शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
2
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
3
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
4
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
5
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
6
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  
7
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
8
सावधान! आयफोन १७च्या नावाखाली फसवणूक, सायबर गुन्हेगार 'असे' करतात खाते रिकामी
9
Sarva Pitru Amavasya 2025: सर्वपित्री अमावस्येला आहे सूर्यग्रहण; काळजीपूर्वक टाळा 'या' चुका!
10
बंगळुरुतील योग गुरुचा 8 महिलांवर अत्याचार; अल्पवयीन पीडितेने दाखवले धाडस, पोलिसांनी आवळल्या मुसक्या
11
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
12
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
13
Surya Grahan 2025: ग्रहण सूर्याला मात्र 'या' राशींचे भाग्य येईल फळाला; १०० वर्षांनी जुळून आलाय अपूर्व योग!
14
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
15
पोहे आणि उपमा नेहमीच खातो पण त्याचे फायदे माहितीहेत का, दोघांपैकी आरोग्यासाठी बेस्ट काय?
16
पितृपक्ष २०२५ शिवरात्री: व्रतात ‘हे’ मंत्र म्हणा, महादेव प्रसन्न होतील, पूर्वज वरदान देतील!
17
Gold Silver Price 18 September: अचानक का कमी होताहेत सोन्या-चांदीचे दर; पुढेही सुरू राहणार का ही घसरण?
18
ऑनलाइन पद्धतीने मतदाराचे नाव मतदार यादीतून हटवता येते का? निवडणूक आयोग म्हणाले...
19
११ वर्षांनी लहान मुलाच्या प्रेमात पडली २८ वर्षांची तरुणी; लग्नाला नकार मिळाल्यावर मागू लागली ५० लाख!
20
Navi Mumbai: 'कपडे काढ नाहीतर तुझ्या भावालाच संपवेन'; 12 वर्षाच्या मुलीवर घरी नेऊन केला बलात्कार, नवी मुंबईतील घटना

आरोग्याला प्राधान्य द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2020 05:01 IST

शेतकऱ्यांना खते व बियाणे वेळेत मिळणे आवश्यक असल्याचे सांगून पालकमंत्री म्हणाले, खतासाठी कृषी सेवा केंद्र शेतकºयांची अडवणूक करीत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यावर कठोर कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. घरकुल, रस्ते, खते, बियाणे, पाणी पुरवठा योजना व आरोग्य आदी विषयाचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. पीक कर्ज व कर्जमुक्तीबाबतही त्यांनी यावेळी माहिती घेतली.

ठळक मुद्देविश्वजीत कदम : मोहाडी, तुमसर, साकोली, लाखनी व भंडारात आढावा

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : कोरोना आजाराचा संसर्ग वाढत असून नागरिकांना आरोग्य सुविधा तातडीने उपलब्ध होणे आवश्यक आहे. नागरिकांच्या मनातील कोरोनाची भीती घालवणे गरजेचे आहे. सुरक्षित अंतर ठेवणे व काळजी घेणे यामुळे आपण कोरोनावर नक्की मात करू, असा विश्वास देतानांच नागरिकांच्या आरोग्याला सर्वोच्च प्रधान्य द्या, अशा सूचना पालकमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी प्रशासन व यंत्रणेला दिल्या.मोहाडी, तुमसर, साकोली, लाखनी व भंडारा येथील कोरोनाचा पालकमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी शुक्रवारला आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी एम. जे. प्रदीपचंद्रन, उपविभागीय अधिकारी नितीन सदगीर, जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल बनसोड, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी हिंदुराव चव्हाण, मोहाडीचे तहसीलदार डी. सी. बोंबर्डे, तुमसरचे तहसीलदार गजेंद्र बालपांडे, साकोलीचे तहसीलदार बाळासाहेब टेळे, लाखांदूरचे तहसीलदार संतोष महल्ले, लाखनी तहसीलदार मलिक विराणी, आरोग्य अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.या दौऱ्यात पालकमंत्र्यांनी कोरोना व आरोग्याचा आढावा घेतला. नागरिकांच्या आरोग्याला प्राधान्य असून कोरोनापासून मुक्ती हे ध्येय यंत्रणांनी ठेवावे असे ते म्हणाले. मृत्यू संख्या कमी ठेवण्याला प्राधान्य द्या. नागरिकांचे जीव महत्वाचे असून आरोग्य यंत्रणेने विनाविलंब आरोग्यसेवा पुरविण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.शेतकऱ्यांना खते व बियाणे वेळेत मिळणे आवश्यक असल्याचे सांगून पालकमंत्री म्हणाले, खतासाठी कृषी सेवा केंद्र शेतकºयांची अडवणूक करीत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यावर कठोर कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.घरकुल, रस्ते, खते, बियाणे, पाणी पुरवठा योजना व आरोग्य आदी विषयाचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. पीक कर्ज व कर्जमुक्तीबाबतही त्यांनी यावेळी माहिती घेतली.तुमसर येथील नेहरू विद्यालयात असलेल्या कोविड केअर सेंटरला पालकमंत्र्यांनी भेट देऊन पाहणी केली. या दौºयात पालकमंत्र्यांनी नगरपरिषद पदाधिकारी व नगरसेवक यांच्याशी चर्चा केली. नगरपरिषदचे विविध प्रश्न व समस्यांबाबत पालकमंत्र्यांनी माहिती घेतली. पाणी पुरवठा, स्वच्छता, घरकुल, रस्ते व कोविड आदी बाबत पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्र्यांना अवगत केले.साकोली तालुक्यात गावस्तरीय समित्या स्थापन करून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आराखडा तयार करण्यात आला. काही गावांनी अतिशय उत्कृष्ट काम केल्याचे सांगण्यात आले. यावर बोलतांना पालकमंत्री म्हणाले, ज्या ग्रामपंचायतनी उत्कृष्ट काम केले त्यांचे पत्र लिहून अभिनंदन करा.लाखनी तालुक्याचा आढावा तहसीलदारांनी सादर केला. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासोबतच जनजीवन सुरळीत होईल याकडे सुद्धा लक्ष देण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. सध्या शेतीचा हंगाम असून पीक कर्ज व बी-बियाणे वाटपात कुठलीही अडचण येता काम नये असे निर्देश पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिले.पालकमंत्र्यांकडून कारेमोरे कुटुंबाचे सांत्वनआमदार राजू कारेमोरे यांचे भाऊ रामेश्वर माणिकराव कारेमोरे यांचा अपघाती मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबियांची पालकमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी एकलारी (वरठी) येथे त्यांच्या राहत्या घरी सांत्वनपर भेट घेतली. यावेळी आमदार राजू कारेमोरे, वडील माणिकराव कारेमोरे व कारेमोरे कुटुंबातील सदस्य, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहन पंचभाई, जिया पटेल उपस्थित होते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य