शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
3
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
4
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
5
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
6
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
7
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
8
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
9
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
10
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
11
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
12
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
13
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
14
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
15
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
16
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
17
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
18
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
19
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
20
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना

उन्हाळी धानाला हवेय सिंचनाचे बळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2019 21:33 IST

उष्णतेची दाहकता वाढत असताना पाण्याचे पातळीत घट होण्यास सुरूवात झाली आहे. कृषीपंप धारकांना वीज पुरवठा करताना वेळेत वाढ करण्यात आली नाही. यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी आचार संहितेतही सिहोरा स्थित असणाºया वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाला घेराव करण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांमध्ये संताप : गावात बैठकांचे सत्र सुरू, सिंचन सुविधा अपूर्ण, जलस्रोतही आटले, नियमित वीज पुरवठ्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कचुल्हाड (सिहोरा) : उष्णतेची दाहकता वाढत असताना पाण्याचे पातळीत घट होण्यास सुरूवात झाली आहे. कृषीपंप धारकांना वीज पुरवठा करताना वेळेत वाढ करण्यात आली नाही. यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी आचार संहितेतही सिहोरा स्थित असणाºया वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाला घेराव करण्याचा निर्णय घेतला आहे.सिहोरा परिसरातील गावे वैनगंगा, बावनथडी नद्याचे खोऱ्यात आहेत. याच परिसरात चांदपूर जलाशय आहे. परंतु नियोजन शुन्यतेमुळे बारमाही सिंचनाची सोय या परिसरात नाही. कवलेवाडा धरणात वैनगंगा नदी पात्रात अडविण्यात आलेल्या पाण्याचा उपयोग गोंदिया जिल्ह्यातील प्रकल्प आणि शेतकऱ्यांना होत आहे. या पाण्यावर सिहोरा परिसरातील ३४ हजार शेतकरी आणि त्यांचे कुटुंबियांचा तितकाच अधिकार असताना त्यांना मात्र भोपळा दिला जात आहे.या परिसरात असणाºया १४ हजार हेक्टर आर शेती बारमाही सिंचनाखाली आणण्याची क्षमता पाण्याचे स्त्रोतात आहे. परंतु शेतकºयांना सुजलाम सुफलाम करण्याची मानसिकता यंत्रणेची नाही. कवलेवाडा धरणातून पाण्याचा उपसा करण्यासाठी गोंदिया जिल्ह्यात बेधडक नवे प्रकल्प उभारले जात आहे. तुमसर आणि तिरोडा शहराला नळ योजना याच धरणात उभ्या केल्या जात आहेत. परंतु याच धर्तीवर चांदपूर जलाशयात पाण्याचा उपसा करण्यासाठी नळ योजना अथवा प्रकल्प मंजुर केल्या जात नाही. दरम्यान सिंचनाची सोय नसताना उन्हाळी धान पिकांचे लागवड करिता शेतकरी धावपड करित आहे.मार्च महिन्याचे प्रथम आठवड्यापर्यंत रोवणी आटोपली आहे. उन्हाळी धान पिकांना पाण्याची अधिक गरज असल्याने विज पुरवठा १६ तास करण्याची ओरड शेतकरी करीत आहे. नद्याचे खोरे असल्याने पाण्याची ओरड शेतकरी करीत आहे. नद्याचे खोरे असल्याने पाण्याची मुबलक साठा आहे. परंतु आठ तास वीज पुरवठा असताना पाण्याचा उपसा करताना अडचणीचे ठरत आहे. यामुळे तासाभरात शेतीत असणारे पाणी आटत आहे.महावितरण कंपनी मार्फत शेतकऱ्यांना तीन महिने वीज पुरवठ्याचे वेळेत वाढ करण्यासाठी सिहोरा स्थित असणाºया वीज वितरण कंपनीचे कार्यालयाला घेराव करण्याचा निर्णय घेतला आहे. लोकसभा निवडणुकीची आचार संहिता असताना त्यांची भिती संतापाचे उदे्रकांत नाही. गावा गावात शेतकरी बैठकीचे आयोजन करित आहेत. परंतु शासन, प्रशासन बेखबर आहे. पंचायत समितीचे माजी सभापती कलाम शेख यांचे नेतृत्वात अशा बैठकीचे आयोजन करण्यता येत आहे.आचार संहितेतही घेराव आंदोलनात टोकांची भूमिका घेतली जाणार आहे. ९० दिवस धान पिकाचे संवर्धन करिता महत्त्वाचे असताना महावितरणच्या कार्यालयाला घेराव करण्याचे निश्चित झाले आहे. घेराव आंदोलन कोणत्याही लोकप्रतिनिधी याचे विरोधात नसून गैर राजकीय ठेवण्यात आले आहे. वेळ निघून गेल्यावर धान पिकांना वाचविता येणार नाही. यामुळे आठ दिवसात निर्णय घेतले पाहिजे, असा सूर आहे.धान पिकांवर खोडकिड्यांचा प्रकोपउन्हाळी धान पिकाची लागवड करताच खोडकिड्यांने डोके वर काढण्यास सुरूवात केली आहे. यामुळे औषधीची फवारणी सुरूवाती पासून करण्यात येत असल्याने उत्पादन खर्चात वाढ होणार आहे. महागडी औषध आणि तज्ज्ञांचा सल्ला घेतला असताना खोडकिडा आटोक्यात येत नसल्याची माहिती शेतकºयांनी दिली.