शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
2
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
3
मुंबई गोवा महामार्गांवर CNG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
4
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
5
दहशतवादी आणि पीडित एकाच तराजूत नाहीच..; जयशंकर यांचा पुन्हा एकदा जगाला स्पष्ट संदेश
6
फुफ्फुस निकामी, सतत दम्याचा त्रास अन्..! दुर्धर आजारावर मात करुन ३ वर्षांनी मराठी अभिनेत्याचं कमबॅक
7
T20 Mumbai League : कॅप्टन पृथ्वीची फसलेली चाल; सलामीवीर जोडीदाराला Retire Out करून स्वत:ही परतला तंबूत
8
“निवडणूक आयोग हा भाजपा आयोग, मतांवर टाकलेल्या दरोड्याची चौकशी का करत नाही?”: नाना पटोले
9
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
10
जनता त्यांना नाकारते, ते जनादेशाला नाकारतात! देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींना टोला
11
कोलंबियात भाषण देताना राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या डोक्यात झाडली गोळी; हल्लेखोराला अटक
12
Bengaluru Stampede: कर्नाटक सरकारने भरपाईची वाढवली रक्कम; मृतांच्या कुटुंबियांना देणार २५ लाख रुपये
13
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
14
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
15
शैक्षणिक दाखले, शपथपत्रासाठी स्टॅम्प पेपरची मागणी नियमबाह्य! महसूलमंत्री बावनकुळे यांची अधिकाऱ्यांना तंबी
16
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
17
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
18
गृहप्रकल्पाच्या साइट प्रमोशनसाठी ड्रोन उडविले, अंधेरी येथे तिघे जण पोलिसांच्या ताब्यात
19
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
20
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार

क्वारंटाईन नागरिकांनी केला शाळा परिसर स्वच्छ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2020 05:01 IST

मुंबई, पुणे, कल्याणसह राज्यातील व परराज्यातील अन्य महानगरातून आलेल्या नागरिकांना ठेवण्यासाठी क्वारंटाईन सेंटर म्हणून हसारा येथील जिल्हा परिषद शाळेत व्यवस्था करण्यात आली आहे. त्यानुसार बाहेरून आलेल्या नागरिकांनी शाळेत ठेवण्यात आले आहे. १४ दिवसांचा त्यांचा क्वारंटाईनचा कालावधी होता. हाताला काम नसल्याने त्यांनाही कंटाळवाणे होत होते.

ठळक मुद्देचौदा दिवसाचा कालावधी केला पूर्ण, कोविड समितीने फुलांचा वर्षांव करून दिला निरोप

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : शहरालगतच्या हसारा येथील जिल्हा परिषद शाळेत बाहेरून आलेल्या नागरिकांना क्वारंटाईन करण्यात आले. या कालावधीचा त्यांनी शाळा स्वच्छता तसेच बागेच्या सौंदर्यीकरणासाठी सदुपयोग केला. यामुळे हसारा शाळेचा परिसर स्वच्छ सुंदर झाला आहे.हसारा गावात मुंबई, पुणे, कल्याणसह राज्यातील व परराज्यातील अन्य महानगरातून आलेल्या नागरिकांना ठेवण्यासाठी क्वारंटाईन सेंटर म्हणून हसारा येथील जिल्हा परिषद शाळेत व्यवस्था करण्यात आली आहे. त्यानुसार बाहेरून आलेल्या नागरिकांनी शाळेत ठेवण्यात आले आहे. १४ दिवसांचा त्यांचा क्वारंटाईनचा कालावधी होता. हाताला काम नसल्याने त्यांनाही कंटाळवाणे होत होते. अशात मात्र मिळालेल्या या वेळेचा काही चांगल्या कामासाठी उपयोग व्हावा, या उद्देशातून आपण जेथे राहत आहोत त्या शाळेचीच स्वच्छता करण्याचा निर्णय क्वारंटाईन झालेल्या युवकांनी घेतला. तेथून शाळा स्वच्छतेचे व क्वारंटाईन करण्यात आलेल्या व्यक्तींनी शाळेची साफसफाईची कामे केली.या केंद्रातील नागरिकांवर देखरेख ठेवण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य, कोरोना समिती, तलाठी व आरोग्य अधिकारी, पोलीस पाटील यानी वेळोवेळी आपले कर्तव्य पार पाडली. क्वारंटाईनचे सर्व नियम पाळून हसत खेळत ते १४ दिवसांचा क्वारंटाईन काळ कसा निघून गेला, ते कळलेच नाही. अगदी भावुक होऊन क्वारंटाईन झालेल्यानागरिकांवर फुलांचा वर्षाव करून त्यांना निरोप देण्यात आला.ग्रामस्थांचे सहकार्यतुमसर तालुक्यातील हसारा येथे परजिल्ह्यासह राज्यातील आलेल्या युवकांना शाळेत क्वारंटाईन करण्यात आले. लॉकडाऊनच्या काळात आदेशाचे पालन होणे गरजेचे आहे. यासाठी क्वारंटाईन झालेल्यांना ग्रामस्थांनी सहकार्य करुन आपल्या नागरिकत्वाचे परंपरा जोपासली. याला गावातील युवकांनी प्रतिसाद दिला.उन्हाळ्यातही झाडे हिरवीगारतुमसर तालुक्यातील हसारा येथे क्वारंटाईन असलेल्या युवक व नागरिकांनी वेळेचा सदुपयोग करुन शाळा परिसर स्वच्छ करुन येथील वृक्षांना भर उन्हाळ्यातही हिरवीगार ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. विशेष म्हणजे, मार्च महिन्यापासून शाळा बंद असल्याने शाळा परिसरातील बागेतील फुल व अन्य झाडांची निगा राखणे बंद असल्याने ते कोमेजले होते. या व्यक्तींनी बागेत सफाई करून झाडांना पाणी देवून, केरकचरा काढल्याने आता झाडेही डोलू लागली आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या