शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: भगूर नगरपरिषदेत शिवसेनेची २५ वर्षांची सत्ता अजितदादांच्या राष्ट्रवादीने उलथवली; पहा लेटेस्ट अपडेट
2
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
3
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
4
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
5
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
6
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
7
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
8
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
9
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
10
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
11
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
12
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
13
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
14
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
15
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
16
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
17
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
18
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
19
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
20
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
Daily Top 2Weekly Top 5

निर्यात बंदीमुळे धानाचे भाव गडगडले; शेतकरी संकटात

By admin | Updated: December 11, 2014 23:02 IST

मागील हंगामात पूर्व विदर्भात धानाचे चांगले उत्पादन झाले. तरी भाव १,७०० ते २,२०० रुपये पर्यंत होता. यावर्षी भंडारा गोंदिया जिल्ह्यात धानाचे अल्प उत्पादन झाले तरी धानाचे भाव गडगडले.

कोंढा कोसरा : मागील हंगामात पूर्व विदर्भात धानाचे चांगले उत्पादन झाले. तरी भाव १,७०० ते २,२०० रुपये पर्यंत होता. यावर्षी भंडारा गोंदिया जिल्ह्यात धानाचे अल्प उत्पादन झाले तरी धानाचे भाव गडगडले. यातच केंद्र शासनाने धानाची निर्यात बंदी केली. यामुळे सध्या तरी धान उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. महाराष्ट्रात पूर्व विदर्भ म्हणून भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर म्हणून हे जिल्हे धान उत्पादनासाठी प्रसिद्ध आहेत. शेतकरी वरच्या पाण्यावर तसेच काही प्रमाणात सिंचनाच्या सोयीने धानाचे उत्पादन घेतात. मागील वर्षी चांगले धानाचे उत्पादन असताना १,७०० ते २,२०० रुपये प्रति क्विंटल धान विकले. त्यामुळे सहाजीकच तांदूळ एचएमटी ३,५०० तसेच जय श्रीराम ४,२०० रुपये प्रति क्विंटल तांदूळ अनेकांनी विकले.यावर्षी पूर्व विदर्भात अनेक जिल्ह्यात दुष्काळ पडला आहे. पावसाअभावी धानाचे उत्पादन घटले आहे. थोडीबहुत सिंचन, तलाव, कालवे याची सुविधा असलेल्या भागात धानाचे उत्पादन झाले. यासाठी शेतकऱ्यांना हेक्टरी ४० ते ५० हजार रुपये खर्च आला. बि बियाणे, औषधी, खताच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. तसेच मजुरी खर्च देखील वाढला. अशावेळी धानाच्या शेतीतून हेक्टरी १ लाख रुपयाचे धान अपेक्षित असताना धानाचे भाव गडगडल्याने धान उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. केंद्र सरकारने तांदळावर निर्यात बंदी आणल्याने धानाचे भाव पडले. सध्या पवनी तालुक्यात एचएमटी १७०० ते १८०० रुपये तर जय श्रीराम १८०० ते २००० रुपये प्रति क्विंटल भावाने व्यापारी घेण्यास धजावत नाही. यामुळे शेतकऱ्यांनी धान न विकता घरी, गिरणीमध्ये साठवून ठेवण्याचा निर्णय घेतला असे दिसते आहे. सध्या धानाचे भाव नसल्याने कोणीही धान भरडाई करण्याची हिंमत करीत नाही, असे एका गिरणीमालकाने सांगितले. धान उत्पादक शेतकऱ्यांची अशी थट्टा यापूर्वी पहावयास मिळाली नाही.ऊस उत्पादकासाठी केंद्र, राज्य सरकार दरवर्षी भाव वाढ करते. तसेच काही कारणाने ऊस कारखान्यापर्यंत पोहचले नाही. तर हेक्टरी २५ ते ३० हजार रुपये मदत जाहीर करते. पण धान उत्पादकाची व्यथा कोणी ऐकून घेण्यास तयार नाही. सध्या तर पूर्व विदर्भातील शेतकरी संकटात आहे. याचा वाली कोणीच नाही, अशी व्यथा शेतकरी सांगतात. (वार्ताहर)