शहरं
Join us  
Trending Stories
1
बळीराजाची खरी दिवाळी...! जीएसटी कपातीचा शेतकऱ्यांना काय-काय फायदा होणार? एकदा पहाच... 
2
वाट माझी बघतोय रिक्षावाला संघटना खूश होणार; कार, दुचाकींवर लागणार एवढा जीएसटी...
3
GST: मोठी घोषणा! २२ सप्टेंबरपासून नवीन जीएसटी दर लागू होणार; काय स्वस्त काय महागले...
4
GST Rate Cuts News: आरोग्य विमा, जीवन विम्यासह ३३ औषधांवर शून्य GST; विद्यार्थ्यांना काय...? 
5
दिल्ली पोलीस पुण्यात आले, बेड्या ठोकून घेऊन गेले; बलात्कार प्रकरणी अभिनेता आशिष कपूरला अटक
6
कामगारांनो, आता ९ तासांऐवजी १२ तास काम, मात्र...; राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय
7
दादर टर्मिनसबाहेरील पार्किंगमध्ये दुचाकी पेटल्या; १०-१२ दुचाकी खाक
8
भिवंडीत उड्डाणपुलावर दोन भरधाव कारचा अपघात, दुचाकीस्वाराचा थेट रस्त्यावर पडून दुर्दैवी मृत्यू
9
यमुनेचा रौद्रावतार! पुरग्रस्तांच्या छावण्यांतही पाणी घुसले; २०१३ ची पातळी ओलांडली
10
मराठा आंदोलन संपताच राज ठाकरे वर्षा बंगल्यावर; घेतले गणपतीचे दर्शन, मुख्यमंत्र्यांकडून स्वागत
11
जिओ कंपनी उदार झाली...! ९ वर्ष झाल्याचे सेलिब्रेशन करणार; एक महिन्याचा रिचार्ज फ्री देणार...
12
जीएसटी परिषदेबाबत पहिली बातमी! २५०० रुपयांच्या आतील चप्पल, बुटांवर ५ टक्के कर : रिपोर्ट
13
...तोपर्यंत उपोषण, शासन निर्णय फाडणे, होळी करणे थांबवा; छगन भुजबळांचं OBC कार्यकर्त्यांना आवाहन
14
प्रमोशन दिलं नाही, महिला कर्मचारी बॉसवर संतापली! 'असा' बदला घेतला की सगळेच अवाक् झाले
15
सावधान! ChatGPT सोबत गप्पा मारताय? तुमची प्रत्येक गोष्ट ऐकू शकतात पोलीस
16
येत्या काही महिन्यात देशात राजकीय बदल होणार; ‘हायड्रोजन बॉम्ब’चा अर्थ काय? २ नेत्यांचे मोठे दावे
17
उत्तर प्रदेशात एक खाजगी बस पाण्यात उलटली, एका मुलासह दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
18
निर्बंधांचा परिणाम...! सौदी अरेबियाने या भारतीय कंपनीला कच्च्या तेलाचा पुरवठा रोखला
19
पाण्याच्या खदाणीत मिळाला महिलेसह मुलीचा मृतदेह; कासारवडवलीतील घटना
20
जुलैपासून टेस्लाने किती बुकिंग मिळविली? एलन मस्कनाही अपेक्षित नव्हते...

खरेदी केलेला धान साठविण्याचा प्रश्न कायमच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2019 06:00 IST

भंडारा जिल्ह्यात भात हे प्रमुख पीक असून लागवड लायक क्षेत्र दोन लाख सात हजार हेक्टर आहे. भात लागवडीखालील एक लाख ७७ हजार क्षेत्र आहे. जिल्ह्यात २०१८-१९ मध्ये एक लाख ४३ हजार मेट्रिक टन धानाची खरेदी करण्यात आली होती. यावर्षीही धानाचे चांगले पीक येण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देअपूरे गोदाम : पणन महामंडळाची क्षमता केवळ तीन हजार मेट्रिक टन

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : धान विकण्यासाठी शेतकऱ्यांची आधारभूत खरेदी केंद्रावर प्रचंड गर्दी झाली असून खरेदी केलेला धान साठविण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.राज्य सहकारी पणन महामंडळाकडे केवळ तीन हजार मेट्रिक टन क्षमतेचे गोदाम असून उर्वरित धान भाडे करारावर घेतलेल्या गोदामात ठेवले जातात. साठवण क्षमतेअभावी धान खरेदी संथ गतीने होत असून याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे.भंडारा जिल्ह्यात भात हे प्रमुख पीक असून लागवड लायक क्षेत्र दोन लाख सात हजार हेक्टर आहे. भात लागवडीखालील एक लाख ७७ हजार क्षेत्र आहे. जिल्ह्यात २०१८-१९ मध्ये एक लाख ४३ हजार मेट्रिक टन धानाची खरेदी करण्यात आली होती. यावर्षीही धानाचे चांगले पीक येण्याची शक्यता आहे. बाजारात व्यापाऱ्यांकडून लूट होत असल्याने शेतकरी आपला धान आधारभूत केंद्रावरच विकत आहे. मात्र खरेदी केलेला धान साठविण्याचा मोठा प्रश्न आहे. जिल्ह्यात केवळ नऊ हजार मेट्रिक टन तांदूळ साठविण्याची क्षमता राज्य शासनाच्या गोदामाची आहे. त्यात राज्य सहकारी पणन महामंडळाकडे स्वत:चे केवळ तीन हजार मेट्रिक टन क्षमतेचे गोदाम आहे. त्यामुळे खाजगी गोदाम भाड्याने घेवून धान साठविला जातो. परंतू खाजगी गोदाम केवळ दोन महिन्यासाठी भाडे करारावर घेण्याचा नियम आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात पिकलेला धान साठवायचा कसा अशा प्रश्न निर्माण झाला आहे.सध्या धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची मोठी गर्दी झाली आहे. परंतु धानाच्या विक्रीसाठी शेतकऱ्यांना दहा ते पंधरा दिवस प्रतीक्षा करावी लागते. या संथगती मागील कारण अपुरे गोदाम असल्याचे बोलले जाते. भात पीक निघाल्यानंतर साठवणुकीचा प्रश्न दरवर्षी निर्माण होतो.परिणामी शेतकऱ्यांना नाईलाजास्तव मिळेल त्या भावात आपला धान व्यापाऱ्याला विकावा लागतो. व्यापाºयांकडे सुध्दा धान साठविण्याची क्षमता नसल्याने ते जिल्ह्याबाहेर धान साठवितात.गोदामांच्या प्रस्तावाला मंजुरीगत वर्षी जिल्ह्यात अतिरिक्त ९००० मेट्रिक टन क्षमतेच्या गोदाम बांधकामासाठी शासनस्तरावर प्रस्ताव सादर करण्यात आले होते. त्यापैकी साकोली, लाखनी, आमगाव (पवनी) येथील ४००० मेट्रिक टन क्षमतेच्या गोदाम बांधकाम प्रस्तावास मंजुरी देण्यात आली. मात्र अद्यापही या कामाला सुरुवात झाली नाही.तात्काळ भरडाई ठरू शकते उपायशेतकऱ्यांकडून खरेदी केलेला आणि गोदामात साठविलेला धान तात्काळ भरडाईसाठी गेल्यास गोदाम रिकामे होऊन नवीन धान साठविण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो. गतवर्षी याच पद्धतीने नियोजन करण्यात आले होते. मात्र यावर्षी पुन्हा तोच प्रश्न निर्माण झाला असून धान तात्काळ भरडाईसाठी देण्याची आवश्यकत आहे.

टॅग्स :Market Yardमार्केट यार्ड