शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

साखर कारखान्यातील अपघातग्रस्तांना आर्थिक मदत द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:30 IST

मानस साखर कारखान्यात काम करणाऱ्या मजुरांच्या सुरक्षेसाठी कोणतेही साधन उपलब्ध नाही. एखाद्या वेळी लहान-मोठी दुर्घटना घडली तर त्याकरिता साधी ...

मानस साखर कारखान्यात काम करणाऱ्या मजुरांच्या सुरक्षेसाठी कोणतेही साधन उपलब्ध नाही. एखाद्या वेळी लहान-मोठी दुर्घटना घडली तर त्याकरिता साधी प्रथमोपचार सुविधासुद्धा उपलब्ध नाही. ८ डिसेंबर २०२० ला प्रेमलाल पटले व राधा प्रसाद हे दोन कर्मचारी खलासी युनिटमध्ये काम करीत असताना उसाच्या रसाचा पाईप फाटल्याने ते गंभीररीत्या भाजल्या गेले. तसेच २ जानेवारी २०२१ ला योगेश भोयर याचे हात भाजले गेले. काही दिवसापूर्वी पवन लाळे, संदीप बागडे यांचे ॲसिडयुक्त पाण्याने अंग भाजल्या गेले होते. परंतु कारखान्यातर्फे त्यांना एक रुपयाचीही आर्थिक मदत देण्यात आलेली नाही.

बॉयलरच्या भट्टीमध्ये कोळसा किंवा लाकूड जाळायला हवे, परंतु बायलरच्या भट्टीमध्ये उसाचे चिपाड जाळण्यात येते. तसेच कारखान्याचे दूषित निकामी पाणी चोरखमारा नहरात सोडले जात आहे आणि नहरातून हे दूषित पाणी शेतकऱ्यांच्या शेतात गेल्याने अनेक शेतकऱ्यांचे पीक नष्ट झाले. याची तक्रार प्रदूषण अधिकारी भंडारा यांना करण्यात आल्यानंतरही त्यांनी कोणत्याच प्रकारची चौकशी केली नाही. याच मागणीकरिता ५ जानेवारीला शिवसेनेतर्फे रास्ता रोको करण्यात येणार होता. परंतु कारखाना व्यवस्थापन व पोलीस विभागातर्फे १० दिवसात समस्या निकाली काढण्याचे आश्वासन दिल्यानंतर रास्ता रोको आंदोलन स्थगित करण्यात आले होते. मात्र १५ दिवस उलटूनही कोणतीच कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे २० जानेवारी रोजी शेतकऱ्यांना घेऊन शिवसेनेतर्फे मानस साखर कारखाना देव्हाडासमोर रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल. असा इशारा देण्यात आला आहे. पत्रपरिषदेला शिवसेना तालुकाप्रमुख अनिल सार्वे, उपतालुकाप्रमुख मधुकर बुरडे, भारतीय विद्यार्थी सेना जिल्हाप्रमुख डॉक्टर हेमंत रहांगडाले, शिवसेना शहरप्रमुख मोहर तेलंग, उपतालुकाप्रमुख प्रणय चव्हाण व शेतकरी उपस्थित होते.

बॉक्स

धुरातील बारीक कणाने डोळ्यांचा त्रास

साखर कारखान्याचा ॲसिडयुक्त पाणी व वायू प्रदूषण खूप मोठ्या प्रमाणात होत आहे. बॉयलरसाठी उसाचे चिपाड जाळत असल्याने तसेच चिमणीची उंची कमी असल्यामुळे जळलेल्या चिपाड्याचे कण हवेत पसरतात व जाणाऱ्या-येणाऱ्या लोकांना डोळ्यांचा भयंकर त्रास होतो. कारखान्याच्या पाच ते सहा किलोमीटरपर्यंत राखेचे सूक्ष्म कण पसरलेले आहेत. उसाचा निकामी झालेला लगदा हा रोडच्या बाजूलाच टाकल्याने, सडलेल्या लगद्यामुळे अतिशय दुर्गंधी पसरलेली असून, जाणाऱ्या-येणाऱ्यांना त्या दुर्गंधीचा भयंकर त्रास होत आहे. त्यामुळे कारखान्याने ॲसिडयुक्त पाण्याची योग्य विल्हेवाट लावावी व प्रदूषण कमी करण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज आहे.