शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
5
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
6
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
7
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
8
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
9
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
10
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
11
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
12
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
13
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
14
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
15
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
16
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
17
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
18
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
19
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
20
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात

उन्हाळी धानाला हवेय सिंचनाचे बळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2019 21:33 IST

उष्णतेची दाहकता वाढत असताना पाण्याचे पातळीत घट होण्यास सुरूवात झाली आहे. कृषीपंप धारकांना वीज पुरवठा करताना वेळेत वाढ करण्यात आली नाही. यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी आचार संहितेतही सिहोरा स्थित असणाºया वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाला घेराव करण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांमध्ये संताप : गावात बैठकांचे सत्र सुरू, सिंचन सुविधा अपूर्ण, जलस्रोतही आटले, नियमित वीज पुरवठ्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कचुल्हाड (सिहोरा) : उष्णतेची दाहकता वाढत असताना पाण्याचे पातळीत घट होण्यास सुरूवात झाली आहे. कृषीपंप धारकांना वीज पुरवठा करताना वेळेत वाढ करण्यात आली नाही. यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी आचार संहितेतही सिहोरा स्थित असणाºया वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाला घेराव करण्याचा निर्णय घेतला आहे.सिहोरा परिसरातील गावे वैनगंगा, बावनथडी नद्याचे खोऱ्यात आहेत. याच परिसरात चांदपूर जलाशय आहे. परंतु नियोजन शुन्यतेमुळे बारमाही सिंचनाची सोय या परिसरात नाही. कवलेवाडा धरणात वैनगंगा नदी पात्रात अडविण्यात आलेल्या पाण्याचा उपयोग गोंदिया जिल्ह्यातील प्रकल्प आणि शेतकऱ्यांना होत आहे. या पाण्यावर सिहोरा परिसरातील ३४ हजार शेतकरी आणि त्यांचे कुटुंबियांचा तितकाच अधिकार असताना त्यांना मात्र भोपळा दिला जात आहे.या परिसरात असणाºया १४ हजार हेक्टर आर शेती बारमाही सिंचनाखाली आणण्याची क्षमता पाण्याचे स्त्रोतात आहे. परंतु शेतकºयांना सुजलाम सुफलाम करण्याची मानसिकता यंत्रणेची नाही. कवलेवाडा धरणातून पाण्याचा उपसा करण्यासाठी गोंदिया जिल्ह्यात बेधडक नवे प्रकल्प उभारले जात आहे. तुमसर आणि तिरोडा शहराला नळ योजना याच धरणात उभ्या केल्या जात आहेत. परंतु याच धर्तीवर चांदपूर जलाशयात पाण्याचा उपसा करण्यासाठी नळ योजना अथवा प्रकल्प मंजुर केल्या जात नाही. दरम्यान सिंचनाची सोय नसताना उन्हाळी धान पिकांचे लागवड करिता शेतकरी धावपड करित आहे.मार्च महिन्याचे प्रथम आठवड्यापर्यंत रोवणी आटोपली आहे. उन्हाळी धान पिकांना पाण्याची अधिक गरज असल्याने विज पुरवठा १६ तास करण्याची ओरड शेतकरी करीत आहे. नद्याचे खोरे असल्याने पाण्याची ओरड शेतकरी करीत आहे. नद्याचे खोरे असल्याने पाण्याची मुबलक साठा आहे. परंतु आठ तास वीज पुरवठा असताना पाण्याचा उपसा करताना अडचणीचे ठरत आहे. यामुळे तासाभरात शेतीत असणारे पाणी आटत आहे.महावितरण कंपनी मार्फत शेतकऱ्यांना तीन महिने वीज पुरवठ्याचे वेळेत वाढ करण्यासाठी सिहोरा स्थित असणाºया वीज वितरण कंपनीचे कार्यालयाला घेराव करण्याचा निर्णय घेतला आहे. लोकसभा निवडणुकीची आचार संहिता असताना त्यांची भिती संतापाचे उदे्रकांत नाही. गावा गावात शेतकरी बैठकीचे आयोजन करित आहेत. परंतु शासन, प्रशासन बेखबर आहे. पंचायत समितीचे माजी सभापती कलाम शेख यांचे नेतृत्वात अशा बैठकीचे आयोजन करण्यता येत आहे.आचार संहितेतही घेराव आंदोलनात टोकांची भूमिका घेतली जाणार आहे. ९० दिवस धान पिकाचे संवर्धन करिता महत्त्वाचे असताना महावितरणच्या कार्यालयाला घेराव करण्याचे निश्चित झाले आहे. घेराव आंदोलन कोणत्याही लोकप्रतिनिधी याचे विरोधात नसून गैर राजकीय ठेवण्यात आले आहे. वेळ निघून गेल्यावर धान पिकांना वाचविता येणार नाही. यामुळे आठ दिवसात निर्णय घेतले पाहिजे, असा सूर आहे.धान पिकांवर खोडकिड्यांचा प्रकोपउन्हाळी धान पिकाची लागवड करताच खोडकिड्यांने डोके वर काढण्यास सुरूवात केली आहे. यामुळे औषधीची फवारणी सुरूवाती पासून करण्यात येत असल्याने उत्पादन खर्चात वाढ होणार आहे. महागडी औषध आणि तज्ज्ञांचा सल्ला घेतला असताना खोडकिडा आटोक्यात येत नसल्याची माहिती शेतकºयांनी दिली.