शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! १२ हजार भावांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ; १६४ कोटींचा घोटाळा आला समोर
2
मुहूर्त ट्रेडिंग: शेअर बाजारात तेजी; निफ्टी वर्षाच्या सर्वोच्च पातळीवर, सेन्सेक्स 62 अंकांनी वधारला
3
BCCI: "आशिया चषक भारताला न दिल्यास..." बीसीसीआयचा मोहसिन नक्वी यांना इशारा!
4
अमित शाह यांच्यावर गंभीर आरोप, प्रशांत किशोर यांनी दाखवला फोटो; जनसुराजच्या उमेदवाराचं अपहरण?
5
अमेरिकेचा 88 लाखांचा H-1B व्हिसा आजपासून लागू; भारतीयांना मोठा दिलासा...
6
Beed: फटाका विझलाय समजून पुन्हा पेटवयाला गेला अन्...; बीडमध्ये सहा वर्षांच्या मुलासोबत भयंकर घडलं!
7
"तात्या विंचू तुम्हाला चावेल...", संजय राऊतांच्या टीकेवर महेश कोठारेंची प्रतिक्रिया, म्हणाले- "ते माझ्याविषयी जे बोलले..."
8
Alyssa Healy : बॅक टू बॅक सेंच्युरी, तरीही स्टार्कच्या बायकोवर आली बाकावर बसण्याची वेळ; कारण...
9
Bhai Dooj 2025: भाऊबीजेसाठी पार्लर ग्लो फक्त चार स्टेप मध्ये! तोही घरच्या साहित्यात, चेहऱ्यावर आणा नैसर्गिक तेज!
10
युनूस सरकारला IMFचा मोठा धक्का! बांगलादेशला दिली जाणारी ८०० दशलक्ष डॉलर्सची मदत थांबवली...
11
"मला तू आवडत नाहीस, कधीच आवडणार नाहीस"; व्हाईट हाऊसमध्ये राडा, ऑस्ट्रेलियन राजदूताला ट्रम्प यांचा टोला
12
India Probable Playing 11 vs Australia 2nd ODI: कांगारुंना जाळ्यात अडकवण्यासाठी गंभीर हा डाव खेळणार?
13
नीतीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री बनूच शकणार नाहीत..! बिहार निवडणुकांपूर्वी मोठी भविष्यवाणी
14
Bhai Dooj 2025: यमराज भाऊबीजेला आले, तेव्हा यमुनेला काय मिळाली ओवाळणी?
15
मृत्यूनंतरही घरात फिरतोय पत्नीचा आत्मा, अभिनेत्याने सांगितला अनुभव म्हणाला- "अचानक कापूरचा वास आला आणि..."
16
चाळीसगावचे माजी आमदार राजीव देशमुख यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन
17
चंद्रपुरात दोन देशी कट्टे, दोन माऊझर, ३५ जिवंत काडतुसे, चार खंजिरांसह चौघांना अटक
18
ट्रम्प यांचा नवा वादग्रस्त निर्णय ! गांजा विक्रेत्याला केले अमेरिकेचा इराकमधील 'विशेष दूत'
19
Diwali Padwa 2025: दिवाळी पाडव्याला नवर्‍याने बायकोला ओवाळणी देणे, हा हक्क की कर्तव्य?

सात वर्षांपासून वार्षिक सरासरीपेक्षा पाऊस कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 05:00 IST

भंडारा जिल्हा प्रमुख धान उत्पादक जिल्हा आहे. धान पिकासाठी मुबलक पावसाची गरज असते. अपुरा पाऊस पडला की त्याचा थेट परिणाम धान उत्पादनावर हाेताे. गत सात वर्षांतील पावसाची आकडेवारी बघितल्यास पावसाने वार्षिक सरासरही गाठल्याचे दिसून येत नाही. २०१४ साली जिल्ह्यात ८८८.६० मि.मी. पावसाची नाेंद झाली हाेती. वार्षिक सरासरीच्या ६९ टक्के पाऊस हाेता. २०१५ मध्ये १०७०.१७ मि.मी. पाऊस काेसळला. हा पाऊस ८४ टक्के हाेता. 

ठळक मुद्देवार्षिक सरासरी १३३०.२ मि.मी. : कमी पावसाचा धान उत्पादनाला फटका, यंदाही अद्याप अपेक्षित पाऊस नाही

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : हमखास पावसाचा प्रदेश म्हणून भंडारा जिल्ह्याची ओळख असली तरी, गत सात वर्षांत पावसाने वार्षिक सरासरी गाठली नाही. जिल्ह्याची वार्षिक सरासरी १३३०.२ मि.मी. असताना २०१४ ते २०२० या सात वर्षांत सरासरीपेक्षा पाऊस कमी पडला. या कमी पावसाचा फटका धान उत्पादनाला बसत आहे. यंदाही पावसाने दडी मारली असून, अद्यापही अपेक्षित पाऊस झाला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील राेवणी खाेळंबलेली आहे. भंडारा जिल्हा प्रमुख धान उत्पादक जिल्हा आहे. धान पिकासाठी मुबलक पावसाची गरज असते. अपुरा पाऊस पडला की त्याचा थेट परिणाम धान उत्पादनावर हाेताे. गत सात वर्षांतील पावसाची आकडेवारी बघितल्यास पावसाने वार्षिक सरासरही गाठल्याचे दिसून येत नाही. २०१४ साली जिल्ह्यात ८८८.६० मि.मी. पावसाची नाेंद झाली हाेती. वार्षिक सरासरीच्या ६९ टक्के पाऊस हाेता. २०१५ मध्ये १०७०.१७ मि.मी. पाऊस काेसळला. हा पाऊस ८४ टक्के हाेता. २०१६ मध्ये ९११.०९ मि.मी. म्हणजे ७१ टक्के पाऊस काेसळला. २०१७ मध्ये ८८४.०१ मि.मी. अर्थात ६७ टक्के, २०१८ मध्ये १००७.८ मि.मी. म्हणजे ७६ टक्के, २०१९ मध्ये १२९७.३ मि.मी. म्हणजे ९८ टक्के आणि गतवर्षी ११८७.३ मि.मी. म्हणजे ८९ टक्के पाऊस काेसळला. २०१९ मध्ये सरासरीच्या जवळ पाऊस पाेहाेचला; परंतु सहा वर्षांत पाऊस ७५ टक्क्यांच्या आसपास काेसळला. जिल्ह्यात माेठ्या प्रमाणात तलाव असून, या तलावाची संचयक्षमता माेठी आहे; परंतु अलीकडल्या काळात तलावांमध्ये पुरेसे पाणी संचित हाेत नाही. तलावातील गाळ हे मुख्य कारण असले तरी पाणलाेट क्षेत्रात पावसाचे प्रमाण कमी हाेत असल्याचा हा परिणाम आहे. वनसंपदेने नटलेल्या भंडारा जिल्ह्यात अलीकडच्या काळात पावसाचे प्रमाण कमी हाेणे हे आगामी काळासाठी धाेक्याची घंटा आहे.

सन २०१३ मध्ये १३२ टक्के पावसाची नाेंद सात वर्षांपूर्वी म्हणजे २०१३ साली जिल्ह्यात सर्वत्र धाे-धाे पाऊस बरसला हाेता. १६८४.३४ मि.मी. म्हणजे १३२ टक्के पाऊस काेसळला हाेता. वार्षिक सरासरीच्या ३२ टक्के पाऊस त्या वर्षी काेसळला. त्यानंतर आजपर्यंत एकदाही पावसाने वार्षिक सरासरी गाठली नाही. मध्यप्रदेशातील पावसाने येताे महापूरभंडारा जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण हाेण्याला मध्यप्रदेशात पडणारा पाऊस आणि मध्यप्रकल्पातील अतिरिक्त पाणी कारणीभूत आहे. गतवर्षी भंडारा जिल्ह्यात आलेल्या महापुराने हाहाकार उडविला हाेता. शेकडाे हेक्टरवरील पीक नष्ट झाले हाेते. विशेष म्हणजे गतवर्षी जिल्ह्यात ८९ टक्के पाऊस झाला हाेता. मात्र महापूर आला. मध्यप्रदेशातील संजय सराेवरातील पाणी साेडल्याने ही स्थिती निर्माण झाली हाेती.

 

टॅग्स :Rainपाऊस