शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
3
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
4
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
5
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
6
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
7
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
8
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
9
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
10
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
11
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
12
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
13
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
14
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
15
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
16
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
17
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
18
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
19
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
20
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!

तुमसर शहराला दररोज २९ लाख लिटर पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2019 00:38 IST

जिल्ह्यात सूर्य आग ओकत असल्याने जलसाठा झपाट्याने खाली जात आहे. सर्वत्र भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. मात्र तुमसर शहर याला अपवाद ठरले आहे. नगरपरिषदेच्या उत्कृष्ट नियोजनाने भर उन्हाळ्यात शहराला दररोज २९ लाख पाणीपुरवठा केला जात आहे. वैनगंगा नदीतून पाणीपुरवठा सुरू असून बावनथडी धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला.

ठळक मुद्देनगरपरिषदेचे नियोजन : भर उन्हाळ्यात नागरिकांना दिलासा, वैनगंगा नदीत केले इन्टेकवेल

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : जिल्ह्यात सूर्य आग ओकत असल्याने जलसाठा झपाट्याने खाली जात आहे. सर्वत्र भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. मात्र तुमसर शहर याला अपवाद ठरले आहे. नगरपरिषदेच्या उत्कृष्ट नियोजनाने भर उन्हाळ्यात शहराला दररोज २९ लाख पाणीपुरवठा केला जात आहे. वैनगंगा नदीतून पाणीपुरवठा सुरू असून बावनथडी धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्यानंतर कवलेवाडा बॅरेजमधून वैनगंगा नदीपात्रात पाणी सोडण्यात आले. त्याअनुषंगाने तुमसर नगरपरिषदेने पाणीपुरवठा करण्याची यशस्वी योजना तयार केली.स्थानिक स्वराज्य संस्थेचे नागरिकांना पाणीपुरठा करणे हे प्रथम कर्तव्य आहे. उपलब्ध पाणीसाठा व त्याचा योग्यविनियोग केला तर नागरिकांना उन्हाळ्यातही आवश्यक तेवढे पाणी पुरविता येते, हे तुमसर नगरपरिषदेने यशस्वी करून दाखविले. पाण्याची भीषण टंचाई असताना तुमसर नगरपरिषद दरदिवशी २९ लाख लीटर पाणीपुरवठा शहराला करीत आहे. शहरातील प्रभाग क्रमांक ११, ९ व सहामध्ये पाणीटंचाई आहे. तेथे टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. १२ टँकर उपलब्ध करून देण्यात आले असून दीड लाख लिटर पाणीपुरवठा होत आहे.शहरातील जलशुद्धीकरण केंद्रात दोन जलकुंभ आहेत. त्यात १३ लाख व नऊ लाख लीटरचे जलकुंभ आहे. दुर्गा कॉलोनीत दीड लाख लीटर, बावनथडी कॉलोनीत अडीच लाख लीटर, नेहरू नगर दीड लाख लीटर, तिलकनगर दीड लाख लीटर जलकुंभ आहे. यातून दररोज एक तास पाणीपुरवठा होत आहे. धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्यानंतर कवलेवाडा बॅरेडमधून वैनगंगा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग झाला. माडगी व कोष्टी येथे नगरपरिषदेने इन टच वेल तयार करून पात्रातून पाणी विहिरीजवळ वळते केले. त्यामुळे पाणीपुरवठा सुरळीत झाला.४७ कोटींची पाणीपुरवठा योजनानगरोत्थान पाणीपुरवठा योजनेतून ४७ कोटींच्या योजनेचे तुमसर शहरात काम सुरू आहे. ५० टक्के काम झाले आहे. पुढील उन्हाळ्यापूर्वी १०० टक्के शहराला या योजनेतून पाणीपुरवठा केला जाईल. त्यामुळे टँकरमुक्त शहर अशी ओळख तुमसर शहराची होणार आहे.तुमसर शहरात नियोजनबद्ध पद्धतीने पाणीपुरवठा सुरू आहे. भीषण तापमानामुळे पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा. पुढीलवर्षी उन्हाळ्यापूर्वी नवीन पाणीपुरवठा योजना कार्यान्वित होऊन शहर टँकरमुक्त होणार आहे.-प्रदीप पडोळे, नगराध्यक्ष तुमसर.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई