शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाधिकाऱ्यांनी जाणून घेतल्या शेतकऱ्यांच्या समस्या

By admin | Updated: November 1, 2015 00:47 IST

येथील ग्रामायण प्रतिष्ठाणच्या सामाजिक कार्याची दखल घेवून भंडाऱ्याचे जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी विरली (बु.) येथे भेट दिली.

विरली (बु.) : येथील ग्रामायण प्रतिष्ठाणच्या सामाजिक कार्याची दखल घेवून भंडाऱ्याचे जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी विरली (बु.) येथे भेट दिली. यावेळी त्यांनी ग्रामायण प्रतिष्ठानचे अध्यक्ष उद्धव कोरे यांच्या शेताला भेट देवून सेंद्रीय शेतीचे मर्म जाणून घेतले. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांची थेट संवाद साधून शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या.येथील ग्रामायण प्रतिष्ठान ही संस्था २००४ पासून कार्यरत आहे. सेंद्रीय शेती, पारंपारिक बियाणे संवर्धन, मृदा व जलसंवर्धन मधमाशी पालनाविषयी शेतकऱ्यांमध्ये जाणीव जागृती निर्माण करून त्यांना यासाठी प्रोत्साहीत करण्याचे काम ही संस्था करीत आहे. यासोबतच रक्तदान, नेत्रदान, देहदान या चळवळी समाजात रूजविण्यासाठी कार्यरत आहे.यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी येथील प्रकाश सुखदेवे यांच्या मधमाशीपालन प्रकल्पाला भेट दिली. त्यांनी स्वत: मधमाशीपालनपेटी हाताळून मधमाशीपालनविषयी माहिती जाणून घेतली.जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीनिमित्त ग्रामायण प्रतिष्ठान आणि विरली (बु.) ग्रामपंचायतच्या संयुक्त विद्यमाने ग्रामसचिवालयाच्या सभागृहात ‘‘शाश्वत विकास संवाद’’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी धीरजकुमार तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा कृषी अधीक्षक डॉ.नलीनी भोयर, आत्माच्या प्रकल्प संचालक प्रज्ञा गोडघाटे, प्रा.बी.एस. रहेले, विरली (बु.) च्या सरपंच अर्चना महावाडे, तहसीलदार विजय पवार, उपस्थित होते.याप्रसंगी जिल्हाधिकाऱ्यांनी शेतीला पुरक व्यवसायाची जोड देवून शेती उद्योगातून आर्थिक प्रगती साधण्याचे आवाहन केले. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांनी रासायनिक खतांचा बेसुमार वापर टाळून सेंद्रीय शेतीची कास धरण्याचा सल्ला दिला आणि ग्रामायाणच्या कार्याची प्रशंसा केली. भूमेश्वर महावाडे आणि वामन बेदरे यांनी शेतमालांवर प्रक्रिय करणारे उद्योग उभारण्याची आणि शेतमाल साठवणुकीसाठी गोदामांची गरज असल्याचे प्रतिपादन केले. अनिल मेंढे यांनी रेशीम उद्योगाला चालना देण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. यावेळी जिल्हा कृषी अधीक्षक डॉ.नलीनी भोयर यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती देवून शेतकऱ्यांनी या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे संचालन सचिन बागडे यांनी तर आभार प्रदर्शन उपसरपंच लोकेश भेंडारकर यांनी केले. विरली आगमनप्रसंगी येथील रामकृष्ण मेश्राम यांच्या चमूने घोडानृत्याद्वारे त्यांचे थाटात स्वागत केले.कार्यक्रमासााठी ग्रामायण प्रतिष्ठानचे राजेश महावाडे, गजानन ठाकरे, प्रेमदास खोब्रागडे, मुकेश भेंडारकर, रामदास बेदरे, भाष्कर ब्राम्हणकर, अखिल कोरे, सेवक भेंडारकर, उमेश महावाडे, सुनिल नाकतोडे, संदीप चुटे, ग्रामसुरक्षा दलाचे सुनिल महावाडे, दिलीप शिंगाडे, राहुल भेंडारकर, स्वप्नील पागोटे, शेखर शिंगाडे, संजय बेदरे, अतुल भेंडारकर, कपील हुमने, सुनिल दुनेदार सहकार्य केले. (वार्ताहर)