शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानी इतिहासात पहिल्यांदाच ISI प्रमुखाला शिक्षा! इम्रान खानशी संबंध भोवले, जनरल फैज हमीद १४ वर्षे तुरुंगवास
2
इंडिगोचा मोठा निर्णय! त्रस्त प्रवाशांना नुकसानभरपाई; मिळणार १० हजारांचे ट्रॅव्हल व्हाउचर
3
अण्णा हजारे पुन्हा उपोषणाला बसणार, सशक्त लोकायुक्तावरून राज्य सरकारला दिला असा इशारा...  
4
रोहित शर्मा अन् विराट कोहलीच्या पगारात होणार मोठी घट; शुभमन गिलला मिळणार 'बंपर फायदा'?
5
पंढरपूर मोहोळ पालखी मार्गावर १४०० कोटींचा भूसंपादन घोटाळा ! भाजपा- शिंदे सेनेच्या नेत्यांवर सुषमा अंधारेंच्या आरोपांनी खळबळ
6
सोशल मीडियावरचे आरोप गडकरींनी लोकसभेत फेटाळले; म्हणाले, इथेनॉल मिश्रित इंधनावर ARAI ने १ लाख किमी...
7
Western Overseas Study Abroad IPO: पहिल्याच दिवशी IPO नं दिला झटका, आपटून ५२ रुपयांवर आला; लागलं लोअर सर्किट
8
Travel : दुबई स्वप्ननगरी! किती खर्चात होईल ५ दिवसांची शाही सफर; वाचा संपूर्ण बजेट आणि जाणून घ्या व्हिसाबद्दल..
9
"मी सनातन धर्माचा…"; गीता पठणासंदर्भात हुमायूं कबीर यांचं वक्तव्य, केली मोठी घोषणा!
10
Relationship Tips: बायकोला खुश कसे ठेवावे? प्रेमानंद महाराज म्हणाले, 'मी यात तज्ज्ञ नाही पण...'
11
गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! BoAt कंपनीच्या कारभारात गंभीर त्रुटी, नियमांचे उल्लंघन झाल्याचे उघड
12
कोकणात मोठा प्रतिसाद, मुंबई-गोवा ‘वंदे भारत’ २० कोचची करा; प्रवाशांची मागणी पूर्ण कधी होईल?
13
बांगलादेशात युनूस सरकार मावळणार, संध्याकाळी मोठी घोषणा होणार; संपूर्ण जगाचं लक्ष वेधलं
14
पाकिस्तानचे पुन्हा तुकडे होणार? मंत्र्याच्या वक्तव्याने नवा वाद, तज्ञांनी व्यक्त केली चिंता...
15
"एक-दोन नाही, हजारो कपल्सच्या रोमान्सचे व्हिडीओ रेकॉर्ड"; आरोपीचा खळबळजनक खुलासा
16
महाराष्ट्रातील सीमेवरील गावात गुजरातची घुसखोरी; सीमांकन हळूहळू वाढवत असल्याचा स्थानिकांचा दावा
17
'त्यांचे हाथ थरथरत होते, दडपणाखाली होते'; राहुल गांधी अमित शाहांच्या लोकसभेतील भाषणावर आता काय बोलले?
18
लग्नाआधीच मुलगी गरोदर; आईला कळताच तिच्या प्रियकराला घरी बोलवलं अन् मग...शेवट भयंकर!
19
आम्हाला तर पाकिस्तान सोबत येणे शक्य, पण हे दोन देश...; नव्या समूहासंदर्भात काय म्हणाला बांगलादेश
20
'स्वाभिमानाने जगणारा कोकणातला शेतकरी आज चिंतेत', वलसाड हापूसवरून भास्कर जाधव आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

साखर कारखान्यातील अपघातग्रस्तांना आर्थिक मदत द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:30 IST

मानस साखर कारखान्यात काम करणाऱ्या मजुरांच्या सुरक्षेसाठी कोणतेही साधन उपलब्ध नाही. एखाद्या वेळी लहान-मोठी दुर्घटना घडली तर त्याकरिता साधी ...

मानस साखर कारखान्यात काम करणाऱ्या मजुरांच्या सुरक्षेसाठी कोणतेही साधन उपलब्ध नाही. एखाद्या वेळी लहान-मोठी दुर्घटना घडली तर त्याकरिता साधी प्रथमोपचार सुविधासुद्धा उपलब्ध नाही. ८ डिसेंबर २०२० ला प्रेमलाल पटले व राधा प्रसाद हे दोन कर्मचारी खलासी युनिटमध्ये काम करीत असताना उसाच्या रसाचा पाईप फाटल्याने ते गंभीररीत्या भाजल्या गेले. तसेच २ जानेवारी २०२१ ला योगेश भोयर याचे हात भाजले गेले. काही दिवसापूर्वी पवन लाळे, संदीप बागडे यांचे ॲसिडयुक्त पाण्याने अंग भाजल्या गेले होते. परंतु कारखान्यातर्फे त्यांना एक रुपयाचीही आर्थिक मदत देण्यात आलेली नाही.

बॉयलरच्या भट्टीमध्ये कोळसा किंवा लाकूड जाळायला हवे, परंतु बायलरच्या भट्टीमध्ये उसाचे चिपाड जाळण्यात येते. तसेच कारखान्याचे दूषित निकामी पाणी चोरखमारा नहरात सोडले जात आहे आणि नहरातून हे दूषित पाणी शेतकऱ्यांच्या शेतात गेल्याने अनेक शेतकऱ्यांचे पीक नष्ट झाले. याची तक्रार प्रदूषण अधिकारी भंडारा यांना करण्यात आल्यानंतरही त्यांनी कोणत्याच प्रकारची चौकशी केली नाही. याच मागणीकरिता ५ जानेवारीला शिवसेनेतर्फे रास्ता रोको करण्यात येणार होता. परंतु कारखाना व्यवस्थापन व पोलीस विभागातर्फे १० दिवसात समस्या निकाली काढण्याचे आश्वासन दिल्यानंतर रास्ता रोको आंदोलन स्थगित करण्यात आले होते. मात्र १५ दिवस उलटूनही कोणतीच कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे २० जानेवारी रोजी शेतकऱ्यांना घेऊन शिवसेनेतर्फे मानस साखर कारखाना देव्हाडासमोर रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल. असा इशारा देण्यात आला आहे. पत्रपरिषदेला शिवसेना तालुकाप्रमुख अनिल सार्वे, उपतालुकाप्रमुख मधुकर बुरडे, भारतीय विद्यार्थी सेना जिल्हाप्रमुख डॉक्टर हेमंत रहांगडाले, शिवसेना शहरप्रमुख मोहर तेलंग, उपतालुकाप्रमुख प्रणय चव्हाण व शेतकरी उपस्थित होते.

बॉक्स

धुरातील बारीक कणाने डोळ्यांचा त्रास

साखर कारखान्याचा ॲसिडयुक्त पाणी व वायू प्रदूषण खूप मोठ्या प्रमाणात होत आहे. बॉयलरसाठी उसाचे चिपाड जाळत असल्याने तसेच चिमणीची उंची कमी असल्यामुळे जळलेल्या चिपाड्याचे कण हवेत पसरतात व जाणाऱ्या-येणाऱ्या लोकांना डोळ्यांचा भयंकर त्रास होतो. कारखान्याच्या पाच ते सहा किलोमीटरपर्यंत राखेचे सूक्ष्म कण पसरलेले आहेत. उसाचा निकामी झालेला लगदा हा रोडच्या बाजूलाच टाकल्याने, सडलेल्या लगद्यामुळे अतिशय दुर्गंधी पसरलेली असून, जाणाऱ्या-येणाऱ्यांना त्या दुर्गंधीचा भयंकर त्रास होत आहे. त्यामुळे कारखान्याने ॲसिडयुक्त पाण्याची योग्य विल्हेवाट लावावी व प्रदूषण कमी करण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज आहे.