शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

तलावाच्या जिल्ह्यात १३४ गावांत मार्चमध्ये डोक्यावर हंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 05:06 IST

भंडारा : तलावांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या भंडारातही पाणीटंचाईची समस्या वर्षानुवर्षे कायम आहे. मुबलक पाणी असतानाही योग्य नियोजन केले ...

भंडारा : तलावांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या भंडारातही पाणीटंचाईची समस्या वर्षानुवर्षे कायम आहे. मुबलक पाणी असतानाही योग्य नियोजन केले जात नसल्याने उन्हाळ्याची चाहूल लागताच पाणीटंचाईचे चटके जाणवायला लागतात.

यंदा मार्च महिन्यापासूनच पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्या असून जिल्ह्यातील १३४ गावातील महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने पाणीटंचाई कृती आराखडा तयार केला असून ५ कोटी ३४ लाख रुपयांच्या विविध उपाययोजना सुचविण्यात आल्या आहेत. बावनथडी, चुलबंद नदीतीरावरील गावांमध्ये पाणीटंचाईची चाहूल लागली आहे तर वैनगंगा नदीतीरावरील नागरिकांना दूषित पाण्यामुळे कायम पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. पावसाळ्यात वाहून जाणाऱ्या पाण्याचे योग्य नियोजन केले तर जलपातळीत वाढ होऊन टंचाई संपुष्टात येऊ शकते.

जिल्ह्यात केवळ चार विहिरींचे अधिग्रहण

भंडारा जिल्ह्यातील केवळ चार गावांत विहिरींचे अधिग्रहण प्रशासनाला करावे लागणार आहेत. त्यात जानेवारी ते मार्च महिन्यात मोहाडी तालुक्यातील एका गावासाठी विहीर अधिग्रहित केली जाईल तर एप्रिल ते जून या कालावधीत तीन गावांमध्ये विहिरींचे अधिग्रहण करण्यात येणार आहे. यासाठी ४ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.

१९१ गावांत २१८ विंधन विहिरी तयार करणार

जिल्ह्यातील पाणीटंचाई संपुष्टात आणण्यासाठी १९१ गावांमध्ये २१८ विंधन विहिरी खोदण्याचे नियोजन पाणीटंचाईच्या कृती आराखड्यात करण्यात आले आहे. त्यासाठी २ कोटी ५२ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. तर २०२ गावांतील ३०९ विंधन विहिरींची दुरुस्ती केली जाईल. त्यासाठी ४६ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.

उपाययोजना दिसतात केवळ कागदावरच

दरवर्षी उन्हाळा आला की प्रशासनाच्या वतीने संभाव्य पिण्याच्या पाणीटंचाई निवारणार्थ बृहत आराखडा तयार केला जातो. जानेवारी ते जून या कालावधीसाठी हा आराखडा असतो. या आराखड्यात विविध उपाययोजना केल्या जातात. मात्र दरवर्षी त्याच त्या गावात पाणीटंचाई जाणवायला लागते. त्यामुळे कृती आराखड्यातील उपाययोजना केवळ कागदावरच तर राबविल्या जात नाही ना अशी शंका निर्माण होते. यंदा ६६८ गावात पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता गृहित धरण्यात आली आहे. त्यासाठी ५ कोटी ३४ लाख रुपयांचा आराखडा तयार केला आहे. या आराखड्यातील उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

टँकरमुक्त जिल्ह्यात पाण्यासाठी दाहीदिशा

भंडारा हा टँकरमुक्त जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यात गत दोन दशकात कुठेही टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ आली नाही. मात्र अनेक गावात मे महिन्यात पाणीटंचाई तीव्र होते. या गावात खासगी टँकरद्वारे नागरिकांना पाणी आणावे लागते. विहिरीची पातळी खालावली की दूषित पाण्याचा प्रश्न निर्माण होतो. हातपंपालाही पाणी येत नाही. नळ योजना कुचकामी ठरतात. अशा स्थितीत गावकऱ्यांना पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती करण्याची वेळ येते. लाखनी आणि साकोली तालुक्यात पाणीटंचाईसाठी अनेक गावे प्रसिद्ध आहेत. लाखांदूर तालुक्यातील काही गावांनाही टंचाईचा फटका बसतो. उपाययोजनाही प्रभावहीन ठरत असल्याचे चित्र असते.