शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाळी धानाला हवेय सिंचनाचे बळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2019 21:33 IST

उष्णतेची दाहकता वाढत असताना पाण्याचे पातळीत घट होण्यास सुरूवात झाली आहे. कृषीपंप धारकांना वीज पुरवठा करताना वेळेत वाढ करण्यात आली नाही. यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी आचार संहितेतही सिहोरा स्थित असणाºया वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाला घेराव करण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांमध्ये संताप : गावात बैठकांचे सत्र सुरू, सिंचन सुविधा अपूर्ण, जलस्रोतही आटले, नियमित वीज पुरवठ्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कचुल्हाड (सिहोरा) : उष्णतेची दाहकता वाढत असताना पाण्याचे पातळीत घट होण्यास सुरूवात झाली आहे. कृषीपंप धारकांना वीज पुरवठा करताना वेळेत वाढ करण्यात आली नाही. यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी आचार संहितेतही सिहोरा स्थित असणाºया वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाला घेराव करण्याचा निर्णय घेतला आहे.सिहोरा परिसरातील गावे वैनगंगा, बावनथडी नद्याचे खोऱ्यात आहेत. याच परिसरात चांदपूर जलाशय आहे. परंतु नियोजन शुन्यतेमुळे बारमाही सिंचनाची सोय या परिसरात नाही. कवलेवाडा धरणात वैनगंगा नदी पात्रात अडविण्यात आलेल्या पाण्याचा उपयोग गोंदिया जिल्ह्यातील प्रकल्प आणि शेतकऱ्यांना होत आहे. या पाण्यावर सिहोरा परिसरातील ३४ हजार शेतकरी आणि त्यांचे कुटुंबियांचा तितकाच अधिकार असताना त्यांना मात्र भोपळा दिला जात आहे.या परिसरात असणाºया १४ हजार हेक्टर आर शेती बारमाही सिंचनाखाली आणण्याची क्षमता पाण्याचे स्त्रोतात आहे. परंतु शेतकºयांना सुजलाम सुफलाम करण्याची मानसिकता यंत्रणेची नाही. कवलेवाडा धरणातून पाण्याचा उपसा करण्यासाठी गोंदिया जिल्ह्यात बेधडक नवे प्रकल्प उभारले जात आहे. तुमसर आणि तिरोडा शहराला नळ योजना याच धरणात उभ्या केल्या जात आहेत. परंतु याच धर्तीवर चांदपूर जलाशयात पाण्याचा उपसा करण्यासाठी नळ योजना अथवा प्रकल्प मंजुर केल्या जात नाही. दरम्यान सिंचनाची सोय नसताना उन्हाळी धान पिकांचे लागवड करिता शेतकरी धावपड करित आहे.मार्च महिन्याचे प्रथम आठवड्यापर्यंत रोवणी आटोपली आहे. उन्हाळी धान पिकांना पाण्याची अधिक गरज असल्याने विज पुरवठा १६ तास करण्याची ओरड शेतकरी करीत आहे. नद्याचे खोरे असल्याने पाण्याची ओरड शेतकरी करीत आहे. नद्याचे खोरे असल्याने पाण्याची मुबलक साठा आहे. परंतु आठ तास वीज पुरवठा असताना पाण्याचा उपसा करताना अडचणीचे ठरत आहे. यामुळे तासाभरात शेतीत असणारे पाणी आटत आहे.महावितरण कंपनी मार्फत शेतकऱ्यांना तीन महिने वीज पुरवठ्याचे वेळेत वाढ करण्यासाठी सिहोरा स्थित असणाºया वीज वितरण कंपनीचे कार्यालयाला घेराव करण्याचा निर्णय घेतला आहे. लोकसभा निवडणुकीची आचार संहिता असताना त्यांची भिती संतापाचे उदे्रकांत नाही. गावा गावात शेतकरी बैठकीचे आयोजन करित आहेत. परंतु शासन, प्रशासन बेखबर आहे. पंचायत समितीचे माजी सभापती कलाम शेख यांचे नेतृत्वात अशा बैठकीचे आयोजन करण्यता येत आहे.आचार संहितेतही घेराव आंदोलनात टोकांची भूमिका घेतली जाणार आहे. ९० दिवस धान पिकाचे संवर्धन करिता महत्त्वाचे असताना महावितरणच्या कार्यालयाला घेराव करण्याचे निश्चित झाले आहे. घेराव आंदोलन कोणत्याही लोकप्रतिनिधी याचे विरोधात नसून गैर राजकीय ठेवण्यात आले आहे. वेळ निघून गेल्यावर धान पिकांना वाचविता येणार नाही. यामुळे आठ दिवसात निर्णय घेतले पाहिजे, असा सूर आहे.धान पिकांवर खोडकिड्यांचा प्रकोपउन्हाळी धान पिकाची लागवड करताच खोडकिड्यांने डोके वर काढण्यास सुरूवात केली आहे. यामुळे औषधीची फवारणी सुरूवाती पासून करण्यात येत असल्याने उत्पादन खर्चात वाढ होणार आहे. महागडी औषध आणि तज्ज्ञांचा सल्ला घेतला असताना खोडकिडा आटोक्यात येत नसल्याची माहिती शेतकºयांनी दिली.