शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
4
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
5
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
6
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
7
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
8
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
9
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
10
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
11
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
12
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
13
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
14
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
15
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
16
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
17
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
18
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
19
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
20
शरीफ उस्मान हादीचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
Daily Top 2Weekly Top 5

डाळींनी बिघडविले गृहबजेट

By admin | Updated: April 4, 2015 00:12 IST

दररोजच्या आहारात वरणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. परंतु डाळींच्या किमती गगनाला भिडल्याने गृहिणी हैराण झाल्या आहेत.

भंडारा : दररोजच्या आहारात वरणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. परंतु डाळींच्या किमती गगनाला भिडल्याने गृहिणी हैराण झाल्या आहेत. तुरीची डाळ महागल्याने ती पुरवून-पुरवून वापरण्यासाठी गृहिणींना मोठी कसरत करावी लागत आहे. सोबतच उडद, मूग व चनाडाळही महागल्याने नाराजी व्यक्त होत आहे. महाराष्ट्रीय जेवणात वरण, भात भाजी पोळी असा नेहमीचा स्वयंपाक केला जातो. जेवण कोरडे वाटू नये तसेच जेवणात प्रथिनांचा समावेश व्हावा यासाठी तुरीच्या डाळीच्या वरणात जास्त महत्त्व आहे. सोबतच पालकभाजी व इतरही भाज्यांमध्ये तूर व चनाडाळ मोठ्या प्रमाणात वापरली जाते. यामुळे या डाळींची मागणी जास्त असते. सोबतच उडद व मुगाची डाळ जेवणात असतेच. परंतु दोन वर्षांपासून डाळींच्या किमती वाढल्यामुळे रोजच्या आहारात डाळींचा समावेश करताना गृहिणींना नाकीनऊ येत आहे. मागील काही वर्षांपासून अवकाळी पावसाने तुरीच्या डाळीचे उत्पन्न घटत चालले. हाच प्रकार चना डाळीसोबतही पहावयास मिळतो. सध्या तूर डाळ ८८ रु पये, उडद ८६, मुगडाळ ९० ते शंभर, चनाडाळ ८० ते ९० असे भाव पाहून गृहिणींच्या डोळात पाणी येत आहेत. जिल्ह्यात तूर व हरभऱ्याचे उत्पन्न घेतल्या जाते. त्यामुळे ग्रामीण भागात किमान खाण्यापुरती दाळ मिळून जाते. शहरात असलेल्या नागरिकांना मात्र सर्व पदार्थ विकत घ्यावे लागतात. तसेच उडद व मुगाच्या डाळीचे उत्पन्न जिल्ह्यात नगन्य आहे. दाक्षिणात्य पदार्थांची क्रेझ वाढल्यामुळे या डाळीचे प्रमाण वाढले आहे. आहारातून पौष्ठिकत्व कमी होत असल्यामुळे डॉक्टर जेवणामध्ये डाळींचा उपयोग करण्याचा सल्ला देतात. सर्वच डाळींचा समावेश आहारात असावे असे डॉक्टर सांगतात. परंतु किमती महागल्याने त्यांचा आहारात नियमित उपयोग कसा करावा असा प्रश्न पडतो. त्यामुळे शासनाने डाळींच्या किमती स्थिर ठेवण्याची मागणी गृहिणींमधून होत आहे. (नगर प्रतिनिधी)घरच्या डाळींची मागणी जास्तबाजारात सर्वच डाळी उपलब्ध असल्या तरी गावांमध्ये उत्पादित होत असलेल्या घरच्या डाळीची मागणी ही जास्त आहे. अशी डाळ थोड्या जास्त किमतीतही घ्यायला शहरातील नागरिक तयार असतात. बाजारात मिळत असलेली तुरीची दाळ ही जास्त पिवळी व चमकदार असली तरी ती पॉलिश केलेली असते हे नागरिकांना आता कळून चुकले आहे. त्यामुळे घरगुती डाळीला जास्त मागणी आहे. आहाराबाबत नागरिक जागरूक झाल्याने प्रत्येक गोष्ट पारखून घेण्याकडे कल असतो. आहारात सर्वत्र डाळींचा समावेश आवश्यकतूर आणि चणाडाळीच्या तुलनेत आहारात बाकी डाळींचा समावेश हा फार अत्यल्प असतो. त्यामुळे दोनच डाळीची मागणी जास्त असल्याने त्यांच्या किमती गगनाला भिडतात. पण यावर पर्याय म्हणून मिक्स डाळींचे वरण जेवणात असावे असा सल्ला आहारतज्ज्ञ देत असतात. सर्वच डाळींचा आहारात सारखा समावेश असल्यास प्रथिनेही भरपूर प्रमाणात मिळतात आण िमहागाईपासून थोडा दिलासा मिळत असतो. त्यामुळे गृहिणींने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.