शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
2
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
3
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
4
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
5
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
6
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
7
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
8
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
9
एफडी विसरा, हायवेमध्ये करा गुंतवणूक! १०% पर्यंत मिळेल परतावा; 'राजमार्ग इनविट'ला सेबीची मंजुरी
10
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात कुख्यात गणेश उइकेसह 4 माओवाद्यांचा खात्मा
11
'३ इडियट्स'च्या सीक्वलमधून शर्मन जोशीचा पत्ता कट?, अभिनेता म्हणाला- "मला तर..."
12
मी नाराज कधीच नव्हतो, भाजप हा माझा पक्ष; बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांनी...- सुधीर मुनगंटीवार
13
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
14
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
15
"आज 'महाप्रलय' येणार...!"; स्वतःला अवतार म्हणवणाऱ्या Eboh Noah च्या भविष्यवाणीला घाबरून एकत्र आले हजारो लोक
16
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
17
सीक्रेट सांतानं कर्मचाऱ्याला दिलेलं गिफ्ट पाहून तरुणी भलत्याच खूश झाल्या, असं काय मिळालं?
18
Travel : जगातील एक 'असे' ठिकाण, जिथे वेळेचे कोणतेच बंधन नाही! घड्याळ तर कुणी वापरतच नाही
19
Vinayak Pande and Yatin Wagh: उद्धव ठाकरेंचा आदेश, विनायक पांडे- यतिन वाघ यांची पक्षातून हकालपट्टी; राऊतांची पोस्ट!
20
'खेलरत्न'साठी हार्दिक! दिव्या देशमुखसह २४ खेळाडू अर्जुन पुरस्कारासाठी नामांकित; इथं पाहा संपूर्ण यादी
Daily Top 2Weekly Top 5

पावसाने झोडपले

By admin | Updated: July 24, 2015 00:30 IST

मागील काही दिवसांपासून विश्रांती दिलेल्या पावसाने काल रात्रीपासून पावसाची दमदार हजेरी लावली.

पवनीत अतिवृष्टी : लाखांदूर तालुक्यात ४१.२ मि.मी. पाऊसभंडारा : मागील काही दिवसांपासून विश्रांती दिलेल्या पावसाने काल रात्रीपासून पावसाची दमदार हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या असून रोवणीला वेग येणार आहे. जिल्ह्यात आज २८.५ मि.मी. सरासरी पावसाची नोंद करण्यात आली असून पवनीत ६६ मि.मी. ईतका पाऊस पडला आहे. लाखांदुरात पावसाची चार तास दमदार हजेरीलाखांदूर तालुका प्रतिनिधीने दिलेल्या माहितीनुसार, मागील एक महिन्यापासून पावसाच्या विश्रांतीनंतर आज गुरुवारला दमदार पावसने चांगलेच झोडपले. केवळ चार तासात ४१.२ मि.मी. पाऊस शेतकऱ्यांसाठी सुखावह ठरला असून लांबलेल्या रोवणीला आता वेग येणार आहे. यंदा पावसाने सुरूवात चांगली केली. शेतकऱ्यांना कर्दनकाळ ठरली. पऱ्हे वाढले परंतू पाऊस नसल्याने पऱ्हे करपू लागले. रोवणी खुटली. पऱ्हे टाकल्यानंतर जास्तीत जास्त २० ते २५ दिवसात रोवणी आटोपली तर एकरी उत्पादनात वाढ होण्याची शक्यता धूसर झाली होती. त्यामुळे शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागलेल्या होत्या. मजुरांच्या हाताला काम नव्हते. अशातच आज गुरुवारला सकाळपासून पावसाला सुरूवात झाली. दुपारी चार तासात ४१.२ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. नदी व नाले वाहु लागले असून आता रोवणीला वेग येणार आहे.पवनी तालुक्यात ६६ मि.मी. पाऊस पवनी तालुका प्रतिनिधीने दिलेल्या माहितीनुसार, पवनी तालुका प्रतिनिधीने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारला सायंकाळी झालेल्या पावसाने धानपिकांना जीवनदान मिळाले. मागील २४ तासापासून तालुक्यात ६६ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. आजच्या पावसामुळे धान, सोयाबीन, कापुस, तूर, हळद पिकांना लाभ झाला आहे. या तालुक्यात ८० टक्के शेती निसर्गावर अवलंबून असल्यामुळे शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा आहे. इतका पाऊस होऊनही शेतात पाणी साचून नसल्यामुळे शेतकऱ्यांनी अद्याप रोवणीला सुरुवात केलेली नाही. पवनी तालुक्यात गोसेखुर्द धरण असला तरी या धरणाचे पाणी शेतकऱ्यांना मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांना निसर्गावर अवलंबून राहावे लागत आहे. साकोली, लाखनीत पाऊससाकोली तालुका प्रतिनिधीने दिलेल्या माहितीनुसार, साकोली तालुक्यात जोरदार पाऊस झाला. पावसामुळे शेतकऱ्यांनी रोवणीला प्रारंभ केला असून आता एकाचवेळी मजुरांची गरज पडत असल्यामुळे मजुरांसाठी शोधाशोध सुरू आहे. त्यामुळे बाहेरच्या गावाहून मजूर आणने त्यांना जास्तीची मजुरी देण्याचा प्रकार वाढला आहे.लाखनी तालुका प्रतिनिधीने दिलेल्या माहितीनुसार, मिरेगाव, भुगांव, मेंढा, सोमनाळा येथे राहणाऱ्या विद्यार्थ्यांना पावसामुळे शाळेत जाता आले नाही. सानगडी-सिरेगांव मार्गावरील चुलबंद नदीवर पुल नसल्यामुळे हा मार्ग बंद झाला होता. सानगडी-भुगांव रस्त्यावर मागील दोन वर्षांपासून पुलाचे काम सुरू आहे. त्यामुळे नदी पलिकडच्या गावाचा सानगडीशी संपर्क तुटला होता. पावसामुळे रोवणीला वेग येणार आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)मरेगाव नाला दुथडी पालांदूर, सानगडी येथील वार्ताहराने दिलेल्या माहितीनुसार, जोरदार पावसामुळे मरेगाव नाला ओसंडून वाहत आहे. चुलबंद नदीचा जलस्तर वाढला आहे. त्यामुळे या मार्गाने सानगडीकडे जाणारा मार्ग बंद झाला आहे. सानगडी मोठा गांव असल्यामुळे परिसरातील २० गावातील मुले सानगडीत शिकण्यासाठी येतात. पावसामुळे झाडगांव, पापडा, मिरेगाव, भुगाव, सिलेझरी, घुसोबाटोला, डोंगरगाव, मेंढा, सिवनीबांध, सानगांव, सासरा, कटंगधरा, न्याहारवानी, खंडाला, वटेटेकर येथील विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचता आले नाही.