शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

भंडारा-नागपूर मार्गावर ट्रॅव्हल्सचा कब्जा, तिकिटाच्या दरातही वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2022 17:01 IST

एसटी संपाचा खासगी ट्रॅवल्सना चांगलाच फायदा झाला आहे. संपकाळात भंडारा- नागपूर मार्गावर ट्रॅव्हल्सच्या संख्येत चारपटीने वाढ झाली आहे. प्रवाशांनाही नाईलाजाने खासगी वाहनातून प्रवास करावा लागताे. तिकिटाचे दरही दुप्पट करण्यात आले आहेत.

भंडारा : गत दाेन महिन्यांपासून एसटीचा संप सुरू असल्याचा फायदा खासगी प्रवासी वाहतूकदारांनी घेतला असून भंडारा-नागपूर मार्गाचा तर ट्रॅव्हल्स मालकांनी जणू कब्जाच घेतला आहे. दर अर्ध्या तासाला नागपूरसाठी ट्रॅव्हल्स सुटत असून आरटीओ कार्यालयापासून त्रिमूर्ती चाैकापर्यंत एकाचवेळी सात ते आठ ट्रॅव्हल्स उभ्या असतात. यामुळे राष्ट्रीय महामार्गावर अपघाताची भीती असते.

राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी ३० ऑक्टाेबर २०२१ पासून संप पुकारला आहे. त्यामुळे एसटी बससेवा ठप्प झाली. अलीकडे तुरळक बसफेऱ्या सुरु आहेत परंतु प्रवाशांच्या तुलनेत त्या अत्यल्प आहे. याच बाबीचा फायदा आता खासगी प्रवासी वाहतूकदारांनी घेतला आहे. संपापूर्वी एकही ट्रॅव्हल्स भंडारा- नागपूर धावताना दिसत नव्हती; परंतु आता दीड महिन्यापासून ट्रॅव्हल्सच्या संख्येत चारपटीने वाढ झाली आहे. आरटीओ कार्यालयापासून त्रिमूर्ती चाैकापर्यंत या ट्रॅव्हल्सचा ठिय्या असताे. एजंट प्रवाशांना जाेरजाेराने ओरडून बाेलावत असतात. मिनीडाेअर अथवा इतर वाहनातून प्रवासी आले की है क्या नागपूर असा आवाज देत चक्क त्यांच्याजवळील बॅगा घेऊन ट्रॅव्हल्समध्ये नेऊन ठेवतात.

नाईलाज असल्याने प्रवाशांना या खासगी वाहनातून प्रवास करावा लागताे. तिकिटाचे दरही दुप्पट करण्यात आले आहेत. दाेन सीटवर तीन जण बसवून नेले जात असून काेराेना नियमांचेही उल्लंघन केले जात आहे. कुणीही प्रवासी मास्क लावलेला दिसत नाही. एवढेच काय चालक आणि एजंटही मास्क लावलेले नसतात.

थेट ट्रॅव्हल्ससाठीही गर्दी वाढली

भंडारा येथून रायपूर, गाेंदिया, पुणे, औरंगाबाद, अमरावती येथे जाणाऱ्या प्रवाशांची संख्याही माेठी आहे. एसटीच्या संपानंतर ट्रॅव्हल्समध्ये माेठी गर्दी वाढली आहे. त्रिमूर्ती चाैकात यामुळे बुकिंग काउंटरही वाढल्याचे दिसून येत आहे. याठिकाणी प्रवासी बुकिंग करुन प्रवाशाला निघतात.

राष्ट्रीय महामार्गावर अपघाताची भीती

प्रवासी मिळविण्यासाठी दिवसभर आरटीओ कार्यालय ते त्रिमूर्ती चाैकापर्यंत ट्रॅव्हल्स धारकांचा गाेंधळ सुरु असताे. शहरातून जाणाऱ्या मार्गावर माेठी गर्दी असते. नेहमी वाहतुकीची काेंडी हाेते. आता तर या ट्रॅव्हल्स कुठेही उभ्या केल्या जात असल्याने गर्दी वाढली आहे. वाहतुकीची काेंडी हाेऊन अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.

टॅग्स :ST Strikeएसटी संपPublic Transportसार्वजनिक वाहतूकagitationआंदोलन