शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

सकारात्मक विचारांमुळे मनोबल वाढते - बारई

By admin | Updated: March 8, 2016 00:28 IST

बदलत्या परिस्थितीत मानव जातीला शांतता शोधावी लागत आहे. हे घडण्याला मुळ कारण म्हणजे नकारात्मक विचारसरणी वाढीस लागलेली आहे.

पवनी : बदलत्या परिस्थितीत मानव जातीला शांतता शोधावी लागत आहे. हे घडण्याला मुळ कारण म्हणजे नकारात्मक विचारसरणी वाढीस लागलेली आहे. प्रत्येकाने सकारात्मक विचार केल्यास ते विचार मनोबल वाढविण्यास मदत करतील व शांतता शोध्याची गरज पडणार नाही असे विचार वनक्षेत्राधिकारी आर. एन. बारई यांनी व्यक्त केले.प्रजापिता ब्रह्मकुमारीज ईश्वरीय विश्वविद्यालय माऊंट आबु मार्फत संचालित स्थानिक केंद्रात महाशिवरात्रीनिमित्त आयोजित शिवजंयती कार्यक्रमात ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, आयुष्यभर सोबत राहणारा एक घटक म्हणजे वृक्ष असून त्याची लागवड करुन संवध्रन करण्याचा प्रयत्न प्रत्येकाने करावा. जन्मापासून प्रत्येक क्षणाला सोबत राहून मृत्यूपर्यंत साथ देणाऱ्या वृक्षावर मनापासून प्रेम करण्याचा सल्ला त्यांनी यावेळी दिला. याप्रसंगी वनक्षेत्राधिकारी आर. एन. बारई यांचे हस्ते शिवध्वज फडकविण्यात आला. यावेळी पोलीस निरीक्षक मधुकर गीते, डॉ. विक्रम राखडे, मंदार फडणवीस, मुख्याख्यापक अशोक पारधी, प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. डॉ. विक्रम राखडे यांनी मानवाच्या जीवनात मनाचे महत्व कसे असते हे सांगुन अध्यात्माचे अनुसरणाने मानवाला शांतता प्राप्त करता येते. प्रत्येक धर्म अहिंसेला महत्व देत आहे. अहिंसेशिवाय जे घडले त्यालाच शांती म्हणतात, हे विषद केले. पोलीस निरीक्षक मधूकर गिले व मंदार फडणवीस यांनी यावेळी समयोचित विचार व्यक्त केले. यावेळी केंद्राच्या संचालिका ब्रम्हाकुमारी सुशिल दिदी यांनी शिवजयंती कशासाठी साजरी करावयाची, हे वेगवेगळे उदाहरण देवून समाजवून दिले. अशोक पारधी यांनी अतिथींचा परिचय देऊन स्वागतपर भाषण केले. बाल कलावंतांनी यावेळी नृत्य सादर केले. अतिथींचे स्वागत करण्यात आले. संचालन मधूकरभाई यांनी तर आभार उदाराम मांडवकर यांनी मानले. यावेळी नागरिक उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)