शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

जिल्ह्यात गारपिटीसह पाऊस; रबी पिकाला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2021 05:00 IST

मंगळवारी सकाळपासून ढगाळ वातावरण होते. दुपारी ३.३० च्या सुमारास वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने झोडपले. पावसासह गाराही पडल्या. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. मंगळवारी असलेल्या आठवडी बाजारातही नागरिकांची तारांबळ उडाली. शेतातील पिकांचेही नुकसान झाले. शहरातील सखल भागात काही ठिकाणी पाणी साचले. तर काही घरात पाणी शिरले. मंगळवारी दुपारच्या सुमारास अचानक वादळी वारा व गारासह तुमसर शहर व तालुक्यात काही ठिकाणी पाऊस पडला.

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : पुन्हा एकदा वेधशाळेचा अंदाज खरा ठराला आहे. मंगळवारी दुपारी मेघगर्जनेसह जिल्ह्यात ठिकठिकाणी गारांसह पाऊस बरसला. तुमसर, मोहाडी तालुक्यात गारपिटीने रबी पिकाला फटका बसल्याची प्राथमिक माहिती आहे. भंडारा शहरात सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास दमदार पावसाने हजेरी लावली. जवाहरनगर, लाखनी, पालांदूर, पवनी  व साकोलीतही पावसाने दमदार हजेरी लावली.तुमसर तालुक्यातील पवनारा येथे दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास अवकाळी पावसाला सुरूवात झाली. गारांचा पाऊस बरसला. परत सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरवात झाली. या पावसामुळे भाजीपाला पिकाला नुकसान झाल्याची माहिती आहे. मोहाडी तालुक्यातील मोहाडी शहर, उसर्रा, लोहारा, गायमुख, सोरणा, जांब व कांद्री, वरठी परिसरातही गारांसह पाऊस बरसला. या पावसामुळे टमाटर, मिरची, कोबी पिकांचे नुकसान झाले आहे. या पावसाचा गहू पिकाला  फायदा होईल, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. आंधळगाव येथील वार्ताहराने दिलेल्या माहितीनुसार, आंधळगाव व परिसरात दुपारी मुसळधार पावसाला सुरवात झाली. गारपिटीचा तडाखा रबी पिकांना बसला आहे. यामुळे शेतकऱ्यांसह भाजीपाला उत्पादकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे चित्र दिसून येत आहे. तुमसर तालुक्यात गारांसह पाऊसमंगळवारी सकाळपासून ढगाळ वातावरण होते. दुपारी ३.३० च्या सुमारास वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने झोडपले. पावसासह गाराही पडल्या. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. मंगळवारी असलेल्या आठवडी बाजारातही नागरिकांची तारांबळ उडाली. शेतातील पिकांचेही नुकसान झाले. शहरातील सखल भागात काही ठिकाणी पाणी साचले. तर काही घरात पाणी शिरले.मंगळवारी दुपारच्या सुमारास अचानक वादळी वारा व गारासह तुमसर शहर व तालुक्यात काही ठिकाणी पाऊस पडला. त्यामुळे अधिक थंडी जाणवू लागली. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. मंगळवारी सकाळपासून ढगाळ वातावरण होते. दुपारी आकाशात ढगांनी गर्दी करून विजेच्या कडकडाटासह जोरदार अवकाळी पावसाने हजेरी लावली. तुमच्या शहरातील विनोबा भावे नगरात सखल भागात पाणी साचले होते तर काहींच्या घरात पाणी शिरले. तालुक्यात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडल्याची माहिती आहे. तालुक्याच्या सीमेवरील काही गावात मोठ्या प्रमाणात गारा पडल्या. अनेक शेतकऱ्यांच्या सध्या धानाचे चुरणे सुरू आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या धान हा शेतात ओला झाला. त्यामुळे त्यांचे मोठे नुकसान झाले. धान ओले होऊ नये म्हणून अनेक शेतकरी धावपळ करताना दिसले. फळबागा लागवड करणारे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. सायंकाळी पुन्हा पावसाला सुरूवात झाली.

उघड्यावरील धानपोती धोक्यात- खरीप हंगामाची कामे वेळेवर आटोपली असली तरी धानाची खरेदी मात्र वेळेवर होवू शकली नाही. धान खरेदी केंद्र वेळेवर सुरू न झाल्याने बहुतांश शेतकऱ्यांचे धान शेतशिवारात किंवा धान खरेदी केंद्र परिसरात पडून होते. आज आलेल्या दमदार पावसाने उघड्यावरील धानपोती धोक्यात आले आहेत. आधीच अस्मानी व सुलतानी संकटाचा सामना करीत असताना ओले झालेले धान शासन घेणार काय, असा सवालही उपस्थित झाला आहे. पाखर झालेल्या धानाची चवही कमी होत असल्याने बळीराजा पुन्हा एकदा चिंतेत सापडणार आहे.

धुसाळा येथे   बालकाचा मृत्यू- मोहाडी तालुक्यातील धुसाळा नवेगाव शेतशिवारात मेघगर्जनेसह पाऊस बरसला. यात आजोबांसोबत म्हशी चराईसाठी गेलेल्या नऊ वर्षीय नातवाचा वीज कोसळल्याने मृत्यू झाला. नयन परमेश्वर पुंडे असे मृत बालकाचे नाव आहे. याचवेळी शेतात बांधलेल्या एक बैलही ठार झाला. या घटनेने परिसरात शोककळा पसरली. नयन हा आंधळगाव येथील शाळेत इयत्ता तिसऱ्या वर्गाचा विद्यार्थी असल्याची माहिती आहे. 

 

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती