शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

तलावाच्या जिल्ह्यात १३४ गावांत मार्चमध्ये डोक्यावर हंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 05:06 IST

भंडारा : तलावांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या भंडारातही पाणीटंचाईची समस्या वर्षानुवर्षे कायम आहे. मुबलक पाणी असतानाही योग्य नियोजन केले ...

भंडारा : तलावांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या भंडारातही पाणीटंचाईची समस्या वर्षानुवर्षे कायम आहे. मुबलक पाणी असतानाही योग्य नियोजन केले जात नसल्याने उन्हाळ्याची चाहूल लागताच पाणीटंचाईचे चटके जाणवायला लागतात.

यंदा मार्च महिन्यापासूनच पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्या असून जिल्ह्यातील १३४ गावातील महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने पाणीटंचाई कृती आराखडा तयार केला असून ५ कोटी ३४ लाख रुपयांच्या विविध उपाययोजना सुचविण्यात आल्या आहेत. बावनथडी, चुलबंद नदीतीरावरील गावांमध्ये पाणीटंचाईची चाहूल लागली आहे तर वैनगंगा नदीतीरावरील नागरिकांना दूषित पाण्यामुळे कायम पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. पावसाळ्यात वाहून जाणाऱ्या पाण्याचे योग्य नियोजन केले तर जलपातळीत वाढ होऊन टंचाई संपुष्टात येऊ शकते.

जिल्ह्यात केवळ चार विहिरींचे अधिग्रहण

भंडारा जिल्ह्यातील केवळ चार गावांत विहिरींचे अधिग्रहण प्रशासनाला करावे लागणार आहेत. त्यात जानेवारी ते मार्च महिन्यात मोहाडी तालुक्यातील एका गावासाठी विहीर अधिग्रहित केली जाईल तर एप्रिल ते जून या कालावधीत तीन गावांमध्ये विहिरींचे अधिग्रहण करण्यात येणार आहे. यासाठी ४ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.

१९१ गावांत २१८ विंधन विहिरी तयार करणार

जिल्ह्यातील पाणीटंचाई संपुष्टात आणण्यासाठी १९१ गावांमध्ये २१८ विंधन विहिरी खोदण्याचे नियोजन पाणीटंचाईच्या कृती आराखड्यात करण्यात आले आहे. त्यासाठी २ कोटी ५२ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. तर २०२ गावांतील ३०९ विंधन विहिरींची दुरुस्ती केली जाईल. त्यासाठी ४६ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.

उपाययोजना दिसतात केवळ कागदावरच

दरवर्षी उन्हाळा आला की प्रशासनाच्या वतीने संभाव्य पिण्याच्या पाणीटंचाई निवारणार्थ बृहत आराखडा तयार केला जातो. जानेवारी ते जून या कालावधीसाठी हा आराखडा असतो. या आराखड्यात विविध उपाययोजना केल्या जातात. मात्र दरवर्षी त्याच त्या गावात पाणीटंचाई जाणवायला लागते. त्यामुळे कृती आराखड्यातील उपाययोजना केवळ कागदावरच तर राबविल्या जात नाही ना अशी शंका निर्माण होते. यंदा ६६८ गावात पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता गृहित धरण्यात आली आहे. त्यासाठी ५ कोटी ३४ लाख रुपयांचा आराखडा तयार केला आहे. या आराखड्यातील उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

टँकरमुक्त जिल्ह्यात पाण्यासाठी दाहीदिशा

भंडारा हा टँकरमुक्त जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यात गत दोन दशकात कुठेही टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ आली नाही. मात्र अनेक गावात मे महिन्यात पाणीटंचाई तीव्र होते. या गावात खासगी टँकरद्वारे नागरिकांना पाणी आणावे लागते. विहिरीची पातळी खालावली की दूषित पाण्याचा प्रश्न निर्माण होतो. हातपंपालाही पाणी येत नाही. नळ योजना कुचकामी ठरतात. अशा स्थितीत गावकऱ्यांना पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती करण्याची वेळ येते. लाखनी आणि साकोली तालुक्यात पाणीटंचाईसाठी अनेक गावे प्रसिद्ध आहेत. लाखांदूर तालुक्यातील काही गावांनाही टंचाईचा फटका बसतो. उपाययोजनाही प्रभावहीन ठरत असल्याचे चित्र असते.