शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
5
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
6
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
7
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
8
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
9
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
10
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
11
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
12
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
13
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
14
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
15
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
16
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
17
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
18
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
19
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे
20
डिंपल यादव यांच्याबद्दल वादग्रस्त विधान; मौलाना साजिद रशीदींना न्यूज चॅनेलच्या स्टुडिओमध्ये मारहाण

भंडारा जिल्ह्यात रब्बी पेरणीचा टक्का घसरला; १.५० लाख हेक्टरचे नियोजन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2024 11:18 IST

Bhandara : आतापर्यंत केवळ १६ हजार हेक्टरमध्ये पेरणी

लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : जिल्ह्यात यंदा रब्बी हंगामासाठी १.५० लाख हेक्टरमध्ये विविध पिकांची पेरणी करण्याचे नियोजन होते. परंतु, २ डिसेंबरपर्यंत केवळ १६ हजार १३० हेक्टर मध्येच रब्बी पिकांची पेरणी झाली आहे. रब्बी हंगामात उन्हाळी धानाचाही समावेश असतो. परंतु, सध्या धान लागवडीस अवकाश आहे. मात्र, आतापर्यंत भाजीपाला व मसाला पीक वगळता अन्नधान्य, कडधान्य, गळीतधान्य या अंतर्गत सर्वसाधारण क्षेत्राचा विचार करता पीक पेरणी निम्म्यापेक्षाही कमी आहे.

जिल्ह्यात रब्बी हंगाम खरीप आटोपल्यानंतर सुरू होते. परंतु, अद्यापही अनेक ठिकाणी शासकीय धान खरेदी सुरू झाले नाही. शेतकऱ्यांकडे पैसा नसल्याने काहींनी कर्ज काढून उधार, उसने घेऊन रब्बीची तजवीज केली. त्यातच महिनाभर विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू होती. त्यामुळे मजूर मिळेनासे झाले होते. परिणामी रब्बीची पेरणी प्रभावित झाल्याचे शेतकऱ्यांकडून सांगितले जात आहे. यंदा कृषी विभागाने रब्बी पिकांसाठी १.५० लाख हेक्टरवर रब्बी पिकांचे नियोजन केले होते. तथापि, डिसेंबरच्या २ तारखेपर्यंत जिल्ह्यात फक्त १६१०३ हेक्टरवर पेरणी झाली आहे. यात बागायती गहू २४४८ हेक्टर, मका २८६, ज्वारी २ हेक्टर, अशी अन्नधान्यांची २७३५ हेक्टर क्षेत्रात लागवड झाली आहे. यंदाही सर्वाधिक हरभरा पिकाची लागवड झाली असून लागवडीचे क्षेत्र ४२५३ हेक्टर इतके आहे. लाख-लाखोरी २८५७ हेक्टर, मूग ९७६, उडीद ९८८, वाटाणा १८२५ पोपट ११८, मसूर २६८, बरबटी ४६, इतर कडधान्य ५ हेक्टर, अशी एकूण ११३०५ हेक्टरमध्ये लागवड झाली.

जवस १२९, मोहरी २२१, सोयाबीन २६६, करडई १४, तीळ २ हेक्टर, असे एकूण गळीत धान्याची ६३२ हेक्टरवर पेरणी झाली. टोमॅटो ८४, मिरची ११४, वांगी १६१, बटाटा ५, कारली २६, भेंडी ८८, कोबी ५१, चवळी ५२, पालेभाज्या ९४, इतर भाज्या ४०, असे मिळून भाजीपाल्याची एकूण ७१५ हेक्टरात लागवड झाली आहे. मसाला पिकांत धने ३५८, कांदा १२, मिरची १२३, असे ४९३ हेक्टर आहे. 

मामा तलाव व मध्यम प्रकल्प तुडूंबयंदा जिल्ह्यात दमदार पाऊस झाल्याने तलाव व प्रकल्पात सरासरी ८० टक्के जलसाठा उपलब्ध आहे. ३२ लघु प्रकल्पात ७५ टक्के, २८ माजी मालगुजारी तलावात ८० टक्के तर ५ मध्यम प्रकल्पांत ९२ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. पावसामुळे जमिनीत ओलावा असल्याने तुर्तास पाणी सोडण्याची मागणी झालेली नाही. मात्र, उन्हाळी धानासाठी पाण्याची गरज भासते. गरज भासल्यास अनेक शेतकरी विहिरी आणि बोअरिंगच्या माध्यमातूनच सिंचनाची सोय करतात. 

तालुकानिहाय लागवड क्षेत्र याप्रमाणे भंडारा - २४४५ हेक्टरमोहाडी - १९६९ हेक्टर तुमसर - ३४८ हेक्टर पवनी - ४०६२ हेक्टर साकोली - ८५४ हेक्टर लाखनी - १०८७ हेक्टरलाखांदूर - ५३३८ हेक्टर

टॅग्स :farmingशेतीRabiरब्बीbhandara-acभंडारा