शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

भंडारा जिल्ह्यात रब्बी पेरणीचा टक्का घसरला; १.५० लाख हेक्टरचे नियोजन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2024 11:18 IST

Bhandara : आतापर्यंत केवळ १६ हजार हेक्टरमध्ये पेरणी

लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : जिल्ह्यात यंदा रब्बी हंगामासाठी १.५० लाख हेक्टरमध्ये विविध पिकांची पेरणी करण्याचे नियोजन होते. परंतु, २ डिसेंबरपर्यंत केवळ १६ हजार १३० हेक्टर मध्येच रब्बी पिकांची पेरणी झाली आहे. रब्बी हंगामात उन्हाळी धानाचाही समावेश असतो. परंतु, सध्या धान लागवडीस अवकाश आहे. मात्र, आतापर्यंत भाजीपाला व मसाला पीक वगळता अन्नधान्य, कडधान्य, गळीतधान्य या अंतर्गत सर्वसाधारण क्षेत्राचा विचार करता पीक पेरणी निम्म्यापेक्षाही कमी आहे.

जिल्ह्यात रब्बी हंगाम खरीप आटोपल्यानंतर सुरू होते. परंतु, अद्यापही अनेक ठिकाणी शासकीय धान खरेदी सुरू झाले नाही. शेतकऱ्यांकडे पैसा नसल्याने काहींनी कर्ज काढून उधार, उसने घेऊन रब्बीची तजवीज केली. त्यातच महिनाभर विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू होती. त्यामुळे मजूर मिळेनासे झाले होते. परिणामी रब्बीची पेरणी प्रभावित झाल्याचे शेतकऱ्यांकडून सांगितले जात आहे. यंदा कृषी विभागाने रब्बी पिकांसाठी १.५० लाख हेक्टरवर रब्बी पिकांचे नियोजन केले होते. तथापि, डिसेंबरच्या २ तारखेपर्यंत जिल्ह्यात फक्त १६१०३ हेक्टरवर पेरणी झाली आहे. यात बागायती गहू २४४८ हेक्टर, मका २८६, ज्वारी २ हेक्टर, अशी अन्नधान्यांची २७३५ हेक्टर क्षेत्रात लागवड झाली आहे. यंदाही सर्वाधिक हरभरा पिकाची लागवड झाली असून लागवडीचे क्षेत्र ४२५३ हेक्टर इतके आहे. लाख-लाखोरी २८५७ हेक्टर, मूग ९७६, उडीद ९८८, वाटाणा १८२५ पोपट ११८, मसूर २६८, बरबटी ४६, इतर कडधान्य ५ हेक्टर, अशी एकूण ११३०५ हेक्टरमध्ये लागवड झाली.

जवस १२९, मोहरी २२१, सोयाबीन २६६, करडई १४, तीळ २ हेक्टर, असे एकूण गळीत धान्याची ६३२ हेक्टरवर पेरणी झाली. टोमॅटो ८४, मिरची ११४, वांगी १६१, बटाटा ५, कारली २६, भेंडी ८८, कोबी ५१, चवळी ५२, पालेभाज्या ९४, इतर भाज्या ४०, असे मिळून भाजीपाल्याची एकूण ७१५ हेक्टरात लागवड झाली आहे. मसाला पिकांत धने ३५८, कांदा १२, मिरची १२३, असे ४९३ हेक्टर आहे. 

मामा तलाव व मध्यम प्रकल्प तुडूंबयंदा जिल्ह्यात दमदार पाऊस झाल्याने तलाव व प्रकल्पात सरासरी ८० टक्के जलसाठा उपलब्ध आहे. ३२ लघु प्रकल्पात ७५ टक्के, २८ माजी मालगुजारी तलावात ८० टक्के तर ५ मध्यम प्रकल्पांत ९२ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. पावसामुळे जमिनीत ओलावा असल्याने तुर्तास पाणी सोडण्याची मागणी झालेली नाही. मात्र, उन्हाळी धानासाठी पाण्याची गरज भासते. गरज भासल्यास अनेक शेतकरी विहिरी आणि बोअरिंगच्या माध्यमातूनच सिंचनाची सोय करतात. 

तालुकानिहाय लागवड क्षेत्र याप्रमाणे भंडारा - २४४५ हेक्टरमोहाडी - १९६९ हेक्टर तुमसर - ३४८ हेक्टर पवनी - ४०६२ हेक्टर साकोली - ८५४ हेक्टर लाखनी - १०८७ हेक्टरलाखांदूर - ५३३८ हेक्टर

टॅग्स :farmingशेतीRabiरब्बीbhandara-acभंडारा