शहरं
Join us  
Trending Stories
1
Red Fort Blast Video: अनेकांच्या उडाल्या चिंधड्या! स्फोटानंतरची दृश्ये बघून होईल थरकाप, नेमकी कुठे घडली घटना?
2
Video: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
कुणाचा हात तुटून पडला, कुणाचा कोथळा बाहेर आला; प्रत्यक्षदर्शीने सांगितली दिल्ली स्फोटाची हादरवून टाकणारी घटना
4
'त्या' जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार, शीतल तेजवानींना पोलिसांकडून क्लीन चिट
5
भयानक कोसळणार ...! मी १९७१ पासून सोने खरेदी करतोय, पण...; रॉबर्ट कियोसाकी यांच्या दाव्याने खळबळ 
6
दहशतवाद्यांच्या टोळीत महिला डॉक्टरही सामील, थेट पाकिस्तानशी कनेक्शन; कारमध्ये घेऊन फिरत होती एके ४७!
7
जडेजाला संघाबाहेर काढण्यात धोनी सगळ्यात पुढे असेल! माजी क्रिकेटरनं त्यामागचं कारणही सांगून टाकलं
8
भारताच्या शेजारी देशांत भरतो 'नवरीचा बाजार', खरेदी करण्यासाठी चीनमधून येतात लोक! काय आहे प्रकार?
9
राष्ट्रवादीने हटवले तरी रुपाली ठोंबरे पाटील 'प्रवक्त्या'च; पोस्ट करत म्हणाल्या, 'अजित पवारांना भेटून...'
10
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
11
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...
12
"मी तुझ्या बापाला मारलं, मृतदेह सुटकेसमध्ये..."; बायकोने नवऱ्याला संपवलं, लेकीला केला फोन
13
Honeymoon Destinations : गुलाबी थंडीत रोमँटिक हनिमून प्लॅन करताय? भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट!
14
"पंक्चर बनवणारे येऊन...!", बिहारमध्ये योगी आदित्यनाथांची तुफान बॅटिंग; विरोधकांवर थेट हल्लाबोल
15
"जबरदस्तीनं मिठीत घ्यायचा, शारीरिक जवळीक साधायचा, अन्..."; महिला क्रिकेटरच्या आरोपांनी खळबळ
16
धर्मेंद्र यांच्या तब्येतीबद्दल कळताच हेमा मालिनी रुग्णालयात पोहोचल्या, म्हणाल्या, "आम्ही सगळेच..."
17
मुंबईत काँग्रेस स्वबळावर लढणार तर उद्धव ठाकरेंसोबत युतीआधीच मनसेने 'इतक्या' जागांची केली तयारी
18
'या' मुस्लिम देशाची अमेरिकेशी वाढतेय जवळीक! ब्लॅकलिस्टमधून बाहेर पडताच, ८० वर्षांनी अमेरिकेत एन्ट्री
19
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना बंद होणार? एकनाथ शिंदेंकडून मोठी घोषणा, e-KYC देखील...
20
धक्कादायक! बाथरूममध्ये आंघोळीसाठी गेली, पण तासभर बाहेरच नाही आली; दरवाजा तोडला तर...

अवकाळी पावसाचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2020 05:00 IST

लाखनी शहरासह तालुक्यातही ठिकठिकाणी पाऊस बरसला. पालांदूरात सकाळी रिमझिम पावसाने हजेरी लावली. बदलत्या वातावरणामुळे आजारालाही खतपाणी मिळत आहे. सर्दी, पडसे, खोकला, ताप या आजाराचे रुग्ण वाढले आहेत. मोहाडी तालुक्यातील लोहारा (जांब), सोरणा परिसरात रिमझिम पाऊस बरसला. नाकाडोंगरी येथे ढगाळ वातावरण असतानाच पावसाच्या हलक्या सरी बरसल्या.

ठळक मुद्देगारठा वाढला : भंडारा शहरासह तुमसर, लाखनी, मोहाडीत पाऊस

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : अस्मानी संकटाने बळीराजाला चांगलेच पछाडले आहे. गत दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असतानाच सोमवारी सकाळी जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. यात रबी पिकांचे नुकसान झाले आहे. भाजीपाला पिकांवरही संक्रांत आल्याने कीड व रोगाचा प्रादूर्भाव वाढण्याची चिन्हे निर्माण झाली आहे.भंडारा शहरात सकाळी ९ वाजताच्या सुमारास पाऊस बरसला. ढगाळ वातावरणामुळे पारा घसरला असतानाच पावसामुळे अधिकच गारवा निर्माण झाला. बंद झालेल्या शेकोट्या पुन्हा ठिकठिकाणी पेटलेल्या दिसल्या. या अवकाळी पावसाने रबी पिकाचे नुकसान झाल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे वैनगंगा नदीच्या तिरावरील गावांमध्ये भाजीपाल्याचे उत्पादन घेतले जाते. अवकाळी पावसामुळे भाजीपाला पिकांनाही फटका बसल्याची प्राथमिक माहिती आहे.लाखनी शहरासह तालुक्यातही ठिकठिकाणी पाऊस बरसला. पालांदूरात सकाळी रिमझिम पावसाने हजेरी लावली. बदलत्या वातावरणामुळे आजारालाही खतपाणी मिळत आहे. सर्दी, पडसे, खोकला, ताप या आजाराचे रुग्ण वाढले आहेत. मोहाडी तालुक्यातील लोहारा (जांब), सोरणा परिसरात रिमझिम पाऊस बरसला. नाकाडोंगरी येथे ढगाळ वातावरण असतानाच पावसाच्या हलक्या सरी बरसल्या.तुमसर येथे शहरासह तालुक्यात सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास अवकाळी पाऊस बरसला. जवळपास एक तास पर्यंत पाऊस बरसल्याने वातावरणात चांगलाचा गारवा निर्माण झाला. थंडीचा जोर वाढल्याने ठिकठिकाणी नागरिक शेकोटीचा आधारा घेत असल्याचे दिसून आले. रबी पिकांचे नुकसान झाले असून पुन्हा पाऊस बरसल्यास हातचे पीक जाणार की काय, अशी शक्यता व चिंताही बळीराजाने व्यक्त केली आहे. अचानक आलेल्या पावसामुळे अनेकांना ओलेचिंब व्हावे लागले. विद्यार्थ्यांची मोठी तारांबळ उडाली. पावसाचा सर्वात जास्त फटका नोकरदार व विद्यार्थ्यांना बसला. वातावरणात गारवा निर्माण झाल्याने काही दिवस थंडीचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे.वारंवार पावसाने शेतकरी धास्तावलाजिल्ह्यात गत दिवाळीपासून वारंवार अवकाळी पावसाचा फटका बसत आहे. सर्वाधिक नुकसान धान उत्पादक शेतकऱ्यांचे होत आहे. आधारभूत धान खरेदी केंद्रावर उघड्यावर असलेला धान ओला होवून अंकूर फुटले होते. शेकडो शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. आता पुन्हा अवकाळी पाऊस बरसत आहे. या पावसाचा फटका रबी पिकांना बसत आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पालेभाज्यांची लागवड करण्यात आली आहे. पावसामुळे पालेभाज्यांचे मोठे नुकसान होत आहे. वारंवार कोसळणाºया अवकाळी पावसाची धास्ती जिल्ह्यातील शेतकºयांनी घेतली असून प्रशासन मात्र नुकसानभरपाईसाठी पुढाकार घेत नाही.

टॅग्स :Rainपाऊस