शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
2
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
3
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
4
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
5
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
6
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
7
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
8
फैजल खानचं आमिरला DNA चाचणी करण्याचं आव्हान, म्हणाला, "रीनाशी लग्न केलं तेव्हाच..."
9
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
10
नोकरीची उत्तम संधी! एलआयसीमध्ये विविध पदांची भरती, पगार एक लाखापेक्षा अधिक
11
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!
12
Smallest Countries : जगातील सगळ्यात लहान ५ देश; दुसऱ्या क्रमांकाच्या देशात तर अवघ्या एका दिवसात फिरून होईल!
13
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
14
मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंना टक्कर देणार भाजपाचे 'जय-वीरू'; आशिष शेलारांनी डिवचलं, म्हणाले...
15
शेअर आहे की पैशांचं झाड...? ५ महिन्यांत २००%, तर आतापर्यंत दिलाय ५१३१२% चा छप्परफाड परतावा; गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
16
अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी...
17
उत्तर प्रदेशातील आणखी एका शहराचे नामांतर, नवे नाव असणार 'परशुरामपुरी'
18
बेस्ट निवडणूक २०२५: CM फडणवीसांची मदत, ठाकरेंचा पराभव; शशांक राव यांनी सांगितली Inside Story
19
ICC ODI Rankings : केशव महाराज नंबर वन बॉलर! बॅटरच्या यादीतून रोहित-विराटचं नाव 'गायब'; कारण...
20
Astro Tips: हा हळदीचा ट्रेंड नाही तर आयुष्यातील नकारात्मकता घालवण्यासाठी आहे गुरुवारचा उपाय!

तलावाच्या जिल्ह्यात १३४ गावांत मार्चमध्ये डोक्यावर हंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 05:06 IST

भंडारा : तलावांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या भंडारातही पाणीटंचाईची समस्या वर्षानुवर्षे कायम आहे. मुबलक पाणी असतानाही योग्य नियोजन केले ...

भंडारा : तलावांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या भंडारातही पाणीटंचाईची समस्या वर्षानुवर्षे कायम आहे. मुबलक पाणी असतानाही योग्य नियोजन केले जात नसल्याने उन्हाळ्याची चाहूल लागताच पाणीटंचाईचे चटके जाणवायला लागतात.

यंदा मार्च महिन्यापासूनच पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्या असून जिल्ह्यातील १३४ गावातील महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने पाणीटंचाई कृती आराखडा तयार केला असून ५ कोटी ३४ लाख रुपयांच्या विविध उपाययोजना सुचविण्यात आल्या आहेत. बावनथडी, चुलबंद नदीतीरावरील गावांमध्ये पाणीटंचाईची चाहूल लागली आहे तर वैनगंगा नदीतीरावरील नागरिकांना दूषित पाण्यामुळे कायम पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. पावसाळ्यात वाहून जाणाऱ्या पाण्याचे योग्य नियोजन केले तर जलपातळीत वाढ होऊन टंचाई संपुष्टात येऊ शकते.

जिल्ह्यात केवळ चार विहिरींचे अधिग्रहण

भंडारा जिल्ह्यातील केवळ चार गावांत विहिरींचे अधिग्रहण प्रशासनाला करावे लागणार आहेत. त्यात जानेवारी ते मार्च महिन्यात मोहाडी तालुक्यातील एका गावासाठी विहीर अधिग्रहित केली जाईल तर एप्रिल ते जून या कालावधीत तीन गावांमध्ये विहिरींचे अधिग्रहण करण्यात येणार आहे. यासाठी ४ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.

१९१ गावांत २१८ विंधन विहिरी तयार करणार

जिल्ह्यातील पाणीटंचाई संपुष्टात आणण्यासाठी १९१ गावांमध्ये २१८ विंधन विहिरी खोदण्याचे नियोजन पाणीटंचाईच्या कृती आराखड्यात करण्यात आले आहे. त्यासाठी २ कोटी ५२ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. तर २०२ गावांतील ३०९ विंधन विहिरींची दुरुस्ती केली जाईल. त्यासाठी ४६ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.

उपाययोजना दिसतात केवळ कागदावरच

दरवर्षी उन्हाळा आला की प्रशासनाच्या वतीने संभाव्य पिण्याच्या पाणीटंचाई निवारणार्थ बृहत आराखडा तयार केला जातो. जानेवारी ते जून या कालावधीसाठी हा आराखडा असतो. या आराखड्यात विविध उपाययोजना केल्या जातात. मात्र दरवर्षी त्याच त्या गावात पाणीटंचाई जाणवायला लागते. त्यामुळे कृती आराखड्यातील उपाययोजना केवळ कागदावरच तर राबविल्या जात नाही ना अशी शंका निर्माण होते. यंदा ६६८ गावात पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता गृहित धरण्यात आली आहे. त्यासाठी ५ कोटी ३४ लाख रुपयांचा आराखडा तयार केला आहे. या आराखड्यातील उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

टँकरमुक्त जिल्ह्यात पाण्यासाठी दाहीदिशा

भंडारा हा टँकरमुक्त जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यात गत दोन दशकात कुठेही टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ आली नाही. मात्र अनेक गावात मे महिन्यात पाणीटंचाई तीव्र होते. या गावात खासगी टँकरद्वारे नागरिकांना पाणी आणावे लागते. विहिरीची पातळी खालावली की दूषित पाण्याचा प्रश्न निर्माण होतो. हातपंपालाही पाणी येत नाही. नळ योजना कुचकामी ठरतात. अशा स्थितीत गावकऱ्यांना पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती करण्याची वेळ येते. लाखनी आणि साकोली तालुक्यात पाणीटंचाईसाठी अनेक गावे प्रसिद्ध आहेत. लाखांदूर तालुक्यातील काही गावांनाही टंचाईचा फटका बसतो. उपाययोजनाही प्रभावहीन ठरत असल्याचे चित्र असते.