लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : विना हेल्मेट वाहन चालविणाऱ्या १२ पाेलिसांसह ५१ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून प्रत्येकी ५०० रुपयाप्रमाणे २५ हजार ५०० रुपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे. जिल्हा पाेलीस अधिक्षक वसंत जाधव यांनी पाेलिसांना हेल्मेट घालणे सक्तीचे केले असून लवकरच जिल्हृ्यातील नागरिकांनाही हेल्मेट सक्तीचे केलेे जाणार आहे. जिल्ह्यात अलीकडे अपघाताचे प्रमाण वाढले असून त्यात दुचाकीच्या अपघाताची संख्या अधिक आहे. हेल्मेट न वापरल्याने अपघातात गंभीर जखमी हाेवून मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्याही जिल्ह्यात माेठी आहे. हा प्रकार राेखण्यासाठी जिल्हा पाेलीस अधिक्षकांनी आपल्या अधिनस्थ पाेलिसांना दुचाकी चालविताना हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे. अनेक पाेलीस गणवेशात आणि साध्या वेशात विनाहेल्मेट दुचाकी चालविताना दिसून येतात. या कायद्याची अमलबजावणी स्वत:पासून करता यावी यासाठी पाेलीस अधिक्षकांनी सर्वप्रथम पाेलीस दलातील कर्मचाऱ्यांना हेल्मेट सक्ती केली. त्याबाबतचे आदेश देवून काटेकाेर अमंलबजावणी करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार पाेलीस मुख्यालयाच्या गेटजवळ विशेष माेहिम राबविण्यात आली. पाेलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वाहनांचे मुळ कागदपत्रे चेक करुन हेल्मेटचा वापर न करणाऱ्या पाेलिसांवर वाहतूक नियंत्रण शाखेचे पाेलीस निरीक्षक शिवाजी कदम यांनी कारवाईकेली. या माेहिमेत हेल्मेट न घालता दुचाकी चालविणारे बारा पाेलीस आढळून आले. तर ३९ इतर नागरिक असे ५१ व्यक्तीं विराेधात कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात आला. आता जिल्ह्यातील नागरिकांसाठी हेल्मेट सक्ती करण्यात येणार असून वाहतूक नियंत्रण शाखा पथक तयार करुन कारवाईचे सत्र सुरु ठेवणार आहे.
दुचाकी अपघातामागे हेल्मेट नसणे आणि माेबाईल बाेलणे हे मुख्य कारण आहे. हेल्मेट नसल्यामुळे अनेक व्यक्ती गंभीररित्या जखमी हाेवून मृत्यूमुखी पडतात. जिल्हा पाेलीसदलातील कर्मचाऱ्यांना हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे. नागरिकांनीही नियमांचे पालन करावे.- वसंत जाधव,पाेलीस अधिक्षक भंडारा