शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

जिल्ह्यात गारपिटीसह पाऊस; रबी पिकाला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2021 05:00 IST

मंगळवारी सकाळपासून ढगाळ वातावरण होते. दुपारी ३.३० च्या सुमारास वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने झोडपले. पावसासह गाराही पडल्या. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. मंगळवारी असलेल्या आठवडी बाजारातही नागरिकांची तारांबळ उडाली. शेतातील पिकांचेही नुकसान झाले. शहरातील सखल भागात काही ठिकाणी पाणी साचले. तर काही घरात पाणी शिरले. मंगळवारी दुपारच्या सुमारास अचानक वादळी वारा व गारासह तुमसर शहर व तालुक्यात काही ठिकाणी पाऊस पडला.

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : पुन्हा एकदा वेधशाळेचा अंदाज खरा ठराला आहे. मंगळवारी दुपारी मेघगर्जनेसह जिल्ह्यात ठिकठिकाणी गारांसह पाऊस बरसला. तुमसर, मोहाडी तालुक्यात गारपिटीने रबी पिकाला फटका बसल्याची प्राथमिक माहिती आहे. भंडारा शहरात सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास दमदार पावसाने हजेरी लावली. जवाहरनगर, लाखनी, पालांदूर, पवनी  व साकोलीतही पावसाने दमदार हजेरी लावली.तुमसर तालुक्यातील पवनारा येथे दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास अवकाळी पावसाला सुरूवात झाली. गारांचा पाऊस बरसला. परत सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरवात झाली. या पावसामुळे भाजीपाला पिकाला नुकसान झाल्याची माहिती आहे. मोहाडी तालुक्यातील मोहाडी शहर, उसर्रा, लोहारा, गायमुख, सोरणा, जांब व कांद्री, वरठी परिसरातही गारांसह पाऊस बरसला. या पावसामुळे टमाटर, मिरची, कोबी पिकांचे नुकसान झाले आहे. या पावसाचा गहू पिकाला  फायदा होईल, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. आंधळगाव येथील वार्ताहराने दिलेल्या माहितीनुसार, आंधळगाव व परिसरात दुपारी मुसळधार पावसाला सुरवात झाली. गारपिटीचा तडाखा रबी पिकांना बसला आहे. यामुळे शेतकऱ्यांसह भाजीपाला उत्पादकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे चित्र दिसून येत आहे. तुमसर तालुक्यात गारांसह पाऊसमंगळवारी सकाळपासून ढगाळ वातावरण होते. दुपारी ३.३० च्या सुमारास वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने झोडपले. पावसासह गाराही पडल्या. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. मंगळवारी असलेल्या आठवडी बाजारातही नागरिकांची तारांबळ उडाली. शेतातील पिकांचेही नुकसान झाले. शहरातील सखल भागात काही ठिकाणी पाणी साचले. तर काही घरात पाणी शिरले.मंगळवारी दुपारच्या सुमारास अचानक वादळी वारा व गारासह तुमसर शहर व तालुक्यात काही ठिकाणी पाऊस पडला. त्यामुळे अधिक थंडी जाणवू लागली. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. मंगळवारी सकाळपासून ढगाळ वातावरण होते. दुपारी आकाशात ढगांनी गर्दी करून विजेच्या कडकडाटासह जोरदार अवकाळी पावसाने हजेरी लावली. तुमच्या शहरातील विनोबा भावे नगरात सखल भागात पाणी साचले होते तर काहींच्या घरात पाणी शिरले. तालुक्यात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडल्याची माहिती आहे. तालुक्याच्या सीमेवरील काही गावात मोठ्या प्रमाणात गारा पडल्या. अनेक शेतकऱ्यांच्या सध्या धानाचे चुरणे सुरू आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या धान हा शेतात ओला झाला. त्यामुळे त्यांचे मोठे नुकसान झाले. धान ओले होऊ नये म्हणून अनेक शेतकरी धावपळ करताना दिसले. फळबागा लागवड करणारे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. सायंकाळी पुन्हा पावसाला सुरूवात झाली.

उघड्यावरील धानपोती धोक्यात- खरीप हंगामाची कामे वेळेवर आटोपली असली तरी धानाची खरेदी मात्र वेळेवर होवू शकली नाही. धान खरेदी केंद्र वेळेवर सुरू न झाल्याने बहुतांश शेतकऱ्यांचे धान शेतशिवारात किंवा धान खरेदी केंद्र परिसरात पडून होते. आज आलेल्या दमदार पावसाने उघड्यावरील धानपोती धोक्यात आले आहेत. आधीच अस्मानी व सुलतानी संकटाचा सामना करीत असताना ओले झालेले धान शासन घेणार काय, असा सवालही उपस्थित झाला आहे. पाखर झालेल्या धानाची चवही कमी होत असल्याने बळीराजा पुन्हा एकदा चिंतेत सापडणार आहे.

धुसाळा येथे   बालकाचा मृत्यू- मोहाडी तालुक्यातील धुसाळा नवेगाव शेतशिवारात मेघगर्जनेसह पाऊस बरसला. यात आजोबांसोबत म्हशी चराईसाठी गेलेल्या नऊ वर्षीय नातवाचा वीज कोसळल्याने मृत्यू झाला. नयन परमेश्वर पुंडे असे मृत बालकाचे नाव आहे. याचवेळी शेतात बांधलेल्या एक बैलही ठार झाला. या घटनेने परिसरात शोककळा पसरली. नयन हा आंधळगाव येथील शाळेत इयत्ता तिसऱ्या वर्गाचा विद्यार्थी असल्याची माहिती आहे. 

 

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती