर राेवणीसाठी चिखलनी याेग्य पाऊस आवश्यक असताे. जिल्ह्यात मृग नक्षत्रापासून पाऊस बरसला असला तरी सुरुवातीच्या काळात बरसला. पऱ्हे राेवणीयाेग्य झाल्यानंतर पावसाने पाठ फिरविली. तीन आठवडे कडक ऊन तापले. शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या हाेत्या. सिंचनाची सुविधा असलेल्या शेतकऱ्यांनी राेवणी आटाेपली.

ठळक मुद्देजाेरदार पावसाची प्रतीक्षा : जिल्ह्यात आतापर्यंत ५३२.४ मिमी पाऊस

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : संपूर्ण  राज्यात पावसाने हाहाकार उडविला असताना भंडारा जिल्हा मात्र अपवाद ठरत आहे. गत चार दिवसात पाऊस काेसळला असला तरी राेवणीयाेग्य धुंवाधार पाऊस बरसलाच नाही. दुसरीकडे पावसाने आतापर्यंतची सरासरी गाठली असली तरी राेवणी मात्र रखडलेलीच आहे. जिल्ह्यात १ जून ते २४ जुलैपर्यंत ५३२.४ मिमी पावसाची नाेंद झाली असून हा सरासरीच्या ९९ टक्के आहे. या पावसाने पऱ्हे व राेवणी झालेल्या धानाला जीवदान मिळाले असले तरी राेवणीसाठी मात्र दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. भंडारा जिल्हा प्रमुख धान उत्पादक जिल्हा आहे. धान पिकासाठी इतर पिकांपेक्षा पाऊस अधिक हवा असताे. नर्सरीत पऱ्हे टाकल्यानंतर राेवणीसाठी चिखलनी याेग्य पाऊस आवश्यक असताे. जिल्ह्यात मृग नक्षत्रापासून पाऊस बरसला असला तरी सुरुवातीच्या काळात बरसला. पऱ्हे राेवणीयाेग्य झाल्यानंतर पावसाने पाठ फिरविली. तीन आठवडे कडक ऊन तापले. शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या हाेत्या. सिंचनाची सुविधा असलेल्या शेतकऱ्यांनी राेवणी आटाेपली. परंतु भारनियमनामुळे कठीण झाले हाेते. गत आठवड्यापर्यंत जिल्ह्यात ४० हजार हेक्टरवरच राेवणी झाली हाेती. ती एकूण क्षेत्राच्या केवळ २५ टक्के हाेती. दरम्यान मंगळवारपासून जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली. परंतु हा पाऊस जाेर नसल्यासारखा काेसळत हाेता. राज्यात सर्वत्र हाहाकार उडाला असताना भंडारा जिल्ह्यात मात्र रिमझिम पाऊस बरसला. हा पाऊस राेवणीयाेग्य नसल्याने अद्यापही शेतकरी राेवणीची हिम्मत करताना दिसत नाही. जिल्ह्याची पावसाची वार्षिक सरासरी १३३.२ मिमी आहे. १ जून ते २४ जुलै या कालावधीत ५३८.६ मिमी पाऊस अपेक्षित असताे. जिल्ह्यात २४ जुलैपर्यंत ५३२.४ मिमी म्हणजे सरासरीच्या ९९ टक्के पाऊस काेसळला. परंतु हा पाऊस अगदी सुरुवातीच्या काळातील आहे. गत तीन दिवसातील आकडेवारी बघितली तर शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच दिसत आहे.२४ जुलै राेजी जिल्ह्यात १.८ मिमी पावसाची नाेंद करण्यात आली. २३ जुलै राेजी २५.८ मिमी, २२ जुलै राेजी ४०.६ मिमी, २१ जुलै राेजी १४.७ मिमी अशी पावसाची नाेंद झाली आहे. या चार दिवसात जिल्ह्यात कुठेही दमदार पाऊस काेसळला नाही. त्यामुळे राेवणी रखडलेली आहे. 

जिल्ह्यात केवळ २५ टक्के क्षेत्रावर राेवणी- भंडारा जिल्ह्यात कृषी विभागाच्या नियाेजनानुसार एक लाख ६१ हजार ४९३ हेक्टरवर धान पीक घेतले जाणार आहे. आतापर्यंत सुमारे ४५ हजार हेक्टरवरच राेवणी झाली आहे. साधारणत: २५ टक्के राेवणी आटाेपली आहे. अद्यापही माेठ्या प्रमाणात राेवणी रखडल्याचे दिसून येत आहे. यामागचे कारण म्हणजे गत दाेन आठवड्यात जिल्ह्यात दमदार पाऊसच झाला नाही. गत तीन दिवस काेसळलेल्या पावसाने केवळ पऱ्ह्यांना आणि रोवणीला जीवनदान दिले आहे. मात्र आता शेतकरी किती दिवस पऱ्हे नर्सरीत ठेवायचे असे म्हणत राेवणीची गडबड करीत आहे.

 

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती