शहरं
Join us  
Trending Stories
1
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
2
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
3
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
4
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
5
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
6
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
7
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
8
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
9
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी
10
Donald Trump Tariff News : अमेरिकाच टॅरिफबाबत गंडली! ट्रम्प यांची भारताबद्दल कडक भूमिका, पण परराष्ट्र मंत्रालय करतंय कौतुक
11
२ तासांचा हायव्हॉल्टेज ड्रामा, गर्लफ्रेंडच्या मिठीत सापडला नेता; पत्नीला पाहून पती पळाला, पण...
12
आकाश 'वाणी'! वैभव सूर्यवंशीमुळे स्टार विकेट किपर बॅटर संजूवर आलीये संघ सोडण्याची वेळ!
13
भारतीयांसाठी कॅनडा ठरतोय मृत्युचं घर; गेल्या ५ वर्षातील आकडे चिंताजनक!
14
प्राजक्ता माळीने वाढदिवशी घेतलं भीमाशंकरचं दर्शन; म्हणाली, "१२ ज्योतिर्लिंग यात्रा पूर्ण..."
15
चालत्या बसवर झाड कोसळलं, ५ जणांचा मृत्यू; महिला म्हणते, "आयुष्याचा प्रश्न, तुम्ही Video बनवताय"
16
BCCI: बीसीसीआय नव्या प्रशिक्षकाच्या शोधात, अर्जही मागवले! जाणून घ्या पात्रता
17
धनंजय मुंडेंनी मंत्रिपद स्वप्नातही पाहू नये, पुन्हा घेतले तर अजितदादांचा पक्ष संपेल: जरांगे
18
Video: हृदयस्पर्शी! हत्तीच्या पिंजऱ्यात पडला चिमुकला; गजराजाने जे केले त्यानं सर्वांचीच मने जिंकली
19
काय आहे युनिव्हर्सल बँकिंग? ११ वर्षांत पहिल्यांदाच RBI नं कोणत्या बँकेला दिला असा लायसन्स
20
Donald Trump Tariff News : ज्याची भीती होती तेच घडले! वॉलमार्ट अन् अमेझॉनसह अनेक कंपन्यांनी भारतातील ऑर्डर्स रोखून ठेवल्या

अवकाळी पावसाचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2020 05:00 IST

लाखनी शहरासह तालुक्यातही ठिकठिकाणी पाऊस बरसला. पालांदूरात सकाळी रिमझिम पावसाने हजेरी लावली. बदलत्या वातावरणामुळे आजारालाही खतपाणी मिळत आहे. सर्दी, पडसे, खोकला, ताप या आजाराचे रुग्ण वाढले आहेत. मोहाडी तालुक्यातील लोहारा (जांब), सोरणा परिसरात रिमझिम पाऊस बरसला. नाकाडोंगरी येथे ढगाळ वातावरण असतानाच पावसाच्या हलक्या सरी बरसल्या.

ठळक मुद्देगारठा वाढला : भंडारा शहरासह तुमसर, लाखनी, मोहाडीत पाऊस

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : अस्मानी संकटाने बळीराजाला चांगलेच पछाडले आहे. गत दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असतानाच सोमवारी सकाळी जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. यात रबी पिकांचे नुकसान झाले आहे. भाजीपाला पिकांवरही संक्रांत आल्याने कीड व रोगाचा प्रादूर्भाव वाढण्याची चिन्हे निर्माण झाली आहे.भंडारा शहरात सकाळी ९ वाजताच्या सुमारास पाऊस बरसला. ढगाळ वातावरणामुळे पारा घसरला असतानाच पावसामुळे अधिकच गारवा निर्माण झाला. बंद झालेल्या शेकोट्या पुन्हा ठिकठिकाणी पेटलेल्या दिसल्या. या अवकाळी पावसाने रबी पिकाचे नुकसान झाल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे वैनगंगा नदीच्या तिरावरील गावांमध्ये भाजीपाल्याचे उत्पादन घेतले जाते. अवकाळी पावसामुळे भाजीपाला पिकांनाही फटका बसल्याची प्राथमिक माहिती आहे.लाखनी शहरासह तालुक्यातही ठिकठिकाणी पाऊस बरसला. पालांदूरात सकाळी रिमझिम पावसाने हजेरी लावली. बदलत्या वातावरणामुळे आजारालाही खतपाणी मिळत आहे. सर्दी, पडसे, खोकला, ताप या आजाराचे रुग्ण वाढले आहेत. मोहाडी तालुक्यातील लोहारा (जांब), सोरणा परिसरात रिमझिम पाऊस बरसला. नाकाडोंगरी येथे ढगाळ वातावरण असतानाच पावसाच्या हलक्या सरी बरसल्या.तुमसर येथे शहरासह तालुक्यात सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास अवकाळी पाऊस बरसला. जवळपास एक तास पर्यंत पाऊस बरसल्याने वातावरणात चांगलाचा गारवा निर्माण झाला. थंडीचा जोर वाढल्याने ठिकठिकाणी नागरिक शेकोटीचा आधारा घेत असल्याचे दिसून आले. रबी पिकांचे नुकसान झाले असून पुन्हा पाऊस बरसल्यास हातचे पीक जाणार की काय, अशी शक्यता व चिंताही बळीराजाने व्यक्त केली आहे. अचानक आलेल्या पावसामुळे अनेकांना ओलेचिंब व्हावे लागले. विद्यार्थ्यांची मोठी तारांबळ उडाली. पावसाचा सर्वात जास्त फटका नोकरदार व विद्यार्थ्यांना बसला. वातावरणात गारवा निर्माण झाल्याने काही दिवस थंडीचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे.वारंवार पावसाने शेतकरी धास्तावलाजिल्ह्यात गत दिवाळीपासून वारंवार अवकाळी पावसाचा फटका बसत आहे. सर्वाधिक नुकसान धान उत्पादक शेतकऱ्यांचे होत आहे. आधारभूत धान खरेदी केंद्रावर उघड्यावर असलेला धान ओला होवून अंकूर फुटले होते. शेकडो शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. आता पुन्हा अवकाळी पाऊस बरसत आहे. या पावसाचा फटका रबी पिकांना बसत आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पालेभाज्यांची लागवड करण्यात आली आहे. पावसामुळे पालेभाज्यांचे मोठे नुकसान होत आहे. वारंवार कोसळणाºया अवकाळी पावसाची धास्ती जिल्ह्यातील शेतकºयांनी घेतली असून प्रशासन मात्र नुकसानभरपाईसाठी पुढाकार घेत नाही.

टॅग्स :Rainपाऊस